शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ३२ बळींसह कोरोनाचा उच्चांंक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:16 IST

नाशिक : कोरोनाच्या भयानक उद्रेकासह बळींच्या वाढत जाणाऱ्या आकड्याने मंगळवारी (दि. ६) आतापर्यंतच्या एकाच दिवसातील बळींचा उच्चांक गाठला आहे. ...

नाशिक : कोरोनाच्या भयानक उद्रेकासह बळींच्या वाढत जाणाऱ्या आकड्याने मंगळवारी (दि. ६) आतापर्यंतच्या एकाच दिवसातील बळींचा उच्चांक गाठला आहे. मंगळवारी तब्बल ३२ बळींची नोंद झाली असून, गतवर्षाच्या सर्वाधिक बळींपेक्षाही हा आकडा दोनने अधिक आहे. दरम्यान, बाधित संख्येने ४,६८३ पर्यंत मजल मारली असून, एकूण ३,१९१ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये २,८९४, तर नाशिक ग्रामीणला १,५४३ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात ११९ व जिल्हाबाह्य ८२ रुग्ण बाधित आहेत. दरम्यान, जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात ११, ग्रामीणला १६, तर मालेगावला ३ आणि जिल्हाबाह्य २, असा एकूण ३२ जणांचा बळी गेल्याने आरोग्य यंत्रणेसमोरदेखील बळी रोखण्याचे सर्वात मोठे आव्हान निर्माण झाले आहे. गत पंधरवड्यापासून कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने तीन हजार आणि चार हजारांवर राहिल्यानंतर पुन्हा बाधित संख्येची वाटचाल पाच हजारांच्या दिशेने सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कठोर निर्बंधापेक्षाही कठोर उपाययोजना अत्यावश्यक असल्याची चर्चा आहे.

इन्फो

गतवर्षापेक्षा २ अधिक

जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येच्या बरोबरीने मृत्यूदराचीही वाटचाल उच्चांकाकडे होऊ लागली आहे. गतवर्षी ६ ऑगस्टला ३० तर १६ सप्टेंबरला २९ इतक्या सर्वोच्च बळींची नोंद जिल्ह्यात झाली होती. मात्र, गतवर्षीच्या सर्वाधिक बळींपेक्षाही २ अधिक बळी मंगळवारी नोंदले गेल्याने ही बळींची वाढच जिल्ह्यासाठी घातक ठरण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, प्रलंबित अहवालाची संख्या पुन्हा एकदा सहा हजारांवर अर्थात ६,७९२ वर पोहोचली आहे.

इन्फो

ग्रामीणचे बळी शहरापेक्षा अधिक

जिल्ह्यातील ३२ बळींपैकी तब्बल निम्मे म्हणजे १६ बळी हे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नोंदले गेले आहेत. हे बळी शहरातील बळींपेक्षाही अधिक आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातदेखील बळींचे तांडव सुरू झाल्याने आरोग्य विभागाला आता ग्रामीण भागावरदेखील अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज निर्माण झाली आहे. एकूण मृत्यूसंख्या अडीच हजाराचा आकडा ओलांडून २,५२९ पर्यंत पोहोचली आहे.

इन्फो

उपचारार्थी ३२ हजारांवर

जिल्ह्यातील उपचारार्थी रुग्णसंख्यादेखील सर्वाधिक स्तरावर असून, सध्या ३२ हजार १६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात नाशिक महापालिका क्षेत्रात १९ हजार २५६, नाशिक ग्रामीणला १० हजार ५२७, मालेगाव मनपाला २,१३४ तर जिल्हाबाह्य २५१ रुग्णांचा त्यात समावेश आहे.