शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
3
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
4
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
5
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
6
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
7
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
8
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
9
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
10
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
11
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
12
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
13
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
14
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
15
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
16
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
17
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
18
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
19
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
20
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या

कर्जमाफीच्या मागणीने समुपदेशन अडचणीत

By admin | Updated: April 1, 2017 01:58 IST

नाशिक : नापिकी, कर्जबाजारीपणामुळे गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येचे प्रमाण कायम असून, तीन महिन्यांत सोळा शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे.

नाशिक : नापिकी, कर्जबाजारीपणामुळे गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येचे प्रमाण कायम असून, तीन महिन्यांत सोळा शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. शेतकऱ्यांना समुपदेशन नको तर कर्जमाफी हवी असल्याने आत्महत्त्येच्या उंबरठ्यावर असलेल्या शेतकऱ्यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी प्रशासनाने त्यांचे समुपदेशन करण्याचा हाती घेतलेला उपक्रमही थांबविण्यात आला आहे.  गेल्या वर्षीच प्रशासनाने शेतकऱ्यांचे समुपदेशन करण्याचा उपक्रम हाती घेतला होता. गावोगावच्या तलाठ्यांकडून कर्जबाजारी शेतकऱ्यांची माहिती संकलित करून, अशा कर्जदार शेतकऱ्यांचे सामूहिक मेळावे घेऊन त्यांना कर्जबाजारीपणातून सुटका करण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात येत होते, त्यात त्यांच्या कर्जांचे पुनर्गठण करणे, शेतीसाठी शासनाच्या अन्य योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे प्रकारही प्रशासनाने हाती घेतले. त्याचबरोबरच जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांसाठी हेल्पलाइनही सुरू करण्यात आली होती व त्यात कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या समस्यांची नोंदी घेऊन त्यांच्या घरापर्यंत महसूल अधिकारी भेट देत व शेतकऱ्याची समस्या समजूत काढण्याचा प्रकारही केला जात होता. असे असतानाही गेल्या वर्षी जानेवारी ते डिसेंबरअखेर जिल्ह्णात ८५ शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या. शेतकऱ्यांचे समुपदेशन करून त्यांना त्यापासून प्रवृत्त करण्यासाठी समुपदेशन पुन्हा सुरू करण्याचा विचार असला तरी, असा प्रयत्न केला असता, शेतकऱ्यांनी थेट प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे कर्जमाफीची गळ घालण्यास सुरुवात केली आहे. आत्महत्त्या करणार नाही, पण कर्ज माफ करा, अशी मागणी गावोगावी होत आहे. कर्जमाफीचा विषय महसूल अधिकाऱ्यांच्या अखत्यारित नसल्यामुळे समुपदेशन करताना काय आश्वासन द्यावे, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडू लागला आहे. त्यामुळे समुपदेशन करून उगीच वातावरण कलुषित होऊ नये म्हणून त्याऐवजी अन्य काही पर्याय शोधण्यात येत आहे.  गेल्या वर्षी पाऊस चांगला होऊन खरीप भरभरून पीक दिल्यामुळे चालू वर्षी शेतकरी आत्महत्त्या करणार नसल्याचा अंदाज बांधण्यात आला होता. तथापि, जानेवारी महिन्यापासूनच आत्महत्त्येचे सत्र पुन्हा सुरू झाले असून, महिन्या काठी पाच ते सहा शेतकरी आत्महत्त्या करू लागले आहेत. आत्महत्त्या करणाऱ्यांमध्ये बहुतांशी कर्जबाजारी शेतकऱ्यांचा समावेश आहे व विशेष म्हणजे तरुण शेतकरी जीवनयात्रा संपवित असल्याने प्रशासन चिंतित आहे.