शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

आरेाग्य सेवक परीक्षेतील गोंधळ विधानसभेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:25 IST

नाशिक: गेल्या रविवारी शहरातील ४९ केंद्रांवर घेण्यात आलेल्या आरेाग्य सेवक परीक्षेच्या गोंधळाची चर्चा विधानसभेतही झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ...

नाशिक: गेल्या रविवारी शहरातील ४९ केंद्रांवर घेण्यात आलेल्या आरेाग्य सेवक परीक्षेच्या गोंधळाची चर्चा विधानसभेतही झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची मुद्दा उपस्थित करीत विद्यार्थी संख्येपेक्षा आसनव्यवस्था कमी असल्याकडे लक्ष वेधले. दरम्यान, आरेाग्य सेवक परीक्षेतील गोंधळ राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये झाल्याने याप्रकरणी मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. नाशिकमधील परीक्षेची माहितीचा अहवाल देखील शासनाला पाठविण्यात आलेला आहे.

आरोग्य विभागातील आरेाग्य सेवक या पदासाठी राज्यात गेल्या रविवारी विविध केंद्रांवर परीक्षा झाली. नाशिक शहरातही ४९ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. यातील गंगापूरोडवरील येथील एका परीक्षा केंद्रावरील व्यवस्थेबाबत विद्यार्थ्यानी आक्षेप घेतल्याने परीक्षेला एक तास उशीर झाला होता. विद्यार्थी संख्येपेक्षा आसनव्यवस्था कमी असल्याने विद्यार्थ्याची गैरसोय झाली. यातून परीक्षेला विलंब झाला. शिवाय कोरोना सुरक्षितता नियम केंद्रांवर कुठेही पाळले गेले नसल्याचा आरोप देखील विद्यार्थ्यानी केला. मास्क, सॅनिटायझर गोंधळानंतर उपलब्ध करून देण्यात आल्याचे विद्यार्थ्यानी सांगितले.

सिडकोतील एका परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यानी परीक्षकांच्या भूमिकेवरच संशय व्यक्त केला होता. परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिकेचे पाकीट सील उघडण्यात आल्याने काही विद्यार्थ्यानी आक्षेप नोंदविला. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यापर्यंत या गोंधळाची तक्रार नाशिकमधून करण्यात आली होती. जिल्हा शल्य चिकित्सक तसेच आरेाग्य उपसंचालकांनी याप्रकरणाची दखल घेत शासनाला अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये एकतास उशीर झाल्याचे तसेच एका केंद्रावर प्रश्नपत्रिकेचे सील निघाल्याचे नमूद करण्यात आलेले आहे.

नाशिकसह राज्यातील अनेक केंद्रांवर आरोग्य सेवक परीक्षेत गोंधळ झाल्याने याच मुद्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला विचारणा केली. त्यामुळे याप्रकरणी चौकशी होण्याची शक्यता आहे. आरोग्य विभागाकडून देखील स्वतंत्रपणे चौकशी होण्याची शक्यता आहे.

--इन्फो--

आरोग्य विभागातील २१ संवर्गातील ४७० पदांसाठी रविवारी परीक्षा घेण्यात आली. सुमारे १९०० उमेदवार नाशिकमधील विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार होते. उमेदवार कमी उपस्थित राहाण्याचा अंदाज होता मात्र अपेक्षेपेक्षा जास्त विद्यार्थी आल्याने ऐनवेळी परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाला. शेवटी परीक्षा केंद्रावरील सभागृहात विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था करण्याची वेळ आली.