शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
2
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
3
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
4
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
5
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
6
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
7
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
8
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
9
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
10
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
11
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
12
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
13
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
15
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
16
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
17
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
18
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
19
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
20
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ

आभासी तंत्रज्ञानाद्वारे रंगला मुक्त विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:25 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुक्त विद्यापीठातर्फे २६ वा दीक्षांत सोहळा मिक्स रिॲलिटी तंत्राच्या आधारे ऑनलाइन पद्धतीने साजरा करीत शिक्षण क्षेत्रात ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुक्त विद्यापीठातर्फे २६ वा दीक्षांत सोहळा मिक्स रिॲलिटी तंत्राच्या आधारे ऑनलाइन पद्धतीने साजरा करीत शिक्षण क्षेत्रात मंगळवारी (दि. २) एक नवा अध्याय रचण्यात आला आला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या दीक्षांत सोहळ्यास व्यासपीठावर कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन, कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, परीक्षा नियंत्रक शशिकांत ठाकरे, विविध विद्याशाखांचे संचालक डॉ. नागार्जुन वाडेकर, प्रा. पंडित पलांडे, डॉ. कविता साळुंके, डॉ. सुनंदा मोरे, डॉ. प्रमोद खंदारे, प्रा. जयदीप निकम, डॉ. मधुकर शेवाळे, डॉ. प्रवीण घोडेस्वार आदी उपस्थित होते.

शेकडो किलोमीटर दूर असलेल्या या विद्यार्थ्यांची वास्तव-आभासी तंत्रज्ञानाद्वारे सोहळ्यास दिसलेली उपस्थिती राज्यपाल कोश्यारी यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधणारी ठरली. मुक्त विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात २०१९ व २०२० या दोन वर्षांत विविध विद्याशाखेतील स्नातकांना पदविका, पदव्युत्तर पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, एम.फिल, पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली असून तब्बल २ लाख ९३ हजार ८५२ विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठाची पदवी प्राप्त झाली आहे. यात ४२ हजार ६१२ पदविकाधारक, ११४ पदव्युत्तर पदविकाधारक, २ लाख १५ हजार २६९ पदवीधारक, ३५ हजार ८४९ पदव्युत्तर पदवीधारकांचा समावेश आहे, तर ५२ स्नातकांना सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले.

इन्फो-

यशस्वी ऑनलाइन परीक्षेचे आयोजन

विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडू नये यासाठी लॉकडाऊन कालावधीत विद्यापीठाने अभ्यास केंद्रांच्या सहकार्याने

ऑनलाइन पद्धतीने ८ हजारांहून अधिक संपर्कसत्र घेतले. तसेच परीक्षा घेणेही शक्य नसल्याने युजीसीसह महाराष्ट्र शासनाच्या सूचनांनुसार विद्यापीठाने तब्बल १ लाख ९१ हजार १२९ विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा यशस्वीरीत्या घेतल्याचे कुलगुरू ई. वायुनंदन यांनी सांगितले.

इन्फो-

ऑनलाइन शिक्षणाचा आदर्श वस्तुपाठ

कोविडच्या काळात विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइन शिक्षण कसे पोहोचवावे, याचा आदर्श वस्तुपाठ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने घालून दिला असून भारताला आत्मनिर्भर बनविण्याच्या दिशेने सुरू असलेल्या देशव्यापी प्रयत्नांमध्ये विद्यापीठाचे योगदान मोठे आहे. ज्ञानगंगेचा हा निर्माण झालेला प्रवाह चिरंतन प्रवाहीतच राहील, असा विश्वास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केला.