शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

फुकट्या जाहिरातदारांमुळे शहर विद्रुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:42 IST

नाशिक : कोरोनाचे संकट कमी होत असतानाच महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, ठिकठिकाणी राजकीय पक्षांचे फलक लागल्याने ...

नाशिक : कोरोनाचे संकट कमी होत असतानाच महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, ठिकठिकाणी राजकीय पक्षांचे फलक लागल्याने शहराच्या विद्रुपीकरणात भर पडली आहे. शहरात फलक लावू नये यासाठी उच्च न्यायालयाने वेळोवेळी आदेश दिल्यानंतरदेखील महापालिकेकडून फौजदारी कारवाई करण्यात येत नसल्याने राजकीय पक्ष कार्यकर्त्यांचे फावले आहे.

नाशिकमध्ये फलक प्रकरण हे केवळ स्वस्तात प्रसिद्धीचे माध्यम नाही. त्यातून निर्माण झालेल्या स्पर्धेतून नाशिकमध्ये खूनदेखील पडले असून, वेळोवेळी तणावदेखील निर्माण झाले आहेत. नाशिकमध्ये नाशिक सिटिझन फोरम या संस्थेने सर्वप्रथम उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळी उच्च न्यायालयाने फलक हटवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर वेळोवेळी असे आदेश देण्यात आले आहेत; परंतु सार्वत्रिक निवडणुकांचा आदर्श आचारसंहितेचा एक काळ वगळला तर शहरभर फलक लागलेले असतात. शुभेच्छा, अभिनंदन आणि त्यानंतर आता दशक्रिया विधी तसेच वर्षश्राध्दाचे फलकही लागतात; परंतु प्रशासनाकडून त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही.

--------------

प्रशासनाच्या डुलक्या

उच्च न्यायालयाने राजकीय फलक हटवण्याचे आदेश दिल्यानंतरदेखील महापालिका या विषयावर थंड आहे. यापूर्वी महापालिकेने राजकीय फलकांसाठी जागा निश्चित केल्या आणि आकारदेखील ठरवून चौकटी लावल्या; परंतु त्याचा वापर हाेत नाही.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने विभागनिहाय समित्या, हेल्पलाइन अशी सर्व व्यवस्था केली. परंतु नंतर कालौघात या सर्व यंत्रणा ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे फलक वाढू लागले आहेत.

..........

मनपाने शहरात फलकांसाठी एकूण सत्तर जागा निश्चित केल्या आहेत. त्या ठिकाणी दहा बाय दहाच्या जागा असून त्यातून ३४५ रुपये प्रतिदिन उत्पन्न मिळत आहे. गेल्यावर्षी त्यातून महापालिकेला पाच लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. खासगी जागेवर एका दिवसाचे जेमतेम शंभर रुपये जाहिरात कर आकारला जातो. मात्र, खासगी बेकायदा फलकांचे कोणतेही शुल्क मिळत नाही.

...........

शहरातील फलक हटवण्यासाठी लवकरच कारवाई सुरू करण्यात येणार आहे. मध्यंतरी कोरोनामुळे मनपाची सर्व यंत्रणा वेगळ्या व्यवस्थेत अडकली होती. मात्र आता फलक हटवण्याची करवाई सुरू करण्यात येणार आहे.

- प्रदीप चौधरी, उपआयुक्त विविध कर वसुली विभाग, मनपा

-----------

शहर सौंदर्यीकरण ही सर्वांचीच जबाबदारी आहे. चौक, वाहतूक बेटे ही चांगली ठेवली पाहिजे. मनपाने निर्धारित केलेल्या जागीच फलक लागले तर शहराच्या सौंदर्याला बाधा येणार नाही

- सुनील भायभंग, माजी अध्यक्ष,

नाशिक सिटिझन फोरम