शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

वस्तंूच्या खऱ्या किमतीबाबत ग्राहक अजूनही अंधारात

By admin | Updated: December 24, 2016 01:43 IST

प्रतीक्षा कायम : दहा वर्षांपासून कॉस्ट आॅफ प्रॉडक्शन दुर्लक्षित; उत्पादक आणि मध्यस्थीच्या साखळीत वस्तंूची मनमानी किंमत

नाशिक : एखादी वस्तू खरेदी करताना त्या वस्तूचे मूल्य योग्य आकारले आहे किंवा नाही हे पडताळून पाहण्याचा कोणताही अधिकार सद्यस्थितीत ग्राहकांकडे नाही. त्यामुळे उत्पादनावर छापलेली किंमत मुकाटपणे ग्राहकाला चुकते करावी लागते. ही एकतर्फी प्रक्रिया ग्राहकांवर अन्यायकारक असल्याने ग्राहकांना उत्पादानाचे ‘कॉस्ट आॅफ प्रॉडक्शन’ कळावे हा २००६ साली उपस्थित झालेला मुद्दा अजूनही दुर्लक्षितच आहे. ग्राहक हक्काबाबतचे अनेक कायदे करण्यात आले असले आणि त्याबाबत ग्राहक थोडेफार जागरूक झाले असले तरी ग्राहकांची पदोपदी फसवणूक ही होतच असते. एखाद्या वस्तूवर छापलेली किंमत एकवेळ समजण्यासारखी आहे, परंतु काही व्यावसायिक आपल्याच मर्जीप्रमाणे वस्तूंवर किमतीचे टॅग लावतात. त्याला कोणताही आधार नसतो. यासाठी वस्तूंचे कॉस्ट आॅफ प्रॉडक्शन संबंधित उत्पादनावर नमूद करण्यात यावे यासाठी ग्राहक पंचायतीने मोठी चळवळ उभारली होती. ग्राहक पंचायतीचे प्रणेते बिंदू माधव जोशी यांनी याबाबत आंदोलने केली, निवेदने दिली. मोठी चळवळ उभी राहिली होती; त्याची चर्चेपलीकडे दखल घेण्यात आली नाही. २००६ साली चंद्रपूरच्या एका खासदाराने संसदेत याबाबतच मुद्दा मांडला होता. एखाद्या वस्तूवर त्याचे उत्पादन शुल्क (कॉस्ट आॅफ प्रॉडक्शन) नमूद केले तर त्या वस्तूवर आकारण्यात आलेली किंमत वाजवी आहे की अवाजवी हे ग्राहकांना लक्षात येऊ शकेल. याबाबतचा कायदाच करावा, अशी मागणी त्यांनी संसदेत मांडली. समाजातूनही याबाबतचा जोर वाढत होता मात्र हे बिल संसदेपुढे चर्चेला येऊ शकले नाही आणि आता हा विषयच मागे पडला आहे. एखादी वस्तू तयार करण्यासाठी किती उत्पादन खर्च लागला याची नोंद संबंधित वस्तूवर असली तर निर्मिती खर्च आणि प्रत्यक्ष आकारण्यात येणारी किंमत यावरून ग्राहकाला त्या वस्तूच्या किमतीचा खरा अंदाज येऊ शकतो. याचसाठी निर्मिती खर्च नमूद करण्याचा मुद्दा पुढे आला होता, परंतु याबाबत शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने उत्पादन आणि मधले दलाल यांच्या साखळीत ग्राहकांना जादा किंमत द्यावी लागत आहे. उत्पादक आणि मध्यस्थ यांची साखळी तोडून ग्राहकांना कमीत कमी किमतीत वस्तू मिळावी असा ग्राहक कायदा असला तरी या व्यवस्थेला आळा बसलेला नाही.