शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने आंबा, कांद्याचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:14 IST

नाशिक : गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने निसर्गाच्या अवकृपेचा सामना करावा लागणाऱ्या नाशिक जिल्ह्यात यंदाही अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ...

नाशिक : गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने निसर्गाच्या अवकृपेचा सामना करावा लागणाऱ्या नाशिक जिल्ह्यात यंदाही अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले आहे. या पावसाने कांदा तसेच आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पालेभाज्यांनाही फटका बसला आहे. सुमारे ४५५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

जिल्ह्यात गेल्या २५ एप्रिल ते २ मे या कालावधीत अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले आहे. जिल्ह्यातील ५४ गावांमधील सुमारे १२२४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून, नुकसानीचा प्राथमिक अंदाज काढण्यात आला असून, अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. सटाणा आणि कळवण तालुक्याला याचा सर्वाधिक फटका बसला. नांदगाव, नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, येवला या तालुक्यांमध्ये नुकसानीचे प्रमाण अत्यल्प आहे.

या अवकाळी पावसामुळे ३०२ हेक्टरवरील कांदा पिकाचे तसेच बाजरी, मिरची तसेच भाजीपाल्याचेदेखील काही प्रमाणात नुकसान झाले आहे. वार्षिक फळपिकांमध्ये आंबा पिकाचे नुकसान झाले. ४० हेक्टरवरील आंबा पिकाला याचा फटका बसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. एकूण ४५५.३३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सटाणा, नांदगाव तसेच कळवण तालुक्याला अवकाळी फटका बसला आहे. त्र्यंबकेश्वर तसेच इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनादेखील नुकसान सहन करावे लागले आहे.

कळवण तालुक्यातील २२१, नांदगावातील ९६, कळवणमधील २८८, त्र्यंबकेश्वरमधील १२५, इगतपुरीतील २४४ तसेच येवला तालुक्यातील २४३ शेतकऱ्यांना या नुकसानीचा फटका बसला आहे. बागायती क्षेत्रावरील सुमेरे ४१५, तर वार्षिक फळपिके क्षेत्रावरील ४० असे एकूण ४५५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, हवामान खात्याने पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली असल्यामुळे शेतकऱ्यांना अधिक चिंता लागली आहे.