शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

नांदूरमधमेश्वर बंधारा आटल्याने संकट

By admin | Updated: April 25, 2017 01:21 IST

निफाडतालुक्यात पिण्याच्या पाण्याची आज जरी तितकीशी टंचाई नसली तरी लवकरच टंचाईची समस्या भासू शकते, अशी एकूणच धरणांची अवस्था बघितल्यास दिसून येते

 संदीप चकोर निफाडतालुक्यात पिण्याच्या पाण्याची आज जरी तितकीशी टंचाई नसली तरी लवकरच टंचाईची समस्या भासू शकते, अशी एकूणच धरणांची अवस्था बघितल्यास दिसून येते. निफाड तालुक्यात यावर्षी अद्यापपर्यंत एकही टँकर चालू नसून नवीन एकाही गावातून टँकरची मागणी आली नसल्याची माहिती निफाडच्या गटविकास अधिकारी वैशाली रसाळ यांनी दिली.निफाड तालुक्यात एकूण १३५ गावे असून, या तालुक्याची लोकसंख्या ४,९३,२५१ एवढी आहे. मागील वर्षी शेवटच्या टप्प्यात पाऊस चांगला झाल्याने अजूनतरी पिण्याच्या पाण्याबाबत या तालुक्यात गंभीर समस्या निर्माण झालेली नाही. पाणीटंचाई कृती आराखड्याचा पहिला टप्पा आॅक्टोम्बर ते डिसेंबर आणि दुसरा टप्पा जानेवारी ते मार्च असा असतो. या दोन्ही टप्प्यात या तालुक्यातून एकही टँकरची मागणी आलेली नाही. मात्र एप्रिलमध्ये तालुक्याच्या उत्तर भागातील तळवाडे या गावातून कूपनलिका अधिग्रहण करण्याबाबतचा प्रस्ताव जि. प. लघु पाटबंधारे विभागाकडे आलेला आहे. पाणीटंचाई कृती आराखडा हा एप्रिल ते जून यादरम्यानसाठी तयार करण्यात आला असून, या तिसऱ्या टप्प्यात या तालुक्यात १८ गावांत आणि दोन वाड्यांत विहीर अधिग्रहण करणे आणि १४ गावे व सहा वाडी-वस्तीत टँकरने पाणीपुरवठा करणे अशी कामे प्रस्तावित आहेत.मागील वर्षी या तालुक्यात जलयुक्त शिवाराची ३३ कामे झालेली आहेत. गोदाकाठच्या महाजनपूर, पिंपळगाव निपाणी, भेंडाळी, औरंगपूर, तळवाडे या गावांत सीमेंट बंधारे, तलाव बांधणे, तलावातील गाळ काढणे व इतर कामे करण्यात आली होती. शिवाय काही नद्यांमधील गाळ शासन आणि लोकसहभागातून काढण्यात आला होता. या कामाचा नक्कीच बऱ्यापैकी फायदा शेतकऱ्यांना झाला. मात्र यावर्षी या बंधारे आणि तलावातील पाणी पूर्ण आटून गेले आहे. या तालुक्यात मागील वर्षी जरी शेवटच्या टप्प्यात जोरदार पाऊस झाला व नद्यांना पूर आले तरी तो पाऊस मुसळधार वेगाने असल्याने पावसाचे पाणी जमिनीवरून जादा प्रमाणात वाहून गेले व जमिनीत कमी मुरले. त्यामुळे या तालुक्यात यावर्षी काही गावांत फेब्रुवारी महिन्यात जमिनीत भूजल पातळी खाली गेल्याने शेतकऱ्यांनी बोअरवेल करायला सुरु वात केली आहे, तर काहींनी विहिरी खोल करण्याची कामे हाती घेतली आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये पाणीटंचाईची खरी स्थिती समोर येईल. कारण मागील वर्षी जुलै महिन्यात या तालुक्यातील २० गावांत २८ टँकर चालू होते. विशेष म्हणजे, २० पैकी १६ गावे ही तालुक्याच्या पूर्व भागातील, तर चार गावे दक्षिण, गोदाकाठ भागातील होती. विशेष म्हणजे, २०१६ पूर्वी या तालुक्यात दरवर्षी उन्हाळ्यात ३ ते ५ टँकरची मागणी असायची. यावर्षी एप्रिल, मेमध्ये भूजल पातळीवर किती परिणाम होतो यावर प्रशासनाला लक्ष ठेवून पिण्याच्या पाण्याबाबत दक्ष राहून नियोजन करावे लागेल.