शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

धार्मिक एकोपा जोपासणारे चिखल ओहोळ गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:11 IST

संपूर्ण गावाचा कल धार्मिक असून सगळ्या जाती धर्माचे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. गावात सगळ्याच समाजाची अशी अठरा ...

संपूर्ण गावाचा कल धार्मिक असून सगळ्या जाती धर्माचे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. गावात सगळ्याच समाजाची अशी अठरा मंदिरे आहेत. विशेष म्हणजे १८३२ ची स्थापना असलेले हेमाडपंथी, १९१ वर्ष जुने असलेले विठ्ठल महादेव मंदिर गावाच्या अगदी मध्यभागी असून गाव व गावाच्या आजूबाजूला असलेल्या इतर गावांतील लोकांचेही श्रद्धास्थान झाले आहे. गावात विठ्ठल मंदिरांसह श्रीराम मंदिर, शनी मंदिर, सावता महाराज मंदिर, गणपती मंदिर, सहजादेवी मंदिर, कालिकामाता मंदिर, कानबाई मंदिर, मुक्ताई मंदिर, हनुमान मंदिर, दत्त मंदिर, नागदेवता मंदिर, पीरबाबा ठाणे, महादेव मंदिर, संत गोविंद महाराज मंदिर,श्री स्वामी समर्थ केंद्र,संत सेना महाराज मंदिर आदी धार्मिक स्थळे असून समाजप्रबोधनासाठी रघुवीर समर्थ केंद्र व प.पू.पांडुरंग शास्त्री परिवाराचे स्वाध्याय वर्ग आठवड्यातून दोन दिवस चालतात. गावातील प्रत्येक मंदिरात सकाळ-संध्याकाळ आरती व पूजा ही नित्याचीच. वर्षभरात प्रत्येक जाती-धर्मातील मंदिराचे धार्मिक कार्यक्रम एकत्रितपणे साजरे केले जातात. श्रावण महिन्यातील सप्ताहाला तर संपूर्ण गाव हजर असतो.

गावाच्या विकासात कर्मवीर नारायणराव सर्जेराव देशमुख यांचे मोठे योगदान आहे. सन १९६९ माळमाथ्यावर ज्ञानगंगा आणून परिसरातील शैक्षणिक दुष्काळ दूर केला. त्याच्या ह्या कार्यामुळे गावासह मानके, सायने, देवारपाडे, नाळे, शेंदूरणी, सिताने रोंजाने शेड, गिगाव, म्हालंगाव, दहिकुटे, महाजन वस्ती येथील लोकांना माध्यमिक शिक्षणाची सोय गावातच केली. त्यामुळे आज शैक्षणिक क्षेत्रात ही गाव अग्रेसर असून गावातील शंभरावर तरुण सैन्यदलात देशसेवा बजावत आहेत. माजी कॅबिनेट कामगार कल्याणमंत्री हेमंत देशमुख दोंडाईचा हे मूळ चिखलओहोळ येथीलच आहेत. इंग्रजांच्या काळातील रेस्ट हाऊस असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा करण्यासाठी येवला जाताना या ठिकाणी एक दिवसाचा मुक्काम केला आहे. ऐतिहासिकदृष्ट्याही गावाचा लौकीक आहे.