शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

जुळलेली नाळ खंडित झाली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2015 23:01 IST

येवला : सभा, आंदोलनाच्या आठवणींना उजाळा

येवला : शेतकरी संघटनेचे पंचप्राण शरद जोशी यांची जीवनयात्रा संपली असली तरी नाशिक जिल्ह्यासह येवल्याशी त्यांची जुळलेली नाळ मात्र कायमची स्मरणात राहील अशीच आहे. १९८९ साली कांद्याचे अचानक भाव कोसळले आणि कांद्याला हमी भाव द्यावा, या मागणीसाठी येवल्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकरी संघटनेचे उपोषण सुरू झाले. स्वर्गीय मोहनराव गुंजाळ, स्वर्गीय लहानू जेजूरकर, संतू पाटील झांबरे, कांतीलाल जगझाप, शिवाजी वाघ, साहेबराव मढवई, सुभाष सोनवणे,चंद्रकांत साबरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले. या उपोषणाची वार्ता शेतकरी संघटनेचे स्वर्गीय मोहनराव गुंजाळ यांनी कानी घालताच शेतकऱ्यांचे पंचप्राण शरद जोशी येवल्यात आले. कांद्याच्या जनजागृतीसाठी शेतकऱ्यांची येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मोठी सभा झाली. सुमारे १० हजार शेतकऱ्यांनी येवल्यातील या सभेला हजेरी लावली. त्या सभेत झालेल्या गगनभेदी घोषणा आजही येवल्याचा शेतकरी विसरलेला नाही. कांद्याला रास्त भाव मिळत नाही तोपर्यंत येवल्यातील कार्यकर्त्यांचे उपोषण सुरूच राहणार असल्याची गर्जना जोशी यांनी येवल्यात केली. आणि ही गर्जना तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या कानावर गेली. त्यांनी तत्काळ शरद जोशी यांना चर्चेचे आमंत्रण दिले. या चर्चेत कांद्याला १०० रु पये प्रतिक्विंटल भाव देणार ही घोषणा शरद पवार यांनी केल्याची आठवण शेतकरी नेते संतू पाटील झांबरे यांनी सांगितली. दरम्यान, लासलगाव येथेही शिवाजी राजोळे, स्मिता गुरव व कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले होतेच. या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यात शेतकरी संघटनेची मुळे घट्ट रोवली गेली. बाजार हस्तक्षेप योजनेनंतर येवल्यात शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली कर्जमुक्ती आंदोलन झाले. मोहन गुंजाळ आणि संतू पाटील झांबरे यांनी येवल्यात पाटपाणीप्रश्नावर आंदोलन सुरू केले. यावेळी शरद जोशी यांची येवल्यात स्वतंत्र पाणी परिषद या विषयावर प्रचंड जाहीर सभा झाली. उच्चाधिकार समितीचे पदाधिकारी वामनराव चटप, सदाभाऊ खोत, रघुनाथदादा पाटील, लक्ष्मण वडेल या सभेसाठी हजर होते. या परिषदेत शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेऊन, पाणीप्रश्न सुटत नाही तोपर्यंत पुढाऱ्यांना गाव बंदी करण्याचा आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. कर्जमुक्ती,आणि लक्ष्मीमुक्ती हे दोन कार्यक्र म शरद जोशी यांनी चांदवड येथील जाहीरसभेतून शेतकऱ्यांना दिले. या घोषणेपूर्वी या कार्यक्र माला येवल्यातील बैठकीत अंतिम रूप दिले गेले. (वार्ताहर)