शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

ग्राहक न्यायालयांमध्ये साठ हजार प्रकरणे प्रलंबित

By admin | Updated: March 23, 2015 23:55 IST

ग्राहक न्यायालयांमध्ये साठ हजार प्रकरणे प्रलंबित

नाशिक : सर्वसामान्यांमध्ये ग्राहक हक्क व ग्राहक न्यायालयांबाबत अजूनही हवी तितकी जनजागृती झालेली नाही. ग्राहकांच्या हक्कासाठी लढणाऱ्या ग्राहक न्याय मंचाच्या सदस्यांचे मानधन, जागेचा प्रश्न यांसह विविध समस्या समोर आहेत़ तसेच आजमितीस राज्य ग्राहक आयोगाकडे दहा हजार, तर ग्राहक मंचाकडे पन्नास हजार प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती तथा महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष आऱ सी़ चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली़राज्य ग्राहक तक्र ार निवारण आयोगाच्या नाशिक परिक्र मा खंडपीठाच्या उद्घाटनानंतर पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांनी सांगितले की, राज्यातील औरंगाबाद आणि नागपूर या ठिकाणी ग्राहक न्यायालयाचे पूर्ण वेळ काम चालते, तर कोल्हापूर, पुणे, अमरावतीमध्ये आठ दिवस काम चालते़ राज्यातील सहावे परिक्रमा खंडपीठ नाशिकमध्ये सुरू झाले असून, महिन्यातून आठ दिवस या खंडपीठाचे काम चालणार आहे़ग्राहक न्यायालयापुढे येणाऱ्या तक्रारींमध्ये विमा कंपन्या, बँका, खासगी वित्तपुरवठा करणाऱ्या कंपन्या, बांधकाम व्यावसायिक, वैद्यकीय सेवेतील निष्काळजीपणा, कुरिअर सेवा, पोस्ट आॅफिस यांची प्रकरणे मोठ्या संख्येने येतात़ ही न्यायालये आरोपीला तीन वर्षांपर्यंत शिक्षा व दहा रुपयांपर्यंत दंड करू शकते़ या न्यायालयाचे कामकाज इंग्रजीतून चालावे, यासाठी न्यायालयात एक याचिकाही दाखल करण्यात आली आहे़ मात्र नागरिकांना समजेल, अशा भाषेत न्यायालयाचे काम चालावे असे वैयक्तिक मत असल्याचे चव्हाण म्हणाले़सद्यस्थितीत राज्य ग्राहक आयोगापुढे ग्राहक मंच सदस्यांचे मानधन, न्यायालयासाठी जागा आदि प्रश्न समोर आहेत़ यासाठी आयोगाने शासनाकडे निधीची मागणीदेखील केली आहे़ या न्यायालयांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळाल्या, तसेच ई कोर्टसारखे अभिनव उपक्रम राबविल्यास या प्रकरणांचे जलद निकाल लागतील़ तसेच ग्राहक हक्काच्या जनजागृतीसाठी दुकान चालविण्याचा परवाना देतानाच संबंधित यंत्रणेने याबाबत नियमावली तयार करण्याची गरज आहे़ (प्रतिनिधी)