शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
2
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
3
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
4
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
5
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
6
मायेची सावली! भावासाठी बहीण झाली ढाल; किडनी डोनेट करुन दिलं जीवदान, रक्षाबंधन झालं खास
7
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
8
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
9
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
10
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
11
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
12
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
13
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
14
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
15
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
16
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
17
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
18
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
19
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
20
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक

तालुक्यात काँग्रेसची पीछेहाट

By admin | Updated: September 2, 2016 00:15 IST

सटाण्यातील बैठकीत कार्यकर्त्यांची तक्रार : खांदेपालट होण्याची शक्यता

सटाणा : बागलाण तालुक्यात कॉँग्रेस पक्षाची झालेली पीछेहाट, कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ याचे थेट तालुकाध्यक्ष साखरचंद कांकरिया यांच्यावरच खापर फोडले. निवडणुका जिंकायच्या असतील तर सक्षम नेतृत्व द्या अन्यथा भोपळादेखील फुटणार नाही, अशी कैफियत उपस्थित कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, पक्षनिरीक्षक डी. जी. पाटील यांच्याकडे मांडली. त्यामुळे लवकरच कॉँंग्रेसमध्ये खांदेपालट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.गेल्या आठवड्यात नाशिक जिल्हा कॉँग्रेस कमेटीच्या बैठकीत पक्षातील बागलाणच्या पदाधिकाऱ्यांनी तालुकाध्यक्ष साखरचंद कांकरिया यांच्याबाबत उघड नाराजी व्यक्त करण्यात आली होती. याबाबत पक्षाचे उत्तर महाराष्ट्रचे प्रभारी आमदार भाई जगताप यांनी गंभीर दखल घेत जिल्हाध्यक्ष व पक्षिनरीक्षकांनी स्थानिकांची मते जाणून घेऊन तसा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, निरीक्षक डी. जी.पाटील यांनी बुधवारी सायंकाळी सटाण्यात तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्याांची बैठक बोलावली होती. बागलाण पंचायत समीतीच्या सभागृहात आयोजित या बैठकीच्या प्रारंभीच शहराध्यक्ष किशोर कदम यांनी कांकरिया यांनाच ‘टार्गेट’ केले. तालुकाध्यक्ष ‘फिजिकली अनफिट’ असल्याची टीका करत पक्षाची झालेली वाताहत पाहता उचलबांगडी करण्यापेक्षा त्यांनी स्वत:च त्या पदाचा त्याग करावा असा सल्ला दिला. सटाणा पालिकेत पक्षाचे एकमेव निवडून आलेले नगरसेवक मनोज सोनवणे यांनी देखील नेतृत्वाबाबत नाराजी व्यक्त केली. तालुकाध्यक्ष व्यक्तिगत कामासाठीच पदाचा उपयोग करत असल्याचा आरोप करत अशा स्वार्थीपणामुळे पक्षात संघटन राहिले नाही. त्यामुळे आपल्या पक्षाचे कोणी तिकीट घेईल की नाही अशी भीतीही सोनवणे यांनी व्यक्त केली. युवक कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष सिराज मुल्ला यांनी तर थेट पक्षावरच नाराजी व्यक्त केली. पक्षात आमच्या लोकांना मानसन्मान मिळत नाही अशी खंत व्यक्त करत थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आमच्या अल्पसंख्यांक उमेदवाराचा विचार व्हावा अशी मागणी केली. जिल्हा बँकेचे माजी संचालक यशवंतबापू अहिरे यांनीही पक्ष संघटन म्हाताऱ्यांचे काम राहिले नाही, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करत त्यासाठी युवकांनी पुढे यावे असे आवाहन केले. खांदेपालट करण्याची मागणीही त्यांनी केली. जिल्हा परिषद सदस्य प्रा. अनिल पाटील ,पंचायत समीती सदस्य परशुराम अहिरे ,रवींद्र पवार यांनीही नेतृत्व बदलाची मागणी केली.