शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

कमी दाबाने पाणीपुरवठ्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:15 IST

शेतकऱ्यांना समज देण्याची मागणी नाशिक : गणेशवाडीतील फूल बाजारात सकाळच्या वेळी येणाऱ्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांना प्रशासनाच्या वतीने समज द्यावी, ...

शेतकऱ्यांना समज देण्याची मागणी

नाशिक : गणेशवाडीतील फूल बाजारात सकाळच्या वेळी येणाऱ्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांना प्रशासनाच्या वतीने समज द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. या बाजारात अनेक शेतकरी मास्कचा वापर करीत नाहीत. त्याचबरोबर फिजिकल डिस्टसिंगकडेही दुर्लक्ष करतात. यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उघड्यावर होणाऱ्या मांसविक्रीमुळे नाराजी

नाशिक : शहरातील अनेक भागांत उघड्यावर मांसविक्री होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. विविध भागांतील मुख्य रस्त्यांवरच मांसविक्रीची दुकाने असून सकाळपासून सायंकाळपर्यंत या ठिकाणी मांसविक्री सुरू असते. यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महापालिकेने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

किराणा मालाच्या दरवाढीमुळे नाराजी

नाशिक : किराणा मालातील अनेक वस्तूंच्या किमती वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत. कोरोनाच्या काळात पगार कमी झालेले असतानाच महागाईचा भडका उडाल्याने आर्थिक ताळमेळ बसविताना अनेकांची घालमेल होत आहे.

वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी

नाशिक : शहरातील अनेक भागांत वाहतूक कोंडीची समस्या कायमचीच झाली असून वारंवार तक्रार करुनही वाहतूक शाखा याकडे लक्ष देत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. रस्त्यावर उभी करण्यात येणारी बेशिस्त वाहनचालक आदी विविध कारणांमुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.

शहरात रंगतेय निवडणुकीची चर्चा

नाशिक : शहरातील सिडको, सातपूर, पंचवटी आदी विविध भागांत आगामी महापालिका निवडणुकांची चर्चा रंगू लागली आहे. चौकाचौकात तरुण, ज्येष्ठ नागरिक याबाबत चर्चा करून आपापल्या पध्दतीने अंदाज व्यक्त करत असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे इच्छुकांनी तयारीला सुरुवात केली असून त्यांच्याकडून वेगवेगळ्य कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.

सरपंचपदाने हुलकावणी दिल्याने नाराजी

नाशिक : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीनंतर जाहीर झालेल्या सरपंच आरक्षण सोडतीत आपल्या सोयीचे आरक्षण न निघाल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेकांनी सरपंचपदाची स्वप्न पाहिले मात्र आरक्षण सोडतीत सरपंचपद दुसऱ्याच प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. यामुळे अनेक गावांत वादही निर्माण झाले होते.