शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अखेरच्या पर्वणीची ‘औपचारिकता’ पूर्ण

By admin | Updated: September 18, 2015 23:20 IST

ताणतणावातून मुक्तता : यंत्रणेने सोडला सुटकेचा नि:श्वास

नाशिक : गेल्या कुंभमेळ्यातील दुर्घटना, त्यामुळे यंदा केलेले अतिरेकी निर्बंधाचे नियोजन, त्यावर झालेली टीका, पुन्हा बदललेले नियोजन अशा सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या कुंभमेळ्यातील तिसरी पर्वणीही निर्विघ्न पार पडली. फारशी बंधने नसल्याने भाविकांचा मुक्त वावर, तसेच पावसामुळे काहीसा व्यत्यय येऊनही अखेरची पर्वणी शांततेत पार पडली आणि सर्व शासकीय यंत्रणांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.कुंभमेळ्यात लाखो भाविक येतात,परंतु त्यांची संख्या किती याचे मोजमाप बारा वर्षांपूर्वीही यंत्रणेला शक्य झाले नाही आणि यंदाही शक्य झालेले नाही. मात्र, किमान एक कोटी भाविक येतील याचे दडपण घेऊनच यंत्रणा वावरली. गेल्या कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेमुळे यंदा येणाऱ्या लक्षावधी भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन कसे करावे, हे आव्हानात्मक असल्याचे शासकीय यंत्रणेचे म्हणणे होते. त्यामुळे अति निर्बंध घातल्याचा फटका पहिल्या पर्वणीला बसला आणि स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास झाल्याने यंत्रणेवर टीका झाली. नियोजन योग्यच होते असा दावा करत यंत्रणेला विशेषत: पोलिसांना फेरनियोजन करून अतिरेकी नियोजनाची चूक मान्यच करावी लागली. दुसऱ्या पर्वणीसाठी केलेला फेरबदल अर्थातच निर्बंध कमी करून स्थानिक आणि बाहेरून आलेल्या भाविकांची पायपीट कमी केल्यामुळे भाविक स्नानाचा आनंद घेऊ शकले. दुसऱ्या पर्वणीच्या तुलनेत तिसऱ्या पर्वणीला गर्दी कमी होईल असा अंदाज अगोदरच आला होता. शुक्रवारी मोटारी, बस आणि रेल्वेने येणाऱ्या भाविकांची संख्या कमी झाल्याने तसा अंदाज बांधला गेला. त्यातच गणेश प्रतिष्ठापनेमुळेदेखील गुरुवारी निर्बंध शिथिल होते. त्यातच मध्यरात्री आलेल्या मुसळधार पावसाने पोलिसांचे काम आणखी सोपे केले. सकाळी साधू-महंतांचे किरकोळ नाराजीनाट्य वगळता मिरवणूक, शाहीस्नान सुरळीत पार पडले आणि त्यानंतर भाविकांचे स्नानही निर्विघ्नपणे पार पडले. आणि यंदाच्या कुंभमेळ्यातील तिसऱ्या पर्वणीची औपचारिकता पार पडली. कुंभमेळा सुरळीत पार पडल्याने शासकीय यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. आता केवळ त्र्यंबकेश्वर येथे २५ सप्टेंबर रोजी होणारी अखेरची पर्वणी बाकी असून ती पार पडताच यंत्रणा तणावातून मुक्त होईल.