शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

ग्रामीण भागात नोटाबंदीमुळे नागरिक त्रस्त

By admin | Updated: January 1, 2017 22:57 IST

ग्रामीण भागात नोटाबंदीमुळे नागरिक त्रस्त

ओझर : वर्ष सरत असताना ग्रामीण भागात मात्र नोटाबंदीच्या झळा कायम असून, यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सरत्या वर्षात चलनटंचाईमुळे आर्थिक पातळीवर प्रत्येक मध्यमवर्गीयाची बरीच दमछाक झालेली पाहायला मिळाली.नोटाबंदीने पन्नास दिवसांचा टप्पा गाठला, परंतु सामान्य माणसाला अजूनदेखील अनेक मूलभूत गरजांना कात्री लागलेली प्रकर्षाने जाणवतेय. कारण खात्यावर पैसे असूनही काढण्यावर निर्बंध, चलन तुटवडा यामुळे दैनंदिन खर्च करतानादेखील अनेकांचा खिसा रिकामा आहे. याचा थेट परिणाम बाजारावर झालेला दिसतोय. लहानमोठे व्यापारीदेखील कधी नव्हे इतक्या मंदीच्या मानसिकतेमध्ये आहेत. बँकांमध्ये रांगा कायम आहेत. एटीएमच्या बाहेरदेखील गर्दी कायम असून, अर्ध्याहून अधिक वेळ त्यात पैसे शिल्लक राहत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. दुसरीकडे आपण ज्या शेतकऱ्याच्या जिवावर जगतो त्याच्याच शेतमालाला भाव नाही.एकूण एकरी लावलेल्या खर्चाइतकेदेखील उत्पन्न आज मिळत नसल्याचे भीषण चित्र आहे.  नोव्हेंबर आणि डिसेंबर हे शेवटचे दोन महिने पूर्णपणे आर्थिक नियोजनात गेले असल्याने त्याचा अजून किती महिने परिणाम असेल हे अद्याप कुणीही सांगू शकत नाही.नवीन वर्षाच्या सुरुवातीला निवडणुकांचा बार उडणार आहे. फक्त याच क्षेत्रात गरम वातावरण असून, त्याची रंगीत तालीम काही आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. (वार्ताहर)