शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
3
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
4
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
5
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?
6
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
7
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
8
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
9
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
10
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
11
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
12
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
13
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
14
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
15
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
16
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
17
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
18
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
19
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
20
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा

पाच ठिकाणीही डोंगरांच्या उत्खननाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:16 IST

नाशिक : ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी होणारे अवैध उत्खनन रोखण्यासाठी पावले उचलली जात असतानाच जिल्ह्यातील अनेक ठिकाणी होत असलेल्या अवैध ...

नाशिक : ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी होणारे अवैध उत्खनन रोखण्यासाठी पावले उचलली जात असतानाच जिल्ह्यातील अनेक ठिकाणी होत असलेल्या अवैध उत्खनन राेखण्याचेदेखील प्रशासनापुढे आव्हान असणार आहे. ब्रह्मगिरीच्या रक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या अनेक उपसमित्यांनी याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असून, त्यातील काही समित्यांनी प्रशासनाला याबबातचा अहवालही सादर केला आहे.

राज्यात पर्यटन दिन साजरा होत असताना नाशिकमध्ये अवैध उत्खनन, तसेच इको सेन्सेटिव्ह झोनमधील अवैध बांधकामाचा मुद्या चर्चेत येत आहे. खुद्द पर्याववरण राज्यमंत्र्यांनी याकडे लक्ष घातल्याने किमान शासकीय अधिकारी आणि पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची एक समिती स्थापन होऊ शकली. त्यामुळे संतोषा, भागडी येथील उत्खनन रोखण्यावर भर दिला जात आहे. मात्र, जिल्ह्यात अन्य पाच ते सात ठिकाणी डोंगर, टेकड्यांवरदेखील उत्खनन होत असताना तेथेही लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. सुरगाणा येथील हतगड, दुर्ग हरिहर त्र्यंबकेश्वर, गिरणारे जवळील धोंडेगाव, आळंदी धरणालगतची टेकडी, रामशेज डोंगराजवळ पाच ठिकाणी सुरू असलेले खोदकाम, दिंडोरी रोडवरील विद्यापीठाजवळील डोंगर, आदी अनेक ठिकाणी नैसर्गिक डोंगरांना नख लावण्याचे उद्योग सुरू असल्याने याबाबतचे उत्तर पर्यावरण प्रेमींकडून विचारले जात आहे. महसूल यंत्रणेची परवानगी आणि वनविभागाच्या अखत्यारित असलेल्या डोंगर, टेकडी असा प्रशासकीय मुद्या उपस्थित होत असल्याने एकीकडे कामे सुरू, तर दुसरीकडे शासकीय चौकशा आणि बैठका होत असल्याचा अनुभव असल्याने काही बाबी दुर्लक्षित होत असल्याचा पर्यावरणप्रेमींचा आरोप आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा लोप पावण्याची भीती उपसिमत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

--इन्फो--

वनांना लागणाऱ्या आगी संशयास्पद

नााशिक जिल्ह्यातही अनेकदा वनसंपदेला आग लागल्याच्या घटना घडतात. मात्र, अशा आगींची चौकशी होणे अपेक्षित असल्याचे काही पर्यावरणप्रेमींनी सुचविलेले आहे. अनेकदा जंगलांमध्ये वणवा लागल्याच्या घडतात याबाबत असलेला संशयकल्लोळ टास्कफोर्सच्या बैठकीत मांडला जाणार असल्याचे समजते. वणव्यामुळे वनसंपदा बेचिराख होतेच, शिवाय जमीन नापीक होण्याचा धोका वाढतो. जैवविविधताही धोक्यात येते. पर्यावरण रक्षणाच्या मुद्यावर या बाबीही पर्यावरणाशी निगडित असल्याने संशोधनाचा विषय व्यापक करण्याचा सल्लादेखील काही उपसमित्यांनी दिला आहे.