शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने आंबा, कांद्याचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:14 IST

नाशिक : गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने निसर्गाच्या अवकृपेचा सामना करावा लागणाऱ्या नाशिक जिल्ह्यात यंदाही अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ...

नाशिक : गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने निसर्गाच्या अवकृपेचा सामना करावा लागणाऱ्या नाशिक जिल्ह्यात यंदाही अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले आहे. या पावसाने कांदा तसेच आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पालेभाज्यांनाही फटका बसला आहे. सुमारे ४५५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

जिल्ह्यात गेल्या २५ एप्रिल ते २ मे या कालावधीत अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले आहे. जिल्ह्यातील ५४ गावांमधील सुमारे १२२४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून, नुकसानीचा प्राथमिक अंदाज काढण्यात आला असून, अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. सटाणा आणि कळवण तालुक्याला याचा सर्वाधिक फटका बसला. नांदगाव, नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, येवला या तालुक्यांमध्ये नुकसानीचे प्रमाण अत्यल्प आहे.

या अवकाळी पावसामुळे ३०२ हेक्टरवरील कांदा पिकाचे तसेच बाजरी, मिरची तसेच भाजीपाल्याचेदेखील काही प्रमाणात नुकसान झाले आहे. वार्षिक फळपिकांमध्ये आंबा पिकाचे नुकसान झाले. ४० हेक्टरवरील आंबा पिकाला याचा फटका बसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. एकूण ४५५.३३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सटाणा, नांदगाव तसेच कळवण तालुक्याला अवकाळी फटका बसला आहे. त्र्यंबकेश्वर तसेच इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनादेखील नुकसान सहन करावे लागले आहे.

कळवण तालुक्यातील २२१, नांदगावातील ९६, कळवणमधील २८८, त्र्यंबकेश्वरमधील १२५, इगतपुरीतील २४४ तसेच येवला तालुक्यातील २४३ शेतकऱ्यांना या नुकसानीचा फटका बसला आहे. बागायती क्षेत्रावरील सुमेरे ४१५, तर वार्षिक फळपिके क्षेत्रावरील ४० असे एकूण ४५५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, हवामान खात्याने पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली असल्यामुळे शेतकऱ्यांना अधिक चिंता लागली आहे.