शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

कमी दाबाने पाणीपुरवठ्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:15 IST

शेतकऱ्यांना समज देण्याची मागणी नाशिक : गणेशवाडीतील फूल बाजारात सकाळच्या वेळी येणाऱ्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांना प्रशासनाच्या वतीने समज द्यावी, ...

शेतकऱ्यांना समज देण्याची मागणी

नाशिक : गणेशवाडीतील फूल बाजारात सकाळच्या वेळी येणाऱ्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांना प्रशासनाच्या वतीने समज द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. या बाजारात अनेक शेतकरी मास्कचा वापर करीत नाहीत. त्याचबरोबर फिजिकल डिस्टसिंगकडेही दुर्लक्ष करतात. यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उघड्यावर होणाऱ्या मांसविक्रीमुळे नाराजी

नाशिक : शहरातील अनेक भागांत उघड्यावर मांसविक्री होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. विविध भागांतील मुख्य रस्त्यांवरच मांसविक्रीची दुकाने असून सकाळपासून सायंकाळपर्यंत या ठिकाणी मांसविक्री सुरू असते. यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महापालिकेने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

किराणा मालाच्या दरवाढीमुळे नाराजी

नाशिक : किराणा मालातील अनेक वस्तूंच्या किमती वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत. कोरोनाच्या काळात पगार कमी झालेले असतानाच महागाईचा भडका उडाल्याने आर्थिक ताळमेळ बसविताना अनेकांची घालमेल होत आहे.

वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी

नाशिक : शहरातील अनेक भागांत वाहतूक कोंडीची समस्या कायमचीच झाली असून वारंवार तक्रार करुनही वाहतूक शाखा याकडे लक्ष देत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. रस्त्यावर उभी करण्यात येणारी बेशिस्त वाहनचालक आदी विविध कारणांमुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.

शहरात रंगतेय निवडणुकीची चर्चा

नाशिक : शहरातील सिडको, सातपूर, पंचवटी आदी विविध भागांत आगामी महापालिका निवडणुकांची चर्चा रंगू लागली आहे. चौकाचौकात तरुण, ज्येष्ठ नागरिक याबाबत चर्चा करून आपापल्या पध्दतीने अंदाज व्यक्त करत असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे इच्छुकांनी तयारीला सुरुवात केली असून त्यांच्याकडून वेगवेगळ्य कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.

सरपंचपदाने हुलकावणी दिल्याने नाराजी

नाशिक : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीनंतर जाहीर झालेल्या सरपंच आरक्षण सोडतीत आपल्या सोयीचे आरक्षण न निघाल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेकांनी सरपंचपदाची स्वप्न पाहिले मात्र आरक्षण सोडतीत सरपंचपद दुसऱ्याच प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. यामुळे अनेक गावांत वादही निर्माण झाले होते.