शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

ग्रामीण भागात नोटाबंदीमुळे नागरिक त्रस्त

By admin | Updated: January 1, 2017 22:57 IST

ग्रामीण भागात नोटाबंदीमुळे नागरिक त्रस्त

ओझर : वर्ष सरत असताना ग्रामीण भागात मात्र नोटाबंदीच्या झळा कायम असून, यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सरत्या वर्षात चलनटंचाईमुळे आर्थिक पातळीवर प्रत्येक मध्यमवर्गीयाची बरीच दमछाक झालेली पाहायला मिळाली.नोटाबंदीने पन्नास दिवसांचा टप्पा गाठला, परंतु सामान्य माणसाला अजूनदेखील अनेक मूलभूत गरजांना कात्री लागलेली प्रकर्षाने जाणवतेय. कारण खात्यावर पैसे असूनही काढण्यावर निर्बंध, चलन तुटवडा यामुळे दैनंदिन खर्च करतानादेखील अनेकांचा खिसा रिकामा आहे. याचा थेट परिणाम बाजारावर झालेला दिसतोय. लहानमोठे व्यापारीदेखील कधी नव्हे इतक्या मंदीच्या मानसिकतेमध्ये आहेत. बँकांमध्ये रांगा कायम आहेत. एटीएमच्या बाहेरदेखील गर्दी कायम असून, अर्ध्याहून अधिक वेळ त्यात पैसे शिल्लक राहत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. दुसरीकडे आपण ज्या शेतकऱ्याच्या जिवावर जगतो त्याच्याच शेतमालाला भाव नाही.एकूण एकरी लावलेल्या खर्चाइतकेदेखील उत्पन्न आज मिळत नसल्याचे भीषण चित्र आहे.  नोव्हेंबर आणि डिसेंबर हे शेवटचे दोन महिने पूर्णपणे आर्थिक नियोजनात गेले असल्याने त्याचा अजून किती महिने परिणाम असेल हे अद्याप कुणीही सांगू शकत नाही.नवीन वर्षाच्या सुरुवातीला निवडणुकांचा बार उडणार आहे. फक्त याच क्षेत्रात गरम वातावरण असून, त्याची रंगीत तालीम काही आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. (वार्ताहर)