शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
4
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
5
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
6
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
7
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा सणसणीत टोला
8
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
9
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
10
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
11
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
12
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
13
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
14
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
15
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
16
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
17
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
18
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
19
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
20
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!

साहित्य संमेलनापर्यंत कोरोनाची स्थिती आटोक्यात येईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:16 IST

नाशिकमध्ये आयोजित मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रक, लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी मंगळवारी (दि.२३) यांनी हे स्पष्टीकरण आहे. कोरोना ...

नाशिकमध्ये आयोजित मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रक, लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी मंगळवारी (दि.२३) यांनी हे स्पष्टीकरण आहे. कोरोना काळामुळे नाशिकमध्ये साहित्य संमेलन व्हावे की नको याबाबत अनेक मतेमतांतरे सुरुवातीपासूनच होती. मात्र, नंतर कोरोनासंदर्भात आरोग्य नियमांची काळजी घेतली जाईल. सुरक्षित अंतरासाठीच संमेलनस्थळी मोठे मैदान घेण्यात आले आहे, रुग्णालयात खाटादेखील राखीव ठेवण्यात येतील, असे सांगून आयोजकांनी संमेलनाचे समर्थन केले होते. मात्र, गेल्या काही दिवसांत कोराेनाबाधितांची संख्या पाहता जिल्ह्यात जमावबंदी आदेश जारी करण्यात आला असून, सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यातच संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना कोरोना संसर्ग झाला असून, त्याच्या आदल्याच दिवशी म्हणजेच रविवारी (दि.२१) पालकमंत्री भुजबळ आणि साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकरराव ठाले पाटील यांच्यात बैठक झाली होती. त्यानंतर नाशिकमध्ये तूर्तास रात्री संचारबंदीदेखील लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संमेलन होईल किंवा नाही याबाबत प्रश्न केले जात असताना लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी मात्र संमेलनापर्यंत परिस्थिती नियंत्रणात येईल, असे सांगून आशावाद व्यक्त केला आहे.

साहित्य संमेलनासाठी जोरदार तयारी सुरू असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता घेण्यात येत आहे. अनेक समित्यांच्या बैठका ऑनलाइन, तर काही समित्यांच्या प्रत्यक्ष बैठका घेताना आरोग्य नियमांचे पालन केले जात आहे. संमेलनासाठी एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी आहे. शासनाचे धोरण आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे लवकरच परिस्थिती निवळेल, असे आशादायी चित्र असल्याचे जातेगावकर यांनी नमूद केले आहे.

कोट...

सध्या तरी वाट पाहणे हीच भूमिका ठेवावी लागणार आहे. शासनाच्या त्या वेळच्या निर्देशानुसार संमेलन पार पडेल. तसा वेगळा निर्णय घेण्याची वेळ आलीच, तर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि संमेलनाची स्वागत समिती सल्लामसलत करून योग्य तो निर्णय घेतील.

-जयप्रकाश जातेगावकर, अध्यक्ष, लोकहितवादी मंडळ