शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

धरणांचे काठ मद्याच्या बाटल्यांमुळे बनले धोक्याचे ‘घाट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:14 IST

----- नाशिक : शहराजवळील गंगापूर धरणाचा बॅकवॉटरचा परिसर असो किंवा काश्यपी, गौतमी, भावलीचा परिसर असो, या धरणांच्या काठालगतचे पक्षीजीवन ...

-----

नाशिक : शहराजवळील गंगापूर धरणाचा बॅकवॉटरचा परिसर असो किंवा काश्यपी, गौतमी, भावलीचा परिसर असो, या धरणांच्या काठालगतचे पक्षीजीवन धोक्यात येत आहे. त्याला मुख्य कारण ठरत आहे, ते म्हणजे मद्यपींच्या ओल्या पार्ट्या. मद्य रिचविल्यानंतर रित्या झालेल्या बाटल्या धरणांच्या काठालगतच्या दगडांवर फोडून सर्वत्र काचा विखरून ही मंडळी घराकडे परततात. मात्र, या बाटल्यांच्या काचांमुळे या भागात राहणाऱ्या विविध स्थलांतरित देशी-विदेशी पक्ष्यांनाही हानी पोहोचत असल्याचे काही पक्षीप्रेमींच्या निदर्शनास आले आहे.

शहराजवळील गंगापूर धरणाचा परिसर हा अत्यंत संवेदनशील आहे. या धरणाच्या पाण्यावर नाशिककरांची तहान भागते. मात्र, याच शहरामध्ये राहणाऱ्या काही मद्यपींना त्याची तसूभरही जाण नसल्याने, ही मंडळी सर्रासपणे सावरगाव, वनविभागाच्या रोपवाटिकेच्या पाठीमागील बाजूने धरणांचा काठ गाठून तेथे ओल्या पार्ट्या रंगविते. धरणांच्या जलसाठ्यावरून येणाऱ्या थंडगार हवेच्या झुळुकीचा मनमुराद आनंद लुटत, मद्यपींना झिंग चढल्यानंतर कशाचेही भान न बाळगता, हातातील रिकाम्या बाटल्या फोडून जणू काही आपण फार मोठे ‘शौर्य’ दाखविले, या आविर्भावात ही मंडळी असतात. त्यावेळी त्यांची एखाद्या जागरूक नागरिकाने समजूत काढण्याचा जरी प्रयत्न केला, तरी तो प्रयत्न त्याच्या अंगलट येण्याची दाट शक्यता असते. मद्याच्या नशेत असल्यामुळे हे नशेबाज थेट हमरीतुमरीवर उतरतात. यामुळे काही पक्षीप्रेमींना याचा वाईट अनुभवही काही दिवसांपूर्वी आला. यामुळे तालुका पोलिसांनी या भागात गस्त वाढवून मद्यपींना आवर घालण्याची मागणी होत आहे. पोालिसांकडून मद्यपींच्या टोळक्यांना मोकळीक दिली जात असल्याच्याही तक्रारी या भागातील नागरिकांनी केल्या आहेत.

---इन्फो---

विखुरलेल्या काचांमुळे पक्षी होत आहेत जखमी

गंगापूर धरण समूहातील काश्यपी, गौतमीगोदावरी, आळंदी, तसेच वाघाड ही धरणे स्थलांतरित पक्ष्यांकरिता ही उत्तम ‘कनेक्टिविटी’ आहे. देशी-विदेशी स्थलांतरित पक्षी या धरणांच्या काठांवर विसावतात, तसेच आजूबाजूला मुक्कामी असतात. पक्षी जलाशयावर जरी विहार करत असले, तरी ते अंडी मात्र जलाशयाच्या काठांवरच घालतात. काठावरील दलदली जागा हे त्यांचे मुख्य आश्रयस्थान असते. त्यामुळे या भागात विखुरलेल्या मद्यांच्या काचांमुळे त्यांना हानी पोहोचत आहे. यापूर्वी काही पक्षी जखमी झाल्याच्याही घटना घडल्या असल्याची निरीक्षणे नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी ऑफ नाशिक या संस्थेने नोंदविले आहे.

===Photopath===

140321\14nsk_5_14032021_13.jpg~140321\14nsk_6_14032021_13.jpg

===Caption===

धरणांच्या काठावर पडलेल्या बाटल्या.~धरणांच्या काठावर पडलेल्या बाटल्या.