शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

दुबार पेरणीचे संकट टळले, नदी-नाले मात्र कोरडेच राहिले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:15 IST

देवळा तालुक्यातील पूर्व भागातील मेशीसह डोंगरगाव परिसरात अद्यापपर्यंत जोरदार पाऊस झालेला नाही त्यामुळे शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे. या ...

देवळा तालुक्यातील पूर्व भागातील मेशीसह डोंगरगाव परिसरात अद्यापपर्यंत जोरदार पाऊस झालेला नाही त्यामुळे शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे. या वर्षी पावसाळा लवकर म्हणजेच मे महिन्यात सुरू झाला आहे. मे महिन्यात बदललेल्या वातावरणाचा पाऊस होता. त्या पावसावर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली मात्र त्यानंतर पावसाने मोठी ओढ दिली. परंतु ऐनवेळी रिमझीम पावसाने हजेरी लावल्याने दुबार पेरणीचे संकट टळले. रिमझिम पावसाने पिकांना जीवदान तर मिळालेच शिवाय खुंटलेली वाढ जोमाने होऊ लागली. खरिपात मका, बाजरी, भुईमूग, मूग, तूर याबरोबरच काही प्रमाणात सोयाबीनची लागवड आणि पेरणी केली आहे. मात्र अत्यल्प पावसाने पावसाळी कांदा लागवड रोडावली आहे. याचबरोबर जोरदार पाऊस नसल्याने विहिरीतील पाणी पातळी खोलवर गेली आहे. नदी, नाले, पाझरतलाव कोरडेठाक आहेत. सध्या अधूनमधून पावसाचा शिडकावा होत आहे. अधूनमधून जोरदार वारा सुरू आहेत परंतु त्यामुळे बळीराजा कमालीचा धास्तावला आहे. आगामी काळातील सर्व नियोजन कोलमडले आहे. जवळपास पावसाळ्याचे दोन महिने लोटले आहेत परंतु अद्यापपर्यंत जोरदार पाऊस झालेला नाही. मागील वर्षी याउलट चित्र होते. सध्या शेतकरी वर्गाचे डोळे आकाशाकडे लागले असून सर्वांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.