शहरं
Join us  
Trending Stories
1
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
2
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
3
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
4
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
5
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
6
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
7
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
8
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
9
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
10
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
11
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
12
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
13
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
14
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
15
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
16
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
17
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
18
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 
19
म्हणे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतारमध्ये काश्मिरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हणाला...
20
अमेरिकेचा दुटप्पीपणा; पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरवणार...

पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत साडेचार महिन्यांत ५८९२ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:17 IST

नाशिक : गेल्या वर्षी मार्च महिन्यात नाशिक शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिरकाव केलेल्या कोेरोना विषाणूने ८३७८ नागरिकांचा बळी ...

नाशिक : गेल्या वर्षी मार्च महिन्यात नाशिक शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिरकाव केलेल्या कोेरोना विषाणूने ८३७८ नागरिकांचा बळी घेतल्याचे आरोग्य खात्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले असून, हीच माहिती शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर नमूद करण्यात आली असली, तरी पहिल्या लाटेपेक्षाही दुसऱ्या लाटेचा प्रभाव अधिक व मरणाऱ्यांची संख्याही अधिक असल्याचे आरोग्य खात्याने केलेल्या ऑडिटमध्ये नमूद करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात नाशिक दाैऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्ह्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी पवार यांनी पहिल्या व दुसऱ्या लाटेतील रुग्णांची संख्या व मृत्यूची आकडेवारी याचे ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आरोग्य विभागाने मार्च २०२० पासून केलेल्या ऑडिटमध्ये एकूण पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या, त्यात झालेले मृत्यू व मृत्यूदर याबाबी नमूद करण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी मार्चमध्ये फक्त एकच रुग्ण आढळला. त्यानंतर मात्र चढ्या क्रमाने हा आकडा वाढतच गेला. साधारणत: डिसेंबर २० पर्यंत हा आकडा नऊ हजारांपर्यंत पोहोचला असून, त्यातही एप्रिल, मे या दोन महिन्यांत हजाराच्या आत रुग्ण असताना जून महिन्यापासून त्याने उचल खाल्ल्याचे आकडेवारीवरून उघड झाले आहे. जून ते डिसेंबर व त्यातही सप्टेंबरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या थेट ३८ हजार ४९० पर्यंत पोहोचल्याचा विक्रम गेल्या वर्षी नोंदविला गेला आहे. पहिल्या लाटेतील एकूण एक लाख १८ हजार ३५३ बाधितांपैकी २४६२ रुग्ण दगावले. जिल्ह्याचा मृत्यूदर त्यावेळी अवघा २.०८ इतका राहिला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात आरोग्य विभागाच्या मते, १६ फेब्रुवारी २०२१ पासून नोंदविली गेली असून, फेब्रुवारीमध्ये साडेचार हजार रुग्ण अताना ७९ मृत्यू झाले. मात्र, मार्च महिन्यात हाच आकडा ५८७१२ रुग्णांपर्यंत, तसेच एका महिन्यात ५८८ रुग्ण दगावण्यापर्यंत पोहोचल्याने दुसऱ्या लाटेची तीव्रता तेव्हापासून वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. एप्रिलमध्ये हाच आकडा दीड लाख रुग्णांपर्यंत तर महिनाभरात २८७६ मृत्यू झाले आहेत. एप्रिल व मे महिन्यात कायम असलेली लाट ३० जूनपर्यंत काही प्रमाणात ओसरली. जून महिन्याच्या अखेरीस साडेआठ हजार रुग्ण व मृत्यूचा आकडाही ३१२ वर येऊन थांबला आहे. याचवेळी मृत्यूदर मात्र ३.६३ टक्के इतका राहिला आहे.

------------

चौकट===

जिल्हा पहिल्यांदा हजाराखाली

गेल्या वर्षापासून सुरू असलेल्या कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील ग्रामीण भागात नेहमीच विक्रमी रुग्णसंख्या राहिली आहे. मात्र, रविवारी (दि. ४) पहिल्यांदाच जिल्ह्यातील रुग्णसंख्या ९११ वर पोहोचली आहे. त्यातही पेठ तालुका पूर्णपणे मुक्त, तर सुरगाणा, त्र्यंबकेश्वरला अनुक्रमे एक व तीन रुग्ण आहेत. सिन्नर व निफाड या हॉटस्पॉट तालुक्यांमध्येही कमालीचे प्रमाण घटण्यास मदत झाली आहे.