शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

शिरसाणे येथील कुटुंबाची अवहेलना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:14 IST

- शैला सूर्यभान मांदळे, शिरसाणे, चांदवड शेतीमालाचे कोसळलेले दर आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे माझे वडील भाऊसाहेब खालकर यांच्यावर ...

- शैला सूर्यभान मांदळे, शिरसाणे, चांदवड

शेतीमालाचे कोसळलेले दर आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे माझे वडील भाऊसाहेब खालकर यांच्यावर सरकारी आणि सावकारी कर्ज वाढल्यामुळे कर्जबाजारी पणाला कंटाळून त्यांनी दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केली. नऊ लाख रुपये कर्ज होते आणि सरकारकडून अवघे एक लाख रुपये मदत मिळाली. आज मी पेट्रोल पंपावर काम करत आहे तर आई दुसऱ्याच्या शेतात मजुरी करत आहे. घरचा कमवता आधार गेल्यामुळे मला कमी वयात काम करावं लागत आहे. शासन निव्वळ आश्वासन देते, प्रत्यक्ष मात्र तुटपुंजी मदत करून थट्टा करते, समाजात असे खूप आत्महत्याग्रस्त कुटुंब आहे की ज्यांचे संसार उघड्यावर आहे.

-प्रवीण खालकर, औरंगपूर

माझे पती रामेश्वर कदम यांनी कर्जाला कंटाळून मागील वर्षी आत्महत्या केली. कर्जाचा अजूनही डोंगर माथ्यावर आहे. एका कन्येचे लग्न झाले आहे तर लहान मुलगी कंपनीत कामाला जाते. मुलगा बारावीत शिकतो. मी घरीच असते. त्यामुळे अल्प उत्पन्नात घर कसे चालवावे असा प्रश्न पडतो. निफाड तहसीलदारांनी एक लाखांची मदत केली. ती तुटपुंजी आहे. शासनाने आमचा विचार करावा, बँकांनी वसुलीसाठी तगादा सुरू केला आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंब चालविणे कठीण झाले आहे.

- -मनीषा रामेश्वर कदम, बाणगंगानगर, ओझर