शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
3
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
4
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
5
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
6
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
7
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
8
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
9
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
10
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
11
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
12
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
13
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
14
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
15
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
16
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
17
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
18
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
19
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
20
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे

जिल्ह्यातील धरणसाठा निम्म्यावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:25 IST

गेल्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणे हाऊसफुल्ल झाली होती. त्यामुळे नदी, नाल्यांमध्ये पाणी सोडून देण्याची वेळ आली ...

गेल्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणे हाऊसफुल्ल झाली होती. त्यामुळे नदी, नाल्यांमध्ये पाणी सोडून देण्याची वेळ आली होती. पावसाळा संपुष्टात आल्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसाने दणका दिल्यामुळे धरणाच्या पाण्यावरचे अवलंबित्व कमी झाले. परिणामी पाण्याची मागणी घटली. परंतु जिल्ह्यातील काही भागात रब्बीची पिके घेतली जात असल्यामुळे त्यांच्यासाठी आवर्तन सोडावे लागले. पिण्याच्या पाण्याचे आरक्षण जाहीर झाल्याने त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी साठवून ठेवण्यात आले आहे. जानेवारी व फेब्रुवारीत काही प्रमाणात सिंचनासाठी पाणी सोडण्यात आल्याने मार्चच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ५९ टक्के इतका जलसाठा शिल्लक असून, मार्चच्या शेवटच्या आठवड्यात व एप्रिलमध्ये बहुतांश धरणांमधून उन्हाळी आवर्तन सोडावे लागणार आहे. गेल्या वर्षी हाच जलसाठा ६९ टक्के इतका होता.

पावसाळ्यात मराठवाड्यासाठी गंगापूर धरणातून द्यावे लागते, त्यापेक्षाही अधिक पाणी जायकवाडीसाठी यापूर्वीच सोडण्यात आल्याने यंदा मराठवाड्याला जिल्ह्यातील धरणांमधून पाणी देण्याची गरज नसल्याचे पाटबंधारे खात्याचे म्हणणे आहे. मात्र, दारणा धरणावर नगर जिल्ह्याचाही हक्क असल्यामुळे नजीकच्या काळात निफाड, सिन्नर, कोपरगाव, राहता, श्रीरामपूरसाठी पाणी सोडावे लागणार आहे. परंतु दारणातील ९१ टक्के जलसाठा पाहता पाण्याची फारशी टंचाई भासणार नाही. सध्या गंगापूर धरण समुहात ५६ टक्केच जलसाठा असून, त्यातून नाशिक शहराबरोबरच औष्णिक विद्युत प्रकल्प, रेल्वे, औद्योगिक वसाहतीला पाणी पुरवठा केला जातो. मात्र, गेल्या वर्षीपासून इगतपुरी तालुक्यातील मुकणे धरणातून नाशिक महापालिकेला पाणी पुरवठा होऊ लागल्यामुळे गंगापूर धरणावरील पाण्याचा ताण काही प्रमाणात कमी झाला आहे. असे असले तरी, यंदा मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच उन्हाचा तडाखा वाढला. त्यामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन झपाट्याने होण्याची शक्यता असून, परिणामी ग्रामीण भागात पाणी टंचाई भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, उपलब्ध जलसाठा पाहता पाटबंधारे खात्याने ही शक्यता फेटाळून लावली आहे.

चौकट===

जिल्ह्यातील धरणातील जलसाठ्याचे सिंचन व पिण्यासाठीचे आरक्षण यापूर्वीच करण्यात आले आहे. उन्हाचा कडाका व गळती याचा सारासार विचार करून पाण्याचे नियोजन योग्य असून, जुलैअखेर पिण्यासाठी पाणी पुरेल, यात शंका नाही.

- अलका अहिरराव, अधीक्षक अभियंता, पाटबंधारे