शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

धार्मिक एकोपा जोपासणारे चिखल ओहोळ गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:11 IST

संपूर्ण गावाचा कल धार्मिक असून सगळ्या जाती धर्माचे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. गावात सगळ्याच समाजाची अशी अठरा ...

संपूर्ण गावाचा कल धार्मिक असून सगळ्या जाती धर्माचे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. गावात सगळ्याच समाजाची अशी अठरा मंदिरे आहेत. विशेष म्हणजे १८३२ ची स्थापना असलेले हेमाडपंथी, १९१ वर्ष जुने असलेले विठ्ठल महादेव मंदिर गावाच्या अगदी मध्यभागी असून गाव व गावाच्या आजूबाजूला असलेल्या इतर गावांतील लोकांचेही श्रद्धास्थान झाले आहे. गावात विठ्ठल मंदिरांसह श्रीराम मंदिर, शनी मंदिर, सावता महाराज मंदिर, गणपती मंदिर, सहजादेवी मंदिर, कालिकामाता मंदिर, कानबाई मंदिर, मुक्ताई मंदिर, हनुमान मंदिर, दत्त मंदिर, नागदेवता मंदिर, पीरबाबा ठाणे, महादेव मंदिर, संत गोविंद महाराज मंदिर,श्री स्वामी समर्थ केंद्र,संत सेना महाराज मंदिर आदी धार्मिक स्थळे असून समाजप्रबोधनासाठी रघुवीर समर्थ केंद्र व प.पू.पांडुरंग शास्त्री परिवाराचे स्वाध्याय वर्ग आठवड्यातून दोन दिवस चालतात. गावातील प्रत्येक मंदिरात सकाळ-संध्याकाळ आरती व पूजा ही नित्याचीच. वर्षभरात प्रत्येक जाती-धर्मातील मंदिराचे धार्मिक कार्यक्रम एकत्रितपणे साजरे केले जातात. श्रावण महिन्यातील सप्ताहाला तर संपूर्ण गाव हजर असतो.

गावाच्या विकासात कर्मवीर नारायणराव सर्जेराव देशमुख यांचे मोठे योगदान आहे. सन १९६९ माळमाथ्यावर ज्ञानगंगा आणून परिसरातील शैक्षणिक दुष्काळ दूर केला. त्याच्या ह्या कार्यामुळे गावासह मानके, सायने, देवारपाडे, नाळे, शेंदूरणी, सिताने रोंजाने शेड, गिगाव, म्हालंगाव, दहिकुटे, महाजन वस्ती येथील लोकांना माध्यमिक शिक्षणाची सोय गावातच केली. त्यामुळे आज शैक्षणिक क्षेत्रात ही गाव अग्रेसर असून गावातील शंभरावर तरुण सैन्यदलात देशसेवा बजावत आहेत. माजी कॅबिनेट कामगार कल्याणमंत्री हेमंत देशमुख दोंडाईचा हे मूळ चिखलओहोळ येथीलच आहेत. इंग्रजांच्या काळातील रेस्ट हाऊस असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा करण्यासाठी येवला जाताना या ठिकाणी एक दिवसाचा मुक्काम केला आहे. ऐतिहासिकदृष्ट्याही गावाचा लौकीक आहे.