शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील धरणसाठा निम्म्यावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:25 IST

गेल्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणे हाऊसफुल्ल झाली होती. त्यामुळे नदी, नाल्यांमध्ये पाणी सोडून देण्याची वेळ आली ...

गेल्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणे हाऊसफुल्ल झाली होती. त्यामुळे नदी, नाल्यांमध्ये पाणी सोडून देण्याची वेळ आली होती. पावसाळा संपुष्टात आल्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसाने दणका दिल्यामुळे धरणाच्या पाण्यावरचे अवलंबित्व कमी झाले. परिणामी पाण्याची मागणी घटली. परंतु जिल्ह्यातील काही भागात रब्बीची पिके घेतली जात असल्यामुळे त्यांच्यासाठी आवर्तन सोडावे लागले. पिण्याच्या पाण्याचे आरक्षण जाहीर झाल्याने त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी साठवून ठेवण्यात आले आहे. जानेवारी व फेब्रुवारीत काही प्रमाणात सिंचनासाठी पाणी सोडण्यात आल्याने मार्चच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ५९ टक्के इतका जलसाठा शिल्लक असून, मार्चच्या शेवटच्या आठवड्यात व एप्रिलमध्ये बहुतांश धरणांमधून उन्हाळी आवर्तन सोडावे लागणार आहे. गेल्या वर्षी हाच जलसाठा ६९ टक्के इतका होता.

पावसाळ्यात मराठवाड्यासाठी गंगापूर धरणातून द्यावे लागते, त्यापेक्षाही अधिक पाणी जायकवाडीसाठी यापूर्वीच सोडण्यात आल्याने यंदा मराठवाड्याला जिल्ह्यातील धरणांमधून पाणी देण्याची गरज नसल्याचे पाटबंधारे खात्याचे म्हणणे आहे. मात्र, दारणा धरणावर नगर जिल्ह्याचाही हक्क असल्यामुळे नजीकच्या काळात निफाड, सिन्नर, कोपरगाव, राहता, श्रीरामपूरसाठी पाणी सोडावे लागणार आहे. परंतु दारणातील ९१ टक्के जलसाठा पाहता पाण्याची फारशी टंचाई भासणार नाही. सध्या गंगापूर धरण समुहात ५६ टक्केच जलसाठा असून, त्यातून नाशिक शहराबरोबरच औष्णिक विद्युत प्रकल्प, रेल्वे, औद्योगिक वसाहतीला पाणी पुरवठा केला जातो. मात्र, गेल्या वर्षीपासून इगतपुरी तालुक्यातील मुकणे धरणातून नाशिक महापालिकेला पाणी पुरवठा होऊ लागल्यामुळे गंगापूर धरणावरील पाण्याचा ताण काही प्रमाणात कमी झाला आहे. असे असले तरी, यंदा मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच उन्हाचा तडाखा वाढला. त्यामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन झपाट्याने होण्याची शक्यता असून, परिणामी ग्रामीण भागात पाणी टंचाई भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, उपलब्ध जलसाठा पाहता पाटबंधारे खात्याने ही शक्यता फेटाळून लावली आहे.

चौकट===

जिल्ह्यातील धरणातील जलसाठ्याचे सिंचन व पिण्यासाठीचे आरक्षण यापूर्वीच करण्यात आले आहे. उन्हाचा कडाका व गळती याचा सारासार विचार करून पाण्याचे नियोजन योग्य असून, जुलैअखेर पिण्यासाठी पाणी पुरेल, यात शंका नाही.

- अलका अहिरराव, अधीक्षक अभियंता, पाटबंधारे