शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

नागरिक हवालदिल : पंधरा दिवसांनी पाणीपुरवठा

By admin | Updated: June 18, 2015 00:27 IST

नांदगावी भीषण पाणीटंचाई

नांदगाव : पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याचा अनुभव नांदगावकर गेल्या दोन वर्षांपासून घेत आहेत. आजही तो अनुभव येत आहे. यात वेगळे काही नसले तरी अलीकडे आवर्तनाचा कालावधी आवर्तनागणिक वाढू लागला आहे. ही नागरिकांच्या दृष्टीने चिंतेची बाब झाली असून, प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे पाण्याची समस्या सोडवून नागरिकांना दिलासा देण्यासाठी आवश्यक इच्छाशक्ती नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.प्रशासन, नगरसेवक, जिल्हा परिषद पाणी विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वीज वितरण कंपनी यांच्या मे महिन्यात दोन बैठका झाल्या. आवर्तनाचा कालावधी कमी होऊन शहरवासीयांना आठ दिवसांत पाणी मिळणार या वृत्ताने नागरिकांच्या मनात मोर नाचू लागले. पण त्यानंतर परिस्थिती अधिकच ढासळली. १० ते १२ दिवसांनी येणारे पाणी यावेळी चक्क पंधरा दिवसांनी आले.सकाळपासून दुपारपर्यंत एकच चर्चा.. नळ आले, नळ गेले... यातच टाइमपास झाला. जल आगमनापूर्वी येणाऱ्या हवेचा अंदाज नळाच्या तोटीला हात लावून पाहण्यातच नळधारकांचे कित्येक तास वाया गेले. एवढे करूनही पाणी आले तर त्याला दाब नसल्याने कितीतरी भागांमध्ये पाणी लवकर पोहोचले नाही. त्यामुळे पंधरा दिवसांनंतर पाणी येऊनही महिलांची अवस्था घट डोईवर.. घट कमरेवर... अशी झाली. मे महिन्यातल्या बैठकांचे सूप वाजले. नगरसेवक, प्रशासन यांचे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांकडे बोट, तर त्यांचा वीज वितरण कंपनीकडे अंगुलीनिर्देश. एकमेकांचे वाभाडे काढण्यात सर्व ‘पार्ट्यां’चे दोन तास गेले. बैठकीत अधिकारवाणीने सांगू शकणारा कोणीच नसल्याने काहीच निष्पन्न झाले नाही. त्याची प्रचिती जूनमध्ये आली. पंधरा दिवस पाणीपुरवठाच झाला नाही. झाला तो अपुराच झाला. बैठकीत समोर आलेली धक्कादायक बाब अशी की, दोन वर्षांपूर्वी तातडीची पूरक योजना म्हणून गाजावाजा करून उद्घाटन केलेली माणिकपुंज धरणाची पाणीपुरवठा योजना त्यातील अंगभूत त्रुटींमुळे नगरपालिकेने मे २०१५ पर्यंत ताब्यात घेतलेली नव्हती.या सर्व गोंधळात शहरवासीयांच्या भावना दर्शविणारे चित्र येथील शनी चौकात काढले आहे. ते बघून थबकणारे नागरिक नगरपरिषदेला दूषणे देत आहेत. (वार्ताहर)