शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यात काँग्रेसची पीछेहाट

By admin | Updated: September 2, 2016 00:15 IST

सटाण्यातील बैठकीत कार्यकर्त्यांची तक्रार : खांदेपालट होण्याची शक्यता

सटाणा : बागलाण तालुक्यात कॉँग्रेस पक्षाची झालेली पीछेहाट, कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ याचे थेट तालुकाध्यक्ष साखरचंद कांकरिया यांच्यावरच खापर फोडले. निवडणुका जिंकायच्या असतील तर सक्षम नेतृत्व द्या अन्यथा भोपळादेखील फुटणार नाही, अशी कैफियत उपस्थित कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, पक्षनिरीक्षक डी. जी. पाटील यांच्याकडे मांडली. त्यामुळे लवकरच कॉँंग्रेसमध्ये खांदेपालट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.गेल्या आठवड्यात नाशिक जिल्हा कॉँग्रेस कमेटीच्या बैठकीत पक्षातील बागलाणच्या पदाधिकाऱ्यांनी तालुकाध्यक्ष साखरचंद कांकरिया यांच्याबाबत उघड नाराजी व्यक्त करण्यात आली होती. याबाबत पक्षाचे उत्तर महाराष्ट्रचे प्रभारी आमदार भाई जगताप यांनी गंभीर दखल घेत जिल्हाध्यक्ष व पक्षिनरीक्षकांनी स्थानिकांची मते जाणून घेऊन तसा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, निरीक्षक डी. जी.पाटील यांनी बुधवारी सायंकाळी सटाण्यात तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्याांची बैठक बोलावली होती. बागलाण पंचायत समीतीच्या सभागृहात आयोजित या बैठकीच्या प्रारंभीच शहराध्यक्ष किशोर कदम यांनी कांकरिया यांनाच ‘टार्गेट’ केले. तालुकाध्यक्ष ‘फिजिकली अनफिट’ असल्याची टीका करत पक्षाची झालेली वाताहत पाहता उचलबांगडी करण्यापेक्षा त्यांनी स्वत:च त्या पदाचा त्याग करावा असा सल्ला दिला. सटाणा पालिकेत पक्षाचे एकमेव निवडून आलेले नगरसेवक मनोज सोनवणे यांनी देखील नेतृत्वाबाबत नाराजी व्यक्त केली. तालुकाध्यक्ष व्यक्तिगत कामासाठीच पदाचा उपयोग करत असल्याचा आरोप करत अशा स्वार्थीपणामुळे पक्षात संघटन राहिले नाही. त्यामुळे आपल्या पक्षाचे कोणी तिकीट घेईल की नाही अशी भीतीही सोनवणे यांनी व्यक्त केली. युवक कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष सिराज मुल्ला यांनी तर थेट पक्षावरच नाराजी व्यक्त केली. पक्षात आमच्या लोकांना मानसन्मान मिळत नाही अशी खंत व्यक्त करत थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आमच्या अल्पसंख्यांक उमेदवाराचा विचार व्हावा अशी मागणी केली. जिल्हा बँकेचे माजी संचालक यशवंतबापू अहिरे यांनीही पक्ष संघटन म्हाताऱ्यांचे काम राहिले नाही, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करत त्यासाठी युवकांनी पुढे यावे असे आवाहन केले. खांदेपालट करण्याची मागणीही त्यांनी केली. जिल्हा परिषद सदस्य प्रा. अनिल पाटील ,पंचायत समीती सदस्य परशुराम अहिरे ,रवींद्र पवार यांनीही नेतृत्व बदलाची मागणी केली.