शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नागरिक हवालदिल : पंधरा दिवसांनी पाणीपुरवठा

By admin | Updated: June 18, 2015 00:27 IST

नांदगावी भीषण पाणीटंचाई

नांदगाव : पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याचा अनुभव नांदगावकर गेल्या दोन वर्षांपासून घेत आहेत. आजही तो अनुभव येत आहे. यात वेगळे काही नसले तरी अलीकडे आवर्तनाचा कालावधी आवर्तनागणिक वाढू लागला आहे. ही नागरिकांच्या दृष्टीने चिंतेची बाब झाली असून, प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे पाण्याची समस्या सोडवून नागरिकांना दिलासा देण्यासाठी आवश्यक इच्छाशक्ती नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.प्रशासन, नगरसेवक, जिल्हा परिषद पाणी विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वीज वितरण कंपनी यांच्या मे महिन्यात दोन बैठका झाल्या. आवर्तनाचा कालावधी कमी होऊन शहरवासीयांना आठ दिवसांत पाणी मिळणार या वृत्ताने नागरिकांच्या मनात मोर नाचू लागले. पण त्यानंतर परिस्थिती अधिकच ढासळली. १० ते १२ दिवसांनी येणारे पाणी यावेळी चक्क पंधरा दिवसांनी आले.सकाळपासून दुपारपर्यंत एकच चर्चा.. नळ आले, नळ गेले... यातच टाइमपास झाला. जल आगमनापूर्वी येणाऱ्या हवेचा अंदाज नळाच्या तोटीला हात लावून पाहण्यातच नळधारकांचे कित्येक तास वाया गेले. एवढे करूनही पाणी आले तर त्याला दाब नसल्याने कितीतरी भागांमध्ये पाणी लवकर पोहोचले नाही. त्यामुळे पंधरा दिवसांनंतर पाणी येऊनही महिलांची अवस्था घट डोईवर.. घट कमरेवर... अशी झाली. मे महिन्यातल्या बैठकांचे सूप वाजले. नगरसेवक, प्रशासन यांचे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांकडे बोट, तर त्यांचा वीज वितरण कंपनीकडे अंगुलीनिर्देश. एकमेकांचे वाभाडे काढण्यात सर्व ‘पार्ट्यां’चे दोन तास गेले. बैठकीत अधिकारवाणीने सांगू शकणारा कोणीच नसल्याने काहीच निष्पन्न झाले नाही. त्याची प्रचिती जूनमध्ये आली. पंधरा दिवस पाणीपुरवठाच झाला नाही. झाला तो अपुराच झाला. बैठकीत समोर आलेली धक्कादायक बाब अशी की, दोन वर्षांपूर्वी तातडीची पूरक योजना म्हणून गाजावाजा करून उद्घाटन केलेली माणिकपुंज धरणाची पाणीपुरवठा योजना त्यातील अंगभूत त्रुटींमुळे नगरपालिकेने मे २०१५ पर्यंत ताब्यात घेतलेली नव्हती.या सर्व गोंधळात शहरवासीयांच्या भावना दर्शविणारे चित्र येथील शनी चौकात काढले आहे. ते बघून थबकणारे नागरिक नगरपरिषदेला दूषणे देत आहेत. (वार्ताहर)