शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलनापर्यंत कोरोनाची स्थिती आटोक्यात येईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:16 IST

नाशिकमध्ये आयोजित मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रक, लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी मंगळवारी (दि.२३) यांनी हे स्पष्टीकरण आहे. कोरोना ...

नाशिकमध्ये आयोजित मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रक, लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी मंगळवारी (दि.२३) यांनी हे स्पष्टीकरण आहे. कोरोना काळामुळे नाशिकमध्ये साहित्य संमेलन व्हावे की नको याबाबत अनेक मतेमतांतरे सुरुवातीपासूनच होती. मात्र, नंतर कोरोनासंदर्भात आरोग्य नियमांची काळजी घेतली जाईल. सुरक्षित अंतरासाठीच संमेलनस्थळी मोठे मैदान घेण्यात आले आहे, रुग्णालयात खाटादेखील राखीव ठेवण्यात येतील, असे सांगून आयोजकांनी संमेलनाचे समर्थन केले होते. मात्र, गेल्या काही दिवसांत कोराेनाबाधितांची संख्या पाहता जिल्ह्यात जमावबंदी आदेश जारी करण्यात आला असून, सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यातच संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना कोरोना संसर्ग झाला असून, त्याच्या आदल्याच दिवशी म्हणजेच रविवारी (दि.२१) पालकमंत्री भुजबळ आणि साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकरराव ठाले पाटील यांच्यात बैठक झाली होती. त्यानंतर नाशिकमध्ये तूर्तास रात्री संचारबंदीदेखील लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संमेलन होईल किंवा नाही याबाबत प्रश्न केले जात असताना लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी मात्र संमेलनापर्यंत परिस्थिती नियंत्रणात येईल, असे सांगून आशावाद व्यक्त केला आहे.

साहित्य संमेलनासाठी जोरदार तयारी सुरू असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता घेण्यात येत आहे. अनेक समित्यांच्या बैठका ऑनलाइन, तर काही समित्यांच्या प्रत्यक्ष बैठका घेताना आरोग्य नियमांचे पालन केले जात आहे. संमेलनासाठी एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी आहे. शासनाचे धोरण आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे लवकरच परिस्थिती निवळेल, असे आशादायी चित्र असल्याचे जातेगावकर यांनी नमूद केले आहे.

कोट...

सध्या तरी वाट पाहणे हीच भूमिका ठेवावी लागणार आहे. शासनाच्या त्या वेळच्या निर्देशानुसार संमेलन पार पडेल. तसा वेगळा निर्णय घेण्याची वेळ आलीच, तर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि संमेलनाची स्वागत समिती सल्लामसलत करून योग्य तो निर्णय घेतील.

-जयप्रकाश जातेगावकर, अध्यक्ष, लोकहितवादी मंडळ