शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

कृषी विभागात गैरव्यवहार झाल्याची तक्रार

By admin | Updated: December 8, 2015 23:23 IST

कृषी विभागात गैरव्यवहार झाल्याची तक्रार

येवला : तालुका कृषी विभागाच्या वतीने पाच वर्षांत झालेल्या राष्ट्रीय कृषी योजनेअंतर्गत विविध कामात गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पवार यांनी केला आहे. कृषी विभागातील पाच वर्षातील कामांची गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकामार्फत चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पवार यांनी केली आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हा कृषी अधिकारीपासून जलसंपदा, जलसंधारणमंत्री यांच्यापर्यंत पाठवण्यात आल्या आहेत.सन २०१० ते २०१३ या कालावधीत तालुक्यात ठिबक सिंचन योजना राबविण्यात आली. अधिकारी व संबंधित ठेकेदार यांनी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देताना त्यांच्या सातबारावर दोन एकराची नोंद असताना दुप्पट ते तिप्पट नोंद दाखवून संगनमताने गैरव्यवहार केला असल्याचे म्हटले आहे. योजना राबविताना अधिकाऱ्यांच्या मर्जीतील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देताना खऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांना या लाभापासून वंचित ठेवण्यात आले. कांदा चाळ योजनेत नजीकच्या लाभार्थींना त्यांच्याकडे असलेल्या जुन्या चाळी दाखवून लाभ देण्यात आला. त्यामुळे गरजू शेतकऱ्यांवर अन्याय झाला. याशिवाय सीमेंट साखळी बंधारे, मनरेगा व महात्मा फुले जलभूमी अभियानांतर्गत शेततळे, संरक्षक भिंती, गाळ काढणे या योजनांमधून झालेल्या कामात सर्रासपणे अधिकाऱ्यांनी टक्केवारी घेतली असल्याचा आरोप निवेदनात संभाजीराजे पवार यांनी केला आहे. (वार्ताहर)