शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

धरणांच्या साठ्यात वाढ

By admin | Updated: September 19, 2015 22:03 IST

मालेगाव : गिरणा वाहिली दुथडी भरून; शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या

मालेगाव : तालुक्यासह कसमादेत झालेल्या पावसाने येथील गिरणा दुथडी भरून वाहू लागल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. नदीपात्रात सध्या १८ हजार ६६४ क्युसेस पाणी सोडण्यात आले असून, गिरणा धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात गुरुवारी रात्री व शुक्रवारी दिवसभर पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील धरणांच्या साठ्यात वाढ झाली आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, रब्बीच्या आशा उंचावल्या आहेत. शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, येथील शहराबाहेरून वाहणाऱ्या गिरणा नदीला पूर आला असून, काठावर राहणाऱ्या नागरिकांना सावधागिरीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गिरणा नदीला पूर आला असून, ठेंगोडा येथील बंधाऱ्यातून १४ हजार ४४० क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. तसेच चणकापूर धरणातून तीन हजार ५२४ क्युसेस पाण्याची भर पडत आहे. यामुळे नदीकाठच्या तसेच नदीपात्रात असलेल्या पाणीपुरवठा योजना जीवंत झाल्या आहेत. येथील सोयगाव व टेहरे दरम्यानच्या पुलाला पाणी लागले होते. तालुक्यातील अनेक गावांचा पाण्याचा व शेतीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. गिरणा दुथडी भरून वाहू लागल्याने पूरपाणी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कोसळलेल्या दमदार पावसामुळे धरणांच्या साठ्यात लक्षणीय वाढ झाली असून, काही धरणे पूर्णपणे भरण्याच्या मार्गावर आहेत. यातील काही धरणातून पाणी सोडण्यात आल्याने नद्यांना पूर आला आहे. शनिवारी सकाळी साडेसात वाजता चणकापूर धरणात दोन हजार २५२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला होता. याची टक्केवारी ९२. ७९ आहे. यामुळे या धरणातून सव्वातीन हजार क्युसेस पाणी सोडण्यात आले. पाटबंधारे विभागाच्या नोेंदीनुसार शनिवारी सकाळी साडेसात वाजता धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊन हरणबारी धरणात एक हजार ५४, केळझरमध्ये ४५८ पाणीसाठा झाला. हे धरणे अनुक्रमे ९०.३९ तर ८०.०७ भरले. मात्र नाग्यासाक्या धरणातील पाणीसाठ्यात कोणतीही वाढ न झाल्याने ते कोरडे ठाक आहे. निकवेल : बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या पावसामुळे आरम नदीला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच केळझर धरण व छोट छोटी धरणेही ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे.बागलाण तालुक्यातील मुंजवाड, चौधाणा, कंधाणा, दहिदुले, चाफापाडा, डांगसौंदाणे, केळझर, तलाठी, जोरण, कपालेश्वर, किकवारी आदि गावांमध्ये जोरदार पाऊस झाला. गुरुवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाचे आगमन झाल्याने या भागातील पाणीप्रश्न सुटणार आहे. छोट छोटी धरणेही ओव्हरफ्लो झाली आहेत. आरम नदीला पूर आल्याने निकवेल येथील शेतकऱ्यांनी नदीतील पाण्याचे जलपूजन केले. पंचायत समिती सदस्य भास्कर बच्छावसह निकवेल विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक नीलेश वाघ, पोपट म्हसदे, भिका वाघ, कुणाल म्हसदे, पुंजाराम वाघ, निंबा वाघ, गोकुळ वाघ, प्रकाश वाघ आदि ग्रामस्थ जलपूजनासाठी उपस्थित होते. बागलाण पश्चिम पट्ट्यातील सर्वच नद्या-नाल्यांना पाणी आल्याने बळीराजा सुखावला आहे.केळझर धरणामध्ये मंगळवारपर्यंत ३० टक्के पाणीसाठा शिल्लक होता; मात्र गुुरुवारी व शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे केळझर धरण शंभर टक्के भरण्यात आले आहे. आगामी एक दोन दिवसात केळझर धरणही ओव्हरफ्लो होण्याची परिस्थिती आहे. त्यामुळे भागातील पाणीप्रश्न सुटेल अशी चर्चा शेतकरीवर्गात होत आहे. (वार्ताहर)