शहरं
Join us  
Trending Stories
1
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
2
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
3
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
4
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
5
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
6
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
7
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
8
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
9
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
10
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
11
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
12
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय
13
दिवाळी, छठ पूजेस १०.५ लाख प्रवासी यूपी, बिहारला; मुंबईतून आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त फेऱ्या
14
कबुतरांसाठी जैन मुनींचे उपोषण; १ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात होणार सुरुवात
15
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
16
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
17
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
18
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
19
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
20
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर

दापूर गाव ११ जूनपर्यंत कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 00:03 IST

दापूर गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सहावर गेल्याने तहसीलदार राहुल कोताडे यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गावात पाहणी करून येत्या ११ जूनपर्यंत संपूर्ण गाव कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केले. या कालावधीत गावाच्या सर्व सीमा सील करून कुणालाही गावात येण्यास किंवा गावाबाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

ठळक मुद्देखबरदारी : सहा रुग्ण आढळून आल्याने तहसीलदारांची कारवाई

सिन्नर : तालुक्यातील दापूर गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सहावर गेल्याने तहसीलदार राहुल कोताडे यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गावात पाहणी करून येत्या ११ जूनपर्यंत संपूर्ण गाव कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केले. या कालावधीत गावाच्या सर्व सीमा सील करून कुणालाही गावात येण्यास किंवा गावाबाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.दि. ११ जूनपर्यंत गावातील सर्व प्रकारच्या सेवा बंद ठेवण्यात येणार असून, त्यात किराणा दुकाने, दूध संकलन केंद्र, बँकांचादेखील समावेश आहे. तहसीलदार कोताडे, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य, महसूल व पोलीस विभागाची पथके गावात दाखल झाली आहेत. मुंबईहून आलेल्या व्यक्तींचा अहवाल ३ दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील आठ जण व गावात खासगी प्रॅक्टिस करणाºया एका डॉक्टरला तपासणीसाठी नेण्यात आले होते. यापैकी एकाच कुटुंबातील सहा जणांचे अहवाल बुधवारी सायंकाळी पॉझिटिव्ह आल्यानंतर गावात भीतीचे वातावरण आहे. आरोग्य यंत्रणेने सतर्कता दाखवत पॉझिटिव्ह रुग्णांच्या निकट संपर्कातील व्यक्तींना रुग्णालयात दाखल केले आहे. यात संगमनेर तालुक्यातील एका डॉक्टरच्या कुटुंबीयांचादेखील समावेश आहे.आज गावातील पाच रुग्णांच्या कुटुंबातील सात जणांना तपासणीसाठी नेण्यात आले असून, आणखी एका खासगी डॉक्टरलाही तपासणीसाठी दाखल होण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले. दापूर गावात १ मेनंतर जवळपास साडेसहाशे व्यक्ती मुंबई व बाहेरून आलेल्या आहेत. या सर्वांनी ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्रात नोंदणी केलेल्या असल्या तरी सर्वेक्षणात त्यांच्यावरही देखरेख ठेवण्यात येणार आहे.या खेरीज गावात अजून दोनशे ते अडीचशे लोक बाहेरून आलेले असून त्यांनी गावात आगमनाची कोणतीही पूर्व सूचना शासकीय यंत्रणांना दिलेली नाही. त्या सर्वांचा शोध घेऊन त्यांच्यावर संचारबंदी भंगाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले. दि.११ जून पर्यंत गावात संचारबंदी लागू राहणार असून आपत्कालीन परिस्थिती वगळता ग्रामस्थांनी घराबाहेर येण्याचे टाळावे असे आदेश देण्यात आले आहेत.गावातील जिल्हा परिषद शाळेत क्वॉरण्टाइन सेंटर सुरू करण्याचे निर्देश गटविकास अधिकारी डॉ. गायकवाड यांनी सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. विनापरवानगी गावात आलेल्यांवर गुन्हे दाखल करून त्यांनादेखील शाळेतील सेंटरमध्ये वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात यावे, असे डॉ. गायकवाड यांनी म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या