शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे”: सरसंघचालक मोहन भागवत
2
“मोदी सरकार काय लपवायचा प्रयत्न करत आहे?”; SIR वरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा सवाल
3
नगरपरिषद निवडणुकांसाठी एकनाथ शिंदेंचा धडका, १० दिवसांत ५३ सभा; जनता कौल देईल का?
4
पुतिन यांच्या भारत दौऱ्यात सर्वात मोठ्या डीलची तयारी...! संपूर्ण जग बघत राहणार, पाकिस्तान-चीनचं टेन्शन वाढणार
5
“CM असताना अडीच तासांपेक्षा जास्त कधी झोपलो नाही, विरोधकांची झोप उडवली”: एकनाथ शिंदे
6
महापरिनिर्वाण दिन २०२५: मध्य रेल्वे अतिरिक्त विशेष लोकल सेवा चालवणार; पाहा, वेळापत्रक
7
"...तर ताबडतोब देश सोडा!", डोनाल्ड ट्रम्प यांची मादुरो यांना फोनवर थेट धमकी; अमेरिका-व्हेनेझुएला युद्ध पेटणार?
8
अंत्यविधीसाठी कुटुंब परगावी, चोरट्यांनी साधली संधी; वॉशिंग मशीनमधील दागिने-पैसे केले लंपास
9
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
10
याला म्हणतात 'इंटरनॅशनल बेइज्जती'! रशियन तरुणींना कोणत्या देशाचे तरुण सर्वाधिक आवडतात? पाकिस्तानी ब्लॉगरचा VIDEO पाहून हसू आवरणार नाही!
11
VIDEO : रोहित-गंभीर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममधील व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा
12
SIR वरुन पश्चिम बंगालमध्ये तणाव वाढला; कोलकात्यात शेकडो BLO चे तीव्र आंदोलन...
13
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
14
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
15
तीन स्मार्ट मैत्रिणी अन् महिन्याला लाखोंची कमाई ! ब्रम्होसची माहिती देत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांतला केवळ तीन वर्षांची शिक्षा
16
लैंगिक शोषणाच्या तक्रारींची भिती दाखवणाऱ्या प्राध्यापकाला इतकी सौम्य शिक्षा कशी? चार प्राध्यापकांची केली होती फसवणूक
17
IND vs SA: रोहित शर्मासोबत एअरपोर्टवर नेमकं काय घडलं? विराट कोहलीही टक लावून बघतच बसला...
18
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
19
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
20
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरमधमेश्वर बंधारा आटल्याने संकट

By admin | Updated: April 25, 2017 01:21 IST

निफाडतालुक्यात पिण्याच्या पाण्याची आज जरी तितकीशी टंचाई नसली तरी लवकरच टंचाईची समस्या भासू शकते, अशी एकूणच धरणांची अवस्था बघितल्यास दिसून येते

 संदीप चकोर निफाडतालुक्यात पिण्याच्या पाण्याची आज जरी तितकीशी टंचाई नसली तरी लवकरच टंचाईची समस्या भासू शकते, अशी एकूणच धरणांची अवस्था बघितल्यास दिसून येते. निफाड तालुक्यात यावर्षी अद्यापपर्यंत एकही टँकर चालू नसून नवीन एकाही गावातून टँकरची मागणी आली नसल्याची माहिती निफाडच्या गटविकास अधिकारी वैशाली रसाळ यांनी दिली.निफाड तालुक्यात एकूण १३५ गावे असून, या तालुक्याची लोकसंख्या ४,९३,२५१ एवढी आहे. मागील वर्षी शेवटच्या टप्प्यात पाऊस चांगला झाल्याने अजूनतरी पिण्याच्या पाण्याबाबत या तालुक्यात गंभीर समस्या निर्माण झालेली नाही. पाणीटंचाई कृती आराखड्याचा पहिला टप्पा आॅक्टोम्बर ते डिसेंबर आणि दुसरा टप्पा जानेवारी ते मार्च असा असतो. या दोन्ही टप्प्यात या तालुक्यातून एकही टँकरची मागणी आलेली नाही. मात्र एप्रिलमध्ये तालुक्याच्या उत्तर भागातील तळवाडे या गावातून कूपनलिका अधिग्रहण करण्याबाबतचा प्रस्ताव जि. प. लघु पाटबंधारे विभागाकडे आलेला आहे. पाणीटंचाई कृती आराखडा हा एप्रिल ते जून यादरम्यानसाठी तयार करण्यात आला असून, या तिसऱ्या टप्प्यात या तालुक्यात १८ गावांत आणि दोन वाड्यांत विहीर अधिग्रहण करणे आणि १४ गावे व सहा वाडी-वस्तीत टँकरने पाणीपुरवठा करणे अशी कामे प्रस्तावित आहेत.मागील वर्षी या तालुक्यात जलयुक्त शिवाराची ३३ कामे झालेली आहेत. गोदाकाठच्या महाजनपूर, पिंपळगाव निपाणी, भेंडाळी, औरंगपूर, तळवाडे या गावांत सीमेंट बंधारे, तलाव बांधणे, तलावातील गाळ काढणे व इतर कामे करण्यात आली होती. शिवाय काही नद्यांमधील गाळ शासन आणि लोकसहभागातून काढण्यात आला होता. या कामाचा नक्कीच बऱ्यापैकी फायदा शेतकऱ्यांना झाला. मात्र यावर्षी या बंधारे आणि तलावातील पाणी पूर्ण आटून गेले आहे. या तालुक्यात मागील वर्षी जरी शेवटच्या टप्प्यात जोरदार पाऊस झाला व नद्यांना पूर आले तरी तो पाऊस मुसळधार वेगाने असल्याने पावसाचे पाणी जमिनीवरून जादा प्रमाणात वाहून गेले व जमिनीत कमी मुरले. त्यामुळे या तालुक्यात यावर्षी काही गावांत फेब्रुवारी महिन्यात जमिनीत भूजल पातळी खाली गेल्याने शेतकऱ्यांनी बोअरवेल करायला सुरु वात केली आहे, तर काहींनी विहिरी खोल करण्याची कामे हाती घेतली आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये पाणीटंचाईची खरी स्थिती समोर येईल. कारण मागील वर्षी जुलै महिन्यात या तालुक्यातील २० गावांत २८ टँकर चालू होते. विशेष म्हणजे, २० पैकी १६ गावे ही तालुक्याच्या पूर्व भागातील, तर चार गावे दक्षिण, गोदाकाठ भागातील होती. विशेष म्हणजे, २०१६ पूर्वी या तालुक्यात दरवर्षी उन्हाळ्यात ३ ते ५ टँकरची मागणी असायची. यावर्षी एप्रिल, मेमध्ये भूजल पातळीवर किती परिणाम होतो यावर प्रशासनाला लक्ष ठेवून पिण्याच्या पाण्याबाबत दक्ष राहून नियोजन करावे लागेल.