शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

नांदूरमधमेश्वर बंधारा आटल्याने संकट

By admin | Updated: April 25, 2017 01:21 IST

निफाडतालुक्यात पिण्याच्या पाण्याची आज जरी तितकीशी टंचाई नसली तरी लवकरच टंचाईची समस्या भासू शकते, अशी एकूणच धरणांची अवस्था बघितल्यास दिसून येते

 संदीप चकोर निफाडतालुक्यात पिण्याच्या पाण्याची आज जरी तितकीशी टंचाई नसली तरी लवकरच टंचाईची समस्या भासू शकते, अशी एकूणच धरणांची अवस्था बघितल्यास दिसून येते. निफाड तालुक्यात यावर्षी अद्यापपर्यंत एकही टँकर चालू नसून नवीन एकाही गावातून टँकरची मागणी आली नसल्याची माहिती निफाडच्या गटविकास अधिकारी वैशाली रसाळ यांनी दिली.निफाड तालुक्यात एकूण १३५ गावे असून, या तालुक्याची लोकसंख्या ४,९३,२५१ एवढी आहे. मागील वर्षी शेवटच्या टप्प्यात पाऊस चांगला झाल्याने अजूनतरी पिण्याच्या पाण्याबाबत या तालुक्यात गंभीर समस्या निर्माण झालेली नाही. पाणीटंचाई कृती आराखड्याचा पहिला टप्पा आॅक्टोम्बर ते डिसेंबर आणि दुसरा टप्पा जानेवारी ते मार्च असा असतो. या दोन्ही टप्प्यात या तालुक्यातून एकही टँकरची मागणी आलेली नाही. मात्र एप्रिलमध्ये तालुक्याच्या उत्तर भागातील तळवाडे या गावातून कूपनलिका अधिग्रहण करण्याबाबतचा प्रस्ताव जि. प. लघु पाटबंधारे विभागाकडे आलेला आहे. पाणीटंचाई कृती आराखडा हा एप्रिल ते जून यादरम्यानसाठी तयार करण्यात आला असून, या तिसऱ्या टप्प्यात या तालुक्यात १८ गावांत आणि दोन वाड्यांत विहीर अधिग्रहण करणे आणि १४ गावे व सहा वाडी-वस्तीत टँकरने पाणीपुरवठा करणे अशी कामे प्रस्तावित आहेत.मागील वर्षी या तालुक्यात जलयुक्त शिवाराची ३३ कामे झालेली आहेत. गोदाकाठच्या महाजनपूर, पिंपळगाव निपाणी, भेंडाळी, औरंगपूर, तळवाडे या गावांत सीमेंट बंधारे, तलाव बांधणे, तलावातील गाळ काढणे व इतर कामे करण्यात आली होती. शिवाय काही नद्यांमधील गाळ शासन आणि लोकसहभागातून काढण्यात आला होता. या कामाचा नक्कीच बऱ्यापैकी फायदा शेतकऱ्यांना झाला. मात्र यावर्षी या बंधारे आणि तलावातील पाणी पूर्ण आटून गेले आहे. या तालुक्यात मागील वर्षी जरी शेवटच्या टप्प्यात जोरदार पाऊस झाला व नद्यांना पूर आले तरी तो पाऊस मुसळधार वेगाने असल्याने पावसाचे पाणी जमिनीवरून जादा प्रमाणात वाहून गेले व जमिनीत कमी मुरले. त्यामुळे या तालुक्यात यावर्षी काही गावांत फेब्रुवारी महिन्यात जमिनीत भूजल पातळी खाली गेल्याने शेतकऱ्यांनी बोअरवेल करायला सुरु वात केली आहे, तर काहींनी विहिरी खोल करण्याची कामे हाती घेतली आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये पाणीटंचाईची खरी स्थिती समोर येईल. कारण मागील वर्षी जुलै महिन्यात या तालुक्यातील २० गावांत २८ टँकर चालू होते. विशेष म्हणजे, २० पैकी १६ गावे ही तालुक्याच्या पूर्व भागातील, तर चार गावे दक्षिण, गोदाकाठ भागातील होती. विशेष म्हणजे, २०१६ पूर्वी या तालुक्यात दरवर्षी उन्हाळ्यात ३ ते ५ टँकरची मागणी असायची. यावर्षी एप्रिल, मेमध्ये भूजल पातळीवर किती परिणाम होतो यावर प्रशासनाला लक्ष ठेवून पिण्याच्या पाण्याबाबत दक्ष राहून नियोजन करावे लागेल.