शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

जिल्ह्यातील धरणसाठा निम्म्यावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:25 IST

गेल्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणे हाऊसफुल्ल झाली होती. त्यामुळे नदी, नाल्यांमध्ये पाणी सोडून देण्याची वेळ आली ...

गेल्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणे हाऊसफुल्ल झाली होती. त्यामुळे नदी, नाल्यांमध्ये पाणी सोडून देण्याची वेळ आली होती. पावसाळा संपुष्टात आल्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसाने दणका दिल्यामुळे धरणाच्या पाण्यावरचे अवलंबित्व कमी झाले. परिणामी पाण्याची मागणी घटली. परंतु जिल्ह्यातील काही भागात रब्बीची पिके घेतली जात असल्यामुळे त्यांच्यासाठी आवर्तन सोडावे लागले. पिण्याच्या पाण्याचे आरक्षण जाहीर झाल्याने त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी साठवून ठेवण्यात आले आहे. जानेवारी व फेब्रुवारीत काही प्रमाणात सिंचनासाठी पाणी सोडण्यात आल्याने मार्चच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ५९ टक्के इतका जलसाठा शिल्लक असून, मार्चच्या शेवटच्या आठवड्यात व एप्रिलमध्ये बहुतांश धरणांमधून उन्हाळी आवर्तन सोडावे लागणार आहे. गेल्या वर्षी हाच जलसाठा ६९ टक्के इतका होता.

पावसाळ्यात मराठवाड्यासाठी गंगापूर धरणातून द्यावे लागते, त्यापेक्षाही अधिक पाणी जायकवाडीसाठी यापूर्वीच सोडण्यात आल्याने यंदा मराठवाड्याला जिल्ह्यातील धरणांमधून पाणी देण्याची गरज नसल्याचे पाटबंधारे खात्याचे म्हणणे आहे. मात्र, दारणा धरणावर नगर जिल्ह्याचाही हक्क असल्यामुळे नजीकच्या काळात निफाड, सिन्नर, कोपरगाव, राहता, श्रीरामपूरसाठी पाणी सोडावे लागणार आहे. परंतु दारणातील ९१ टक्के जलसाठा पाहता पाण्याची फारशी टंचाई भासणार नाही. सध्या गंगापूर धरण समुहात ५६ टक्केच जलसाठा असून, त्यातून नाशिक शहराबरोबरच औष्णिक विद्युत प्रकल्प, रेल्वे, औद्योगिक वसाहतीला पाणी पुरवठा केला जातो. मात्र, गेल्या वर्षीपासून इगतपुरी तालुक्यातील मुकणे धरणातून नाशिक महापालिकेला पाणी पुरवठा होऊ लागल्यामुळे गंगापूर धरणावरील पाण्याचा ताण काही प्रमाणात कमी झाला आहे. असे असले तरी, यंदा मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच उन्हाचा तडाखा वाढला. त्यामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन झपाट्याने होण्याची शक्यता असून, परिणामी ग्रामीण भागात पाणी टंचाई भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, उपलब्ध जलसाठा पाहता पाटबंधारे खात्याने ही शक्यता फेटाळून लावली आहे.

चौकट===

जिल्ह्यातील धरणातील जलसाठ्याचे सिंचन व पिण्यासाठीचे आरक्षण यापूर्वीच करण्यात आले आहे. उन्हाचा कडाका व गळती याचा सारासार विचार करून पाण्याचे नियोजन योग्य असून, जुलैअखेर पिण्यासाठी पाणी पुरेल, यात शंका नाही.

- अलका अहिरराव, अधीक्षक अभियंता, पाटबंधारे