शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

कोरोना बळी २५०० वर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:15 IST

नाशिक : जिल्ह्यात गत महिनाभरापासून कोरोना बळींच्या प्रमाणात मोठ्या वेगाने वाढ झाली असून त्यामुळे कोरोनाने अल्पावधीतच २५०० ...

नाशिक : जिल्ह्यात गत महिनाभरापासून कोरोना बळींच्या प्रमाणात मोठ्या वेगाने वाढ झाली असून त्यामुळे कोरोनाने अल्पावधीतच २५०० बळींचा टप्पा पार केला आहे. अखेरच्या ५०० बळींपैकी निम्म्याहून अधिक बळी हे केवळ १५ दिवसांतील असल्याने चिंतेच्या सावटात अधिकच भर पडली आहे.

कोरोनाच्या वाढत्या संख्येपेक्षाही बळींचे वाढते प्रमाण जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या दृष्टीने अधिक घातक ठरू लागले आहे. किंबहुना कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्याच्या बाहेर जात असली तरी किमान बळींवर नियंत्रण मिळवता यावे, यासाठी प्रशासन आटोकाट प्रयत्न करीत आहे. तरीदेखील दिवसाला साधारणपणे २० ते २५ बळी जाऊ लागल्याने कोरोनाचा मृत्युदरदेखील वाढू लागला आहे. त्यामुळेच राज्यात सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या रुग्णसंख्येबरोबरच सर्वाधिक बळींच्या प्रमाणातही नाशिक जिल्हा पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये दिसू लागला आहे.

नाशिक जिल्ह्यातील पहिला रुग्ण गतवर्षी २९ मार्च रोजी आढळला होता. मात्र त्यानंतर एप्रिलच्या मध्यानंतर गेलेला पहिला बळी हा जिल्ह्यातील कोरोना बळीचा प्रारंभ होता. त्यानंतर कोरोनाचा वेग हळूहळू वाढत गेला, तशी बळींची संख्यादेखील वेगाने वाढू लागली.

इन्फो

प्रारंभीचे ५०० बळी चार महिन्यांत

कोरोना बळींना प्रारंभ झाल्यानंतर प्रारंभीच्या काळात त्याचा वेग अगदी अत्यल्प होता. ५० बळी जाण्यासाठी महिन्याहून अधिक कालावधी लागला होता. मात्र त्यानंतर १ ऑगस्टला सुमारे चार महिन्यांच्या कालावधीत प्रारंभीच्या पाचशे बळींचा टप्पा कोरोनाने पूर्ण केला होता. त्यानंतरचा दुसरा बळींचा टप्पा पूर्ण करण्यास सुमारे सव्वा महिन्याचा कालावधी लागला होता. १० सप्टेंबरला जिल्ह्यात कोरोना बळीने १ हजार आकडा गाठला होता.

इन्फो

सर्वाधिक वेगवान महिनाभरात ५०० बळी

नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक वेगवान ५०० बळींचा टप्पा हा सप्टेंबर महिन्याच्या कालावधीत पूर्ण झाला होता. १० सप्टेंबरला हजार बळींचा टप्पा ओलांडल्यानंतर दीड हजारावा बळी हा बरोबर एक महिन्याने १० ऑक्टोबरला गेला होता. म्हणजे अवघ्या महिनाभरात कोरोनाने हे थैमान घातले होते.

इन्फो

दिवाळीनंतर वेग मंदावला

ऑक्टोबर महिन्यात कोरोनाचा आणि बळींचा वेगदेखील कमी होऊ लागल्याने त्यानंतरच्या पाचशे बळींचा टप्पा हा तीन महिन्यांनी म्हणजेच ७ जानेवारीला पूर्ण झाला होता. त्यानंतर मंगळवारी जिल्ह्यात पुढील ५०० बळींचा अर्थात एकूण अडीच हजार बळींचा टप्पा पार झाल्याने प्रशासन प्रचंड चिंतेत पडले आहे.

-----‐---------

ही ग्राफ स्टोरी आहे. ग्राफसाठी ईश्वरला आकडे दिलेले आहेत.