शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता

By admin | Updated: February 2, 2017 23:07 IST

निर्यात धोरणाचा निषेध : येवला, अंदरसूल उपबाजारात आवकेत वाढ

येवला : येवला व अंदरसूल उपबाजार समितीत दररोज ५० ते ५५ हजार क्विंटल आवक होत आहे. कांद्याची प्रचंड आवक आणि निर्यातीचे शासनाचे धरसोडीचे धोरण यामुळे व्यापाऱ्यांना शास्वती नाही. यामुळे कांदाभावात निरंतर घसरण होत असल्याचे चित्र आहे. शासन कांद्याबाबत कधी गंभीर होणार हाच प्रश्न शेतकरी विचारू लागले आहे. बुधवारी आणि गुरु वारी केवळ सरासरी ४२० रुपये प्रतिक्विंटल भाव कांद्याला मिळाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत लाल कांद्याची आवक दुप्पट झाली असून, निरंतर आवकेत वाढच होत आहे. यंदा भाव निम्म्याने घसरल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या वर्षी डिसेंबर २०१६मध्ये दोन लाख ८३ हजार ५०१ क्विंटल आवक होऊन ६५० रु पये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. जानेवारी २०१७ पर्यंत सात लाख ६२ हजार ७४२ क्विंटल कांद्याची आवक झाली असून, केवळ ५२५ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. गेल्या दोन दिवसापासून येवला आणि अंदरसूल उपबाजारात तुलनेत सध्या २०० रु पये प्रतिक्विंटलची घसरण पाहून सहनही होत नाही सांगता येत नाही असे बुरे दिन शेतकऱ्यावर आल्याची प्रतिक्रि या बाजार समितीच्या आवारात व्यक्त झाली. सध्याचा लाल कांदा साठवता येत नाही. हा कांदा विकावाच लागतो. शासन कांदा प्रश्नावर लक्ष घालीत नाही. एकीकडे आवक वाढत असताना निर्यातवाढीला चालना द्यावी, निर्यातदारांना प्रोत्साहनपर अनुदान द्यावे. निर्यात वाढली तर निदान सध्या कांद्याला आलेली अवकळा थांबेल. महाराष्ट्रासह भारतात अन्यत्र मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादन आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपल्या कांद्याला जोरदार मागणी आहे. नोटाबंदीचा निर्णयदेखील कांद्याला मारक ठरत आहे. येवला बाजार समितीने सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांना कांद्याची निर्यात बंद करू नये अशा आशयाचा ठराव पाठवला आहे. यात सध्याची कांद्याची वास्तव स्थिती काय आहे. याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. अचानकपणे कांदा निर्यातबंदी केल्यास जिल्ह्यातील निर्यातदारांनी घेऊन ठेवलेला कांदा याला उठाव मिळणार नाही परिणामी कांदा खरेदीवर परिणाम होईल. (वार्ताहर)