शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने आंबा, कांद्याचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:15 IST

नाशिक : गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने निसर्गाच्या अवकृपेचा सामना करावा लागणाऱ्या नाशिक जिल्ह्यात यंदाही अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ...

नाशिक : गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने निसर्गाच्या अवकृपेचा सामना करावा लागणाऱ्या नाशिक जिल्ह्यात यंदाही अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले आहे. या पावसाने कांदा तसेच आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पालेभाज्यांनाही फटका बसला आहे. सुमारे ४५५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

जिल्ह्यात गेल्या २५ एप्रिल ते २ मे या कालावधीत अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले आहे. जिल्ह्यातील ५४ गावांमधील सुमारे १२२४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून, नुकसानीचा प्राथमिक अंदाज काढण्यात आला असून, अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. सटाणा आणि कळवण तालुक्याला याचा सर्वाधिक फटका बसला. नांदगाव, नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, येवला या तालुक्यांमध्ये नुकसानीचे प्रमाण अत्यल्प आहे.

या अवकाळी पावसामुळे ३०२ हेक्टरवरील कांदा पिकाचे तसेच बाजरी, मिरची तसेच भाजीपाल्याचेदेखील काही प्रमाणात नुकसान झाले आहे. वार्षिक फळपिकांमध्ये आंबा पिकाचे नुकसान झाले. ४० हेक्टरवरील आंबा पिकाला याचा फटका बसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. एकूण ४५५.३३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सटाणा, नांदगाव तसेच कळवण तालुक्याला अवकाळी फटका बसला आहे. त्र्यंबकेश्वर तसेच इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनादेखील नुकसान सहन करावे लागले आहे.

कळवण तालुक्यातील २२१, नांदगावातील ९६, कळवणमधील २८८, त्र्यंबकेश्वरमधील १२५, इगतपुरीतील २४४ तसेच येवला तालुक्यातील २४३ शेतकऱ्यांना या नुकसानीचा फटका बसला आहे. बागायती क्षेत्रावरील सुमेरे ४१५, तर वार्षिक फळपिके क्षेत्रावरील ४० असे एकूण ४५५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, हवामान खात्याने पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली असल्यामुळे शेतकऱ्यांना अधिक चिंता लागली आहे.