शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीच्या मागणीने समुपदेशन अडचणीत

By admin | Updated: April 1, 2017 01:58 IST

नाशिक : नापिकी, कर्जबाजारीपणामुळे गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येचे प्रमाण कायम असून, तीन महिन्यांत सोळा शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे.

नाशिक : नापिकी, कर्जबाजारीपणामुळे गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येचे प्रमाण कायम असून, तीन महिन्यांत सोळा शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. शेतकऱ्यांना समुपदेशन नको तर कर्जमाफी हवी असल्याने आत्महत्त्येच्या उंबरठ्यावर असलेल्या शेतकऱ्यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी प्रशासनाने त्यांचे समुपदेशन करण्याचा हाती घेतलेला उपक्रमही थांबविण्यात आला आहे.  गेल्या वर्षीच प्रशासनाने शेतकऱ्यांचे समुपदेशन करण्याचा उपक्रम हाती घेतला होता. गावोगावच्या तलाठ्यांकडून कर्जबाजारी शेतकऱ्यांची माहिती संकलित करून, अशा कर्जदार शेतकऱ्यांचे सामूहिक मेळावे घेऊन त्यांना कर्जबाजारीपणातून सुटका करण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात येत होते, त्यात त्यांच्या कर्जांचे पुनर्गठण करणे, शेतीसाठी शासनाच्या अन्य योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे प्रकारही प्रशासनाने हाती घेतले. त्याचबरोबरच जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांसाठी हेल्पलाइनही सुरू करण्यात आली होती व त्यात कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या समस्यांची नोंदी घेऊन त्यांच्या घरापर्यंत महसूल अधिकारी भेट देत व शेतकऱ्याची समस्या समजूत काढण्याचा प्रकारही केला जात होता. असे असतानाही गेल्या वर्षी जानेवारी ते डिसेंबरअखेर जिल्ह्णात ८५ शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या. शेतकऱ्यांचे समुपदेशन करून त्यांना त्यापासून प्रवृत्त करण्यासाठी समुपदेशन पुन्हा सुरू करण्याचा विचार असला तरी, असा प्रयत्न केला असता, शेतकऱ्यांनी थेट प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे कर्जमाफीची गळ घालण्यास सुरुवात केली आहे. आत्महत्त्या करणार नाही, पण कर्ज माफ करा, अशी मागणी गावोगावी होत आहे. कर्जमाफीचा विषय महसूल अधिकाऱ्यांच्या अखत्यारित नसल्यामुळे समुपदेशन करताना काय आश्वासन द्यावे, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडू लागला आहे. त्यामुळे समुपदेशन करून उगीच वातावरण कलुषित होऊ नये म्हणून त्याऐवजी अन्य काही पर्याय शोधण्यात येत आहे.  गेल्या वर्षी पाऊस चांगला होऊन खरीप भरभरून पीक दिल्यामुळे चालू वर्षी शेतकरी आत्महत्त्या करणार नसल्याचा अंदाज बांधण्यात आला होता. तथापि, जानेवारी महिन्यापासूनच आत्महत्त्येचे सत्र पुन्हा सुरू झाले असून, महिन्या काठी पाच ते सहा शेतकरी आत्महत्त्या करू लागले आहेत. आत्महत्त्या करणाऱ्यांमध्ये बहुतांशी कर्जबाजारी शेतकऱ्यांचा समावेश आहे व विशेष म्हणजे तरुण शेतकरी जीवनयात्रा संपवित असल्याने प्रशासन चिंतित आहे.