शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

नागरिक हवालदिल : पंधरा दिवसांनी पाणीपुरवठा

By admin | Updated: June 18, 2015 00:27 IST

नांदगावी भीषण पाणीटंचाई

नांदगाव : पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याचा अनुभव नांदगावकर गेल्या दोन वर्षांपासून घेत आहेत. आजही तो अनुभव येत आहे. यात वेगळे काही नसले तरी अलीकडे आवर्तनाचा कालावधी आवर्तनागणिक वाढू लागला आहे. ही नागरिकांच्या दृष्टीने चिंतेची बाब झाली असून, प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे पाण्याची समस्या सोडवून नागरिकांना दिलासा देण्यासाठी आवश्यक इच्छाशक्ती नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.प्रशासन, नगरसेवक, जिल्हा परिषद पाणी विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वीज वितरण कंपनी यांच्या मे महिन्यात दोन बैठका झाल्या. आवर्तनाचा कालावधी कमी होऊन शहरवासीयांना आठ दिवसांत पाणी मिळणार या वृत्ताने नागरिकांच्या मनात मोर नाचू लागले. पण त्यानंतर परिस्थिती अधिकच ढासळली. १० ते १२ दिवसांनी येणारे पाणी यावेळी चक्क पंधरा दिवसांनी आले.सकाळपासून दुपारपर्यंत एकच चर्चा.. नळ आले, नळ गेले... यातच टाइमपास झाला. जल आगमनापूर्वी येणाऱ्या हवेचा अंदाज नळाच्या तोटीला हात लावून पाहण्यातच नळधारकांचे कित्येक तास वाया गेले. एवढे करूनही पाणी आले तर त्याला दाब नसल्याने कितीतरी भागांमध्ये पाणी लवकर पोहोचले नाही. त्यामुळे पंधरा दिवसांनंतर पाणी येऊनही महिलांची अवस्था घट डोईवर.. घट कमरेवर... अशी झाली. मे महिन्यातल्या बैठकांचे सूप वाजले. नगरसेवक, प्रशासन यांचे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांकडे बोट, तर त्यांचा वीज वितरण कंपनीकडे अंगुलीनिर्देश. एकमेकांचे वाभाडे काढण्यात सर्व ‘पार्ट्यां’चे दोन तास गेले. बैठकीत अधिकारवाणीने सांगू शकणारा कोणीच नसल्याने काहीच निष्पन्न झाले नाही. त्याची प्रचिती जूनमध्ये आली. पंधरा दिवस पाणीपुरवठाच झाला नाही. झाला तो अपुराच झाला. बैठकीत समोर आलेली धक्कादायक बाब अशी की, दोन वर्षांपूर्वी तातडीची पूरक योजना म्हणून गाजावाजा करून उद्घाटन केलेली माणिकपुंज धरणाची पाणीपुरवठा योजना त्यातील अंगभूत त्रुटींमुळे नगरपालिकेने मे २०१५ पर्यंत ताब्यात घेतलेली नव्हती.या सर्व गोंधळात शहरवासीयांच्या भावना दर्शविणारे चित्र येथील शनी चौकात काढले आहे. ते बघून थबकणारे नागरिक नगरपरिषदेला दूषणे देत आहेत. (वार्ताहर)