शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याचा बसेना मेळ अन् टमाट्याचा झाला खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:19 IST

कांदा, टोमॅटोच्या आगारात बळीराजाचे अर्थचक्र बिघडले लोकमत न्यूज नेटवर्क खामखेडा : शेतकऱ्यांचे मुख्य पीक म्हणजे कांदा, टमाटा या पिकावर ...

कांदा, टोमॅटोच्या आगारात बळीराजाचे अर्थचक्र बिघडले

लोकमत न्यूज नेटवर्क

खामखेडा : शेतकऱ्यांचे मुख्य पीक म्हणजे कांदा, टमाटा या पिकावर शेतकऱ्यांचे पुढील अर्थचक्र अवलंबून असते, पण सहा महिने कांदा साठवणूक करूनही त्यातून चार पैसे पदरात पडत नसेल तर कांदा साठवणूक करायची कशाला? असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. दरम्यान, टमाटा लागवडीतूनही पैसे वसूल होत नसल्याने शेतकऱ्यात नाराजीचे वातावरण आहे.

दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना साठवणूक केलेल्या कांद्यातून तोटाच सहन करावा लागत आहे. अडीच हजारांवर गेलेला कांदा सहा महिने चाळीस ठेवूनही शेतकऱ्यांना सरासरी १२०० ते १३०० भावाने विकावा लागत असल्याने शेतकऱ्यांचे अर्थचक्र बिघडल्याने पुढील खरिपातील लागवडीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात कांदा चाळीत सडत असल्याने याचा तोटाही शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. शासनाने शेतकऱ्यांना कांदाचाळी उभारण्यासाठी अनुदान दिले याचा फायदा शेतकऱ्यांनी घेतला आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कांदा चाळीची उभारणी केली, पण हाच कांदा सहा महिने चाळीत ठेवूनही तोट्यावर विकावा लागत असेल त्याचा मोठा परिणाम शेतकऱ्यांच्या कांदा साठवणुकीवर होणार आहे.

मागील वर्षी शेतकऱ्यांना टमाट्यातून बऱ्यापैकी पैसे झाले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी टमटा लागवडी केल्या ,एक एकर टमाटा पीक उभे करण्यासाठी साधारणपणे एक लाखाच्या आसपास खर्च येतो, यामध्ये ड्रीप, बांबू, तार, मल्चिंग पेपर, सुताळी, मजुरी असा मोठ्या प्रमाणात खर्च करून शेतकऱ्यांना आज मात्र या टमाटा पिकातून खर्चदेखील वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांवर टमाटा पिकामध्ये नांगर घालण्याची वेळ आली आहे. एकूणच कांदा आणि टमाट्याच्या आगारात शेतकऱ्यांचे मात्र आर्थिक गणित बिघडले असून, मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्जबाजारी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.