शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

अखेरच्या पर्वणीची ‘औपचारिकता’ पूर्ण

By admin | Updated: September 18, 2015 23:20 IST

ताणतणावातून मुक्तता : यंत्रणेने सोडला सुटकेचा नि:श्वास

नाशिक : गेल्या कुंभमेळ्यातील दुर्घटना, त्यामुळे यंदा केलेले अतिरेकी निर्बंधाचे नियोजन, त्यावर झालेली टीका, पुन्हा बदललेले नियोजन अशा सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या कुंभमेळ्यातील तिसरी पर्वणीही निर्विघ्न पार पडली. फारशी बंधने नसल्याने भाविकांचा मुक्त वावर, तसेच पावसामुळे काहीसा व्यत्यय येऊनही अखेरची पर्वणी शांततेत पार पडली आणि सर्व शासकीय यंत्रणांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.कुंभमेळ्यात लाखो भाविक येतात,परंतु त्यांची संख्या किती याचे मोजमाप बारा वर्षांपूर्वीही यंत्रणेला शक्य झाले नाही आणि यंदाही शक्य झालेले नाही. मात्र, किमान एक कोटी भाविक येतील याचे दडपण घेऊनच यंत्रणा वावरली. गेल्या कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेमुळे यंदा येणाऱ्या लक्षावधी भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन कसे करावे, हे आव्हानात्मक असल्याचे शासकीय यंत्रणेचे म्हणणे होते. त्यामुळे अति निर्बंध घातल्याचा फटका पहिल्या पर्वणीला बसला आणि स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास झाल्याने यंत्रणेवर टीका झाली. नियोजन योग्यच होते असा दावा करत यंत्रणेला विशेषत: पोलिसांना फेरनियोजन करून अतिरेकी नियोजनाची चूक मान्यच करावी लागली. दुसऱ्या पर्वणीसाठी केलेला फेरबदल अर्थातच निर्बंध कमी करून स्थानिक आणि बाहेरून आलेल्या भाविकांची पायपीट कमी केल्यामुळे भाविक स्नानाचा आनंद घेऊ शकले. दुसऱ्या पर्वणीच्या तुलनेत तिसऱ्या पर्वणीला गर्दी कमी होईल असा अंदाज अगोदरच आला होता. शुक्रवारी मोटारी, बस आणि रेल्वेने येणाऱ्या भाविकांची संख्या कमी झाल्याने तसा अंदाज बांधला गेला. त्यातच गणेश प्रतिष्ठापनेमुळेदेखील गुरुवारी निर्बंध शिथिल होते. त्यातच मध्यरात्री आलेल्या मुसळधार पावसाने पोलिसांचे काम आणखी सोपे केले. सकाळी साधू-महंतांचे किरकोळ नाराजीनाट्य वगळता मिरवणूक, शाहीस्नान सुरळीत पार पडले आणि त्यानंतर भाविकांचे स्नानही निर्विघ्नपणे पार पडले. आणि यंदाच्या कुंभमेळ्यातील तिसऱ्या पर्वणीची औपचारिकता पार पडली. कुंभमेळा सुरळीत पार पडल्याने शासकीय यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. आता केवळ त्र्यंबकेश्वर येथे २५ सप्टेंबर रोजी होणारी अखेरची पर्वणी बाकी असून ती पार पडताच यंत्रणा तणावातून मुक्त होईल.