शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

भ्रमणध्वनीच्या अतिवापराने बळावले आजार

By admin | Updated: November 17, 2015 22:30 IST

सोशल नेटवर्किंग : कपोलकल्पित माहितीचे बोगस अकाउंटच्या माध्यमातून प्रसारण

 द्याने : अनेकजण इंटरनेटच्या सतत संपर्कात राहू लागले आहेत. माहिती तंत्रज्ञानातील बदलांमुळे मोबाइलमध्येही अनेक बदल झाले आहेत. सोशल नेटवर्किंगच्या सेवा मोबाइलमध्ये उपलब्ध असल्यामुळे ग्रामीण भागात मोबाइलद्वारे इंटरनेटचा वापर वाढत चालला आहे. क्षणाक्षणाला आपल्या भोवतालच्या घटना, मोबाइलवरून काढलेली आणि मोबाइलवर शेअर केलेली वेगवेगळी छायाचित्रे, वैयक्तिक अशी इत्यंभूत माहिती ग्रामीण भागातही फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर यासारख्या सोशल नेटवर्किंगवर लाखो युवक अपडेट करताना सर्रास दिसत आहेत; मात्र एखाद्या समाजकंटकांच्या हातात हे माध्यम सापडल्यानंतर त्याचा समाजावर काय परिणाम होऊ शकतो याचा कुणीही विचार करत नाही.ई-मेल तपासणे, जगभरातील माहिती घेत राहणे, यासाठी इंटरनेटचा वापर योग्य आहे. गेल्या काही वर्षांपासून सोशल नेटवर्किंगचा वापर शहरी युवा पिढीप्रमाणेच ग्रामीण युवकांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येत आहे.मोबाइलसारख्या माध्यमातून तासन्तास सोशल नेटवर्किंगचा वापर करणारे हजारो युवक ग्रामीण भागातही पहावयास मिळत आहेत. या वापरामागे विविध कारणेही आहेत. यामुळे अपडेट राहायला मदत होते. शिवाय, नवनवीन माहिती मिळण्यास मदत होतेच; मात्र आपले मत मांडण्यासाठी व्यासपीठ व मित्रांशी अनोख्या संवादाचे माध्यम मिळाल्याचा विशेष आनंद ग्रामीण युवकांमध्ये पहावयास मिळत आहे. ग्रामीण भागातील ग्रामपंचायत स्तरापासून ते जिल्हा परिषद ते अगदी आमदार-खासदारांपर्यंत अनेक नेते-कार्यकर्ते इमेज बिल्डिंगसाठी या सोशल साईटचा खूप मोठा वापर करीत असल्याचे वेळोवेळी समोर आले आहेच. त्यामुळे सोशल नेटवर्किंग हे अनेकांसाठी एक व्यसन होऊन बसले आहे. त्याचाच फायदा समाजकंटक घेत आहेत. त्यामुळे या व्यसनाच्या आहारी जायचे आणि समाजात तेढ निर्माण करू पाहणाऱ्या समाजकंटकांचे इप्सित साध्य करून द्यायचे की, केवळ सकारात्मक वापर करायचा हे प्रत्येकाने ठरविण्याची गरज निर्माण झाली आहे. समूह भावनेशी कसा साधणार संवाद सोशल मीडियाद्वारे धार्मिक भावना, राष्ट्रीय मूल्यव्यवस्था विस्कटण्याचा प्रयत्न होत असेल तर सरकार व समाज दोघांनाही स्वस्थ बसून राहता येणार नाही. त्यामुळे सरकारने त्यांची जबाबदारी पार पाडावी हे जेवढे खरे आहे, त्याप्रमाणेच लोकांनीही समंजस सहभाग दिला पाहिजे.नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे सोशल नेटवर्किंगचे जेवढे फायदे तेवढेच तोटेही आहेतच; मात्र या फायद्या-तोट्याचे गणित एवढी प्रचिती येऊनही तितकेसे गांभीर्याने घेतले जात नाही. बोगस अकाऊंटचा सुळसुळाट सोशल मीडियावरची कुठली माहिती ही गंभीरपणे घेण्याच्या लायकीची आहे आणि कुठली नाही याचा सारासार विचारच होत नाही. मोबाइलवर तयार करण्यात आलेली कपोलकल्पित माहिती बोगस अकाऊंटच्या माध्यमातून अनेकांच्या मोबाइलवर आदळत असते. त्याच्या अस्सलपणाची खात्री कोण देणार आणि ती खात्री करून तरी कशी घ्यायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (वार्ताहर)