शहरं
Join us  
Trending Stories
1
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
2
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
3
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?
4
"चीन अमेरिकेला मागे टाकणार, तिसरं महायुद्ध, अन्...!"; 2026 साठी बाबा वेंगाची भविष्यवाणी, भारतासह जागात काय-काय घडणार?
5
जगात पहिल्यांदा 'ड्रोन वॉल' बनणार; रशियाला घाबरुन २७ देशांनी निर्णय घेतला, जाणून घ्या कसे करणार काम
6
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
7
Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त सरकाने प्रसिद्ध केलं विशेष नाणं आणि टपाल तिकीट, मोदी म्हणाले...
9
Viral Video: लोकलमध्ये नवरात्रीचा जल्लोष! 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर महिलांचा जबरदस्त डान्स
10
'मैत्रीमुळे विचारधारा सोडली, असे होत नाही.. ' संघाच्या निमंत्रण पत्रिकेवर न्यायाधीशांच्या आईचे नाव असल्याने वाद !
11
भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद
12
Asia Cup 2025 : ट्रॉफी द्या, अन्यथा..; BCCI ने मोहसिन नकवींना दिला ७२ तासांचा अल्टिमेटम
13
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
14
पैशाचा खेळ! ऑनलाईन सेलचं धक्कादायक सत्य; घाईत महागड्या वस्तुंची खरेदी, बेस्ट डील कोणती?
15
GST कपात व्यतिरिक्त नवीन गाडी घेताना १५ हजारांची करा बचत! खरेदी करण्यापूर्वी वापरा 'या' ५ स्मार्ट टिप्स!
16
इस्रायलवर भारताचे मोठे उपकार! १०० वर्षांनी समोर आलं 'हाइफा' शहराच्या इतिहासातील सत्य, काय घडलं?
17
जीएसटी की जय हो...! मारुती दोन लाखांचा आकडा टच करता करता राहिली; टाटा घुटमळली, महिंद्रा, एमजीचे काय...
18
कपडे खराब होऊ नयेत..; पूरग्रस्त पाण्यात अन् खासदार बजरंग सोनवणे होडीवर, VIDEO व्हायरल
19
Rakhi Sawant : Video - "डोनाल्ड ट्रम्प माझे खरे वडील, मी तान्या मित्तलपेक्षा श्रीमंत..."; राखी सावंतचा मोठा दावा
20
लिस्टिंगसोबतच शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा, पहिल्याच दिवशी मोठं नुकसान; लागलं लोअर सर्किट

कृषी विभागात गैरव्यवहार झाल्याची तक्रार

By admin | Updated: December 8, 2015 23:23 IST

कृषी विभागात गैरव्यवहार झाल्याची तक्रार

येवला : तालुका कृषी विभागाच्या वतीने पाच वर्षांत झालेल्या राष्ट्रीय कृषी योजनेअंतर्गत विविध कामात गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पवार यांनी केला आहे. कृषी विभागातील पाच वर्षातील कामांची गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकामार्फत चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पवार यांनी केली आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हा कृषी अधिकारीपासून जलसंपदा, जलसंधारणमंत्री यांच्यापर्यंत पाठवण्यात आल्या आहेत.सन २०१० ते २०१३ या कालावधीत तालुक्यात ठिबक सिंचन योजना राबविण्यात आली. अधिकारी व संबंधित ठेकेदार यांनी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देताना त्यांच्या सातबारावर दोन एकराची नोंद असताना दुप्पट ते तिप्पट नोंद दाखवून संगनमताने गैरव्यवहार केला असल्याचे म्हटले आहे. योजना राबविताना अधिकाऱ्यांच्या मर्जीतील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देताना खऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांना या लाभापासून वंचित ठेवण्यात आले. कांदा चाळ योजनेत नजीकच्या लाभार्थींना त्यांच्याकडे असलेल्या जुन्या चाळी दाखवून लाभ देण्यात आला. त्यामुळे गरजू शेतकऱ्यांवर अन्याय झाला. याशिवाय सीमेंट साखळी बंधारे, मनरेगा व महात्मा फुले जलभूमी अभियानांतर्गत शेततळे, संरक्षक भिंती, गाळ काढणे या योजनांमधून झालेल्या कामात सर्रासपणे अधिकाऱ्यांनी टक्केवारी घेतली असल्याचा आरोप निवेदनात संभाजीराजे पवार यांनी केला आहे. (वार्ताहर)