शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

माफक वीजदरासाठी धोरण निश्चित करणार : मुख्यमंत्री

By admin | Updated: December 27, 2014 01:08 IST

महाराष्ट्र वीज कामगार महासंघ सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात प्रतिपादन

नाशिक : इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात विजेचे दर जास्त आहेत; राज्यातील उद्योगाला चालना देण्यासाठी तसेच ग्राहकांनाही माफक दरात वीज मिळावी यासाठी धोरण निश्चित करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. विजेचे वाढते दर हे महाराष्ट्रासमोर मोठे आव्हान असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. म्हसरूळरोडवरील देवधर महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित भारतीय मजदूर संघ संलग्न महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, सीमा हिरे, भारतीय मजदूर महासंघाचे उपाध्यक्ष के. लक्ष्मा रेड्डी, महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे अध्यक्ष अण्णा देसाई, प्रभाकर बाणासुरे, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता, के. के. हरदास, एस. एन. देशपांडे, अख्तर हुसेन उपस्थित होते. अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, उद्योजक, व्यापारी आणि ग्राहकांना स्वत दरात वीज मिळाली पाहिजे अशी आपली भूमिका आहे. त्यामुळे वीजदर कसे कमी करता येतील यासाठी केवळ शासनावरच अवलंबून चालणार नाही तर वीज कंपनी आणि कर्मचाऱ्यांचे सहकार्यदेखील महत्त्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्रातील विजेचे दर हे इतर राज्यांच्या तुलनेत अधिक आहेत. त्यामुळेच उद्योजक महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करीत नाहीत, ही परिस्थिती बदलण्यासाठी भूमिका घेतली जाईल. महाराष्ट्रात उद्योजकांची गुंतवणूक वाढली पाहिजे यासाठी वीज दर कमी करणे महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कृषी सबसिडीमुळे सुमारे आठ हजार कोंटींचा भार उद्योजकांवर पडतो. ही विसंगती दूर होणे अपेक्षित असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. विजेची गळती ही सर्वांत मोठी अडचण कंपनीसमोर आहे. आज विजेच्या क्षेत्रात मोठे आव्हान निर्माण होत आहेत. जोपर्यंत आपण विजेची गळती कमी करीत नाही तोपर्यंत आपण स्पर्धा करू शकणार नाही असेही ते म्हणाले.वीज क्षेत्रात आपल्या तीन कंपन्या असल्या तरी त्या एकच आहेत, केवळ कंपनीकडे बोटे दाखवून चालणार नाही तर कर्मचाऱ्यांनीदेखील आपली कार्यकुशलता आणि क्षमतेतून या कंपन्यांना हातभार लावला पाहिजे. शासन, कंपनी आणि कर्मचारी म्हणून आपणा सर्वांची ही जबाबदारी आहे. तसे झाले तरच आपण ग्राहकांना माफक दरात वीज उपलब्ध करून देऊ शकू, असेही फडणवीस म्हणाले. प्रारंभी महासंघाच्या वतीने मुख्यमंत्र्यांसह आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. महासंघाचे अध्यक्ष अण्णा देसाई यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी कर्मचाऱ्यांसमोर असलेली आव्हाने आणि कंपन्यांचा कारभार याविषयी भूमिका मांडली. (प्रतिनिधी)