शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत साडेचार महिन्यांत ५८९२ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:17 IST

नाशिक : गेल्या वर्षी मार्च महिन्यात नाशिक शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिरकाव केलेल्या कोेरोना विषाणूने ८३७८ नागरिकांचा बळी ...

नाशिक : गेल्या वर्षी मार्च महिन्यात नाशिक शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिरकाव केलेल्या कोेरोना विषाणूने ८३७८ नागरिकांचा बळी घेतल्याचे आरोग्य खात्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले असून, हीच माहिती शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर नमूद करण्यात आली असली, तरी पहिल्या लाटेपेक्षाही दुसऱ्या लाटेचा प्रभाव अधिक व मरणाऱ्यांची संख्याही अधिक असल्याचे आरोग्य खात्याने केलेल्या ऑडिटमध्ये नमूद करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात नाशिक दाैऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्ह्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी पवार यांनी पहिल्या व दुसऱ्या लाटेतील रुग्णांची संख्या व मृत्यूची आकडेवारी याचे ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आरोग्य विभागाने मार्च २०२० पासून केलेल्या ऑडिटमध्ये एकूण पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या, त्यात झालेले मृत्यू व मृत्यूदर याबाबी नमूद करण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी मार्चमध्ये फक्त एकच रुग्ण आढळला. त्यानंतर मात्र चढ्या क्रमाने हा आकडा वाढतच गेला. साधारणत: डिसेंबर २० पर्यंत हा आकडा नऊ हजारांपर्यंत पोहोचला असून, त्यातही एप्रिल, मे या दोन महिन्यांत हजाराच्या आत रुग्ण असताना जून महिन्यापासून त्याने उचल खाल्ल्याचे आकडेवारीवरून उघड झाले आहे. जून ते डिसेंबर व त्यातही सप्टेंबरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या थेट ३८ हजार ४९० पर्यंत पोहोचल्याचा विक्रम गेल्या वर्षी नोंदविला गेला आहे. पहिल्या लाटेतील एकूण एक लाख १८ हजार ३५३ बाधितांपैकी २४६२ रुग्ण दगावले. जिल्ह्याचा मृत्यूदर त्यावेळी अवघा २.०८ इतका राहिला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात आरोग्य विभागाच्या मते, १६ फेब्रुवारी २०२१ पासून नोंदविली गेली असून, फेब्रुवारीमध्ये साडेचार हजार रुग्ण अताना ७९ मृत्यू झाले. मात्र, मार्च महिन्यात हाच आकडा ५८७१२ रुग्णांपर्यंत, तसेच एका महिन्यात ५८८ रुग्ण दगावण्यापर्यंत पोहोचल्याने दुसऱ्या लाटेची तीव्रता तेव्हापासून वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. एप्रिलमध्ये हाच आकडा दीड लाख रुग्णांपर्यंत तर महिनाभरात २८७६ मृत्यू झाले आहेत. एप्रिल व मे महिन्यात कायम असलेली लाट ३० जूनपर्यंत काही प्रमाणात ओसरली. जून महिन्याच्या अखेरीस साडेआठ हजार रुग्ण व मृत्यूचा आकडाही ३१२ वर येऊन थांबला आहे. याचवेळी मृत्यूदर मात्र ३.६३ टक्के इतका राहिला आहे.

------------

चौकट===

जिल्हा पहिल्यांदा हजाराखाली

गेल्या वर्षापासून सुरू असलेल्या कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील ग्रामीण भागात नेहमीच विक्रमी रुग्णसंख्या राहिली आहे. मात्र, रविवारी (दि. ४) पहिल्यांदाच जिल्ह्यातील रुग्णसंख्या ९११ वर पोहोचली आहे. त्यातही पेठ तालुका पूर्णपणे मुक्त, तर सुरगाणा, त्र्यंबकेश्वरला अनुक्रमे एक व तीन रुग्ण आहेत. सिन्नर व निफाड या हॉटस्पॉट तालुक्यांमध्येही कमालीचे प्रमाण घटण्यास मदत झाली आहे.