शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

अवकाळी पावसाने आंबा, कांद्याचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:14 IST

नाशिक : गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने निसर्गाच्या अवकृपेचा सामना करावा लागणाऱ्या नाशिक जिल्ह्यात यंदाही अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ...

नाशिक : गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने निसर्गाच्या अवकृपेचा सामना करावा लागणाऱ्या नाशिक जिल्ह्यात यंदाही अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले आहे. या पावसाने कांदा तसेच आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पालेभाज्यांनाही फटका बसला आहे. सुमारे ४५५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

जिल्ह्यात गेल्या २५ एप्रिल ते २ मे या कालावधीत अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले आहे. जिल्ह्यातील ५४ गावांमधील सुमारे १२२४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून, नुकसानीचा प्राथमिक अंदाज काढण्यात आला असून, अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. सटाणा आणि कळवण तालुक्याला याचा सर्वाधिक फटका बसला. नांदगाव, नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, येवला या तालुक्यांमध्ये नुकसानीचे प्रमाण अत्यल्प आहे.

या अवकाळी पावसामुळे ३०२ हेक्टरवरील कांदा पिकाचे तसेच बाजरी, मिरची तसेच भाजीपाल्याचेदेखील काही प्रमाणात नुकसान झाले आहे. वार्षिक फळपिकांमध्ये आंबा पिकाचे नुकसान झाले. ४० हेक्टरवरील आंबा पिकाला याचा फटका बसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. एकूण ४५५.३३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सटाणा, नांदगाव तसेच कळवण तालुक्याला अवकाळी फटका बसला आहे. त्र्यंबकेश्वर तसेच इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनादेखील नुकसान सहन करावे लागले आहे.

कळवण तालुक्यातील २२१, नांदगावातील ९६, कळवणमधील २८८, त्र्यंबकेश्वरमधील १२५, इगतपुरीतील २४४ तसेच येवला तालुक्यातील २४३ शेतकऱ्यांना या नुकसानीचा फटका बसला आहे. बागायती क्षेत्रावरील सुमेरे ४१५, तर वार्षिक फळपिके क्षेत्रावरील ४० असे एकूण ४५५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, हवामान खात्याने पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली असल्यामुळे शेतकऱ्यांना अधिक चिंता लागली आहे.