शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गंभीर रुग्णही गृहविलगीकरणात; वर्षभरात सुमारे दोन टक्के रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:14 IST

गेल्यावर्षी काेरोनाचे संकट आल्यानंतर सुरुवातीला अनेक जण रुग्णालयात दाखल होण्याच्या कल्पनेेनेच धास्तावले होते. अनेकांना तर लक्षणेही कळत नसल्याने घरच्या ...

गेल्यावर्षी काेरोनाचे संकट आल्यानंतर सुरुवातीला अनेक जण रुग्णालयात दाखल होण्याच्या कल्पनेेनेच धास्तावले होते. अनेकांना तर लक्षणेही कळत नसल्याने घरच्या घरीच उपचार घेऊन गृहविलगीकरणातच राहाणे पसंत करत होते. नंतर मात्र अनेक जण त्यासाठी रुग्णालयातदेखील जाऊ लागले. नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या अत्यंत कमी झाली आणि फेब्रुवारीपासून हळूहळू रुग्ण वाढू लागले असले तरी त्यानंतर सुरुवातीला गृहविलगीकरणातील रुग्णांची संख्या अधिक होती. मात्र नंतर ही संख्या वाढू लागली. त्यानंतर पुन्हा रुग्णालये फुल्ल झाली. आता किरकोळ लक्षणे किंवा एचआरसीटी स्कोर कमी असल्याचे सांगून रुग्ण घरीच राहातात आणि नंतर प्रकृती गंभीर झाल्यानंतर रुग्णालयात दाखल होण्यासाठी धावपळ सुरू करतात. त्यामुळेही अनेकांच्या जिवावर बेतते. तथापि, हे प्रमाण फार नसून साधारणत: दोन टक्के असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे.

इन्फो....

घरच्या घरीच उपचार

काही बाधित घरीच उपचार घेणे पसंत करतात. रुग्णालयातील एकूण गर्दी आणि अन्य प्रकार बघता घरीच उपचार केलेले बरे असे काहींचे म्हणणे असते तर काहींचा त्यांच्या परिचित डॉक्टरांवर विश्वास असतो. त्यामुळेदेखील घरीच बरे होऊ, असा अनेकांना विश्वास असतो. काही रुग्ण घरी बरे होतातही, परंतु सर्वांच्याच बाबतीत असे घडत नाही.

इन्फो..

गृहविलगीकरणातील संख्या अधिक

गेल्यावर्षीपेक्षा यंंदा गृहविलगीकरणात राहणाऱ्यांची संख्या अधिक आहे. गेल्यावर्षी कोरोनाची भीती होती आणि विषाणूविषयी पुरेशी माहिती नसल्याने बाधित रुग्णालयात चटकन दाखल होत आता मात्र आधी ॲंटिजेन चाचणी मग आरटीपीसीआर, स्कॅनिंग, एचआरसीटी स्कोर अशा अनेक चाचण्या करून रुग्णांना दाखल होण्याबाबत सल्ला दिला जातो कित्येकदा रुग्णही दाखल होत नाहीत.

इन्फो...

कारणे काय?

यापूर्वी काही कारणांनी रुग्ण गृहविलगीकरणात घरीच राहात असले तरी सध्या तरी दाेन कारणांमुळे बाधित गृहविलगीकरणात राहाणे पसंत करतात. रुग्णालयात बेड मिळत नाही हे सर्वात महत्त्वाचे कारण तसेच बिल खूप येते ते परवडणार नाही म्हणून घरीच राहाणे पसंत करतात. दुसरी बाब कोरोना संसर्गाबाबत जागृती झाल्याने केव्हा उपचारासाठी दाखल व्हायचे हे रुग्ण ठरवतात.

इन्फो...

दोन टक्के रुग्णांचा घरीच मृत्यू

नाशिक शहरातील दोन टक्के रुग्णांचा घरीच मृत्यू झाल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. महापालिकेच्या वतीने कितीही नाकारण्यात आले असले तरी अनेक रुग्णांचा तर केवळ बेड मिळत नसल्याने मृत्यू झाल्याची नोंद आहे. अर्थात अशाप्रकारची शक्यता महापालिका नाकारता नसली तरी अलीकडच्या काळात अशा दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले.

कोट....

शहरात गृहविलगीकरणात राहण्याचे प्रमाण अधिक असले तरी घरी राहिल्याने मृत्यू झालेल्यांचे प्रमाण त्या तुलनेत कमी आहे. बेड मिळाले नसल्यानेच मृत्यू झाले असे म्हणता येणार नाही. अनेक ठिकाणी रुग्ण घरीच उपचार घेतात आणि प्रकृती गंभीर झाल्यानंतर उपचारासाठी धावपळ करतात.

- डॉ. बापुसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, महापालिका