शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
2
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
3
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
4
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
5
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
6
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
7
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
8
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
9
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
10
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
11
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
12
Sawaliya Foods Products shares: लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
13
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
14
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
15
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
16
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
17
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
18
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
19
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
20
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!

कमी दाबाने पाणीपुरवठ्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:15 IST

शेतकऱ्यांना समज देण्याची मागणी नाशिक : गणेशवाडीतील फूल बाजारात सकाळच्या वेळी येणाऱ्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांना प्रशासनाच्या वतीने समज द्यावी, ...

शेतकऱ्यांना समज देण्याची मागणी

नाशिक : गणेशवाडीतील फूल बाजारात सकाळच्या वेळी येणाऱ्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांना प्रशासनाच्या वतीने समज द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. या बाजारात अनेक शेतकरी मास्कचा वापर करीत नाहीत. त्याचबरोबर फिजिकल डिस्टसिंगकडेही दुर्लक्ष करतात. यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उघड्यावर होणाऱ्या मांसविक्रीमुळे नाराजी

नाशिक : शहरातील अनेक भागांत उघड्यावर मांसविक्री होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. विविध भागांतील मुख्य रस्त्यांवरच मांसविक्रीची दुकाने असून सकाळपासून सायंकाळपर्यंत या ठिकाणी मांसविक्री सुरू असते. यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महापालिकेने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

किराणा मालाच्या दरवाढीमुळे नाराजी

नाशिक : किराणा मालातील अनेक वस्तूंच्या किमती वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत. कोरोनाच्या काळात पगार कमी झालेले असतानाच महागाईचा भडका उडाल्याने आर्थिक ताळमेळ बसविताना अनेकांची घालमेल होत आहे.

वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी

नाशिक : शहरातील अनेक भागांत वाहतूक कोंडीची समस्या कायमचीच झाली असून वारंवार तक्रार करुनही वाहतूक शाखा याकडे लक्ष देत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. रस्त्यावर उभी करण्यात येणारी बेशिस्त वाहनचालक आदी विविध कारणांमुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.

शहरात रंगतेय निवडणुकीची चर्चा

नाशिक : शहरातील सिडको, सातपूर, पंचवटी आदी विविध भागांत आगामी महापालिका निवडणुकांची चर्चा रंगू लागली आहे. चौकाचौकात तरुण, ज्येष्ठ नागरिक याबाबत चर्चा करून आपापल्या पध्दतीने अंदाज व्यक्त करत असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे इच्छुकांनी तयारीला सुरुवात केली असून त्यांच्याकडून वेगवेगळ्य कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.

सरपंचपदाने हुलकावणी दिल्याने नाराजी

नाशिक : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीनंतर जाहीर झालेल्या सरपंच आरक्षण सोडतीत आपल्या सोयीचे आरक्षण न निघाल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेकांनी सरपंचपदाची स्वप्न पाहिले मात्र आरक्षण सोडतीत सरपंचपद दुसऱ्याच प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. यामुळे अनेक गावांत वादही निर्माण झाले होते.