शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया खंडात नव्या युद्धाचे संकेत ! तैवानच्या एअरस्पेसमध्ये २१ चिनी लढाऊ विमानांची घुसखोरी
2
कर्तव्यदक्ष महिला अधिकारी सोनाली मिश्रा सांभाळणार रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालकपद
3
गुडन्यूज! कियारा अडवाणीने दिला गोंडस मुलीला जन्म; सिद्धार्थ मल्होत्रा झाला 'नन्हीं परी'चा बाबा
4
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
5
'चॉकलेट हवं असेल तर...' म्हणत ८ वर्षांच्या चिमुरडीवर जंगलात नेऊन अत्याचार, आरोपी मुलगाही अल्पवयीनच !
6
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
7
तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"
8
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
9
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
10
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
11
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
12
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
13
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

कोरोना बळी २५०० वर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:15 IST

नाशिक : जिल्ह्यात गत महिनाभरापासून कोरोना बळींच्या प्रमाणात मोठ्या वेगाने वाढ झाली असून त्यामुळे कोरोनाने अल्पावधीतच २५०० ...

नाशिक : जिल्ह्यात गत महिनाभरापासून कोरोना बळींच्या प्रमाणात मोठ्या वेगाने वाढ झाली असून त्यामुळे कोरोनाने अल्पावधीतच २५०० बळींचा टप्पा पार केला आहे. अखेरच्या ५०० बळींपैकी निम्म्याहून अधिक बळी हे केवळ १५ दिवसांतील असल्याने चिंतेच्या सावटात अधिकच भर पडली आहे.

कोरोनाच्या वाढत्या संख्येपेक्षाही बळींचे वाढते प्रमाण जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या दृष्टीने अधिक घातक ठरू लागले आहे. किंबहुना कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्याच्या बाहेर जात असली तरी किमान बळींवर नियंत्रण मिळवता यावे, यासाठी प्रशासन आटोकाट प्रयत्न करीत आहे. तरीदेखील दिवसाला साधारणपणे २० ते २५ बळी जाऊ लागल्याने कोरोनाचा मृत्युदरदेखील वाढू लागला आहे. त्यामुळेच राज्यात सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या रुग्णसंख्येबरोबरच सर्वाधिक बळींच्या प्रमाणातही नाशिक जिल्हा पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये दिसू लागला आहे.

नाशिक जिल्ह्यातील पहिला रुग्ण गतवर्षी २९ मार्च रोजी आढळला होता. मात्र त्यानंतर एप्रिलच्या मध्यानंतर गेलेला पहिला बळी हा जिल्ह्यातील कोरोना बळीचा प्रारंभ होता. त्यानंतर कोरोनाचा वेग हळूहळू वाढत गेला, तशी बळींची संख्यादेखील वेगाने वाढू लागली.

इन्फो

प्रारंभीचे ५०० बळी चार महिन्यांत

कोरोना बळींना प्रारंभ झाल्यानंतर प्रारंभीच्या काळात त्याचा वेग अगदी अत्यल्प होता. ५० बळी जाण्यासाठी महिन्याहून अधिक कालावधी लागला होता. मात्र त्यानंतर १ ऑगस्टला सुमारे चार महिन्यांच्या कालावधीत प्रारंभीच्या पाचशे बळींचा टप्पा कोरोनाने पूर्ण केला होता. त्यानंतरचा दुसरा बळींचा टप्पा पूर्ण करण्यास सुमारे सव्वा महिन्याचा कालावधी लागला होता. १० सप्टेंबरला जिल्ह्यात कोरोना बळीने १ हजार आकडा गाठला होता.

इन्फो

सर्वाधिक वेगवान महिनाभरात ५०० बळी

नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक वेगवान ५०० बळींचा टप्पा हा सप्टेंबर महिन्याच्या कालावधीत पूर्ण झाला होता. १० सप्टेंबरला हजार बळींचा टप्पा ओलांडल्यानंतर दीड हजारावा बळी हा बरोबर एक महिन्याने १० ऑक्टोबरला गेला होता. म्हणजे अवघ्या महिनाभरात कोरोनाने हे थैमान घातले होते.

इन्फो

दिवाळीनंतर वेग मंदावला

ऑक्टोबर महिन्यात कोरोनाचा आणि बळींचा वेगदेखील कमी होऊ लागल्याने त्यानंतरच्या पाचशे बळींचा टप्पा हा तीन महिन्यांनी म्हणजेच ७ जानेवारीला पूर्ण झाला होता. त्यानंतर मंगळवारी जिल्ह्यात पुढील ५०० बळींचा अर्थात एकूण अडीच हजार बळींचा टप्पा पार झाल्याने प्रशासन प्रचंड चिंतेत पडले आहे.

-----‐---------

ही ग्राफ स्टोरी आहे. ग्राफसाठी ईश्वरला आकडे दिलेले आहेत.