शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

शहर पोलीस 'ऑन रोड'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:16 IST

---- नाशिक : शहर व परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस आयुक्तालय हद्दीत मंगळवारी पोलीस रात्री रस्त्यावर उतरले. रात्री ...

----

नाशिक : शहर व परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस आयुक्तालय हद्दीत मंगळवारी पोलीस रात्री रस्त्यावर उतरले. रात्री आठ वाजल्यापासून सकाळपर्यंत सुमारे ३६ ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. रात्रीच्या संचारबंदीची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी देत ते स्वतःही रस्त्यावर आल्याचे चित्र सिडको परिसरात दिसून आले.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदीचे आदेश राज्य सरकारने जारी केले आहेत. या आदेशांचे पालन करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यासाठी पोलिसांनी मंगळवारी महत्त्वाच्या वर्दळीच्या काही रस्त्यांवर रात्री नाकाबंदी लावली; तर काही रस्ते बॅरिकेड लावून पूर्णपणे बंद केले होते. नाकाबंदीत नागरिकांसह वाहनांची तपासणी करण्यात आली. नाकाबंदी पॉईंटवर एक पोलीस अधिकारी चार कर्मचारी व चार विशेष पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. नाकाबंदीदरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. विनामास्क फिरणाऱ्यांची कोरोना केअर सेंटरवर ॲन्टिजेन चाचणीसाठी रवानगी करण्यात आली. परिमंडळ-२मध्ये ८७ बेशिस्त नागरिकांकडून ४३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला; तर ‘सोशल डिस्टन्स’चे उल्लंघन केल्याप्रकरणी १५ आस्थापना चालकांकडून ३५ हजार रुपये दंड तर वेळेच बंधन न पाळणाऱ्या ३ आस्थापना चालकांना १५ हजार रुपयांचा दंड करण्यात आला. विनामास्क फिरणाऱ्या ६१ नागरिकांची ॲन्टिजेन चाचणी करण्यात आली. याप्रमाणे दररोज कारवाई करण्याचे नियोजन शहर पोलिसांनी केले असल्याचे पांडेय यांनी सांगितले.

------

नागरिकांना वळसा अन‌् उडाले खटके

पोलिसांनी अचानकपणे रस्त्यावर उतरून बहुतांश रस्ते बॅरिकेड लावून बंद केल्याने नागरिकांना वळसा घालून आपापल्या घरी पोहोचावे लागले. यावेळी बॅरिकेडजवळ बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांसोबत बहुतांश वाहनचालकांचे खटके उडत होते. अनेकांनी पोलिसांना रस्ते का बंद केले, असा जाबदेखील विचारला. यावेळी पोलिसांनी सीआरमोबाईल वाहनांच्या ध्वनिक्षेपकावरून उद्घोषणा करत ‘सरकारने कोरोनामुळे रात्री आठ वाजेपासून संचारबंदीची घोषणा केली आहे, यामुळे पोलिसांशी कोणीही डोकं लावू नये. विनाकारण रस्त्यावर फिरू नये. ज्या रस्त्यावर वर्दळ आहे, ते रस्ते पूर्णपणे बंद केले आहेत; हट्ट करू नये. पर्यायी मार्गाने जावे.’ असे आवाहन केले.