शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

‘वंचित’मुळे आघाडीच्या काही जागांना फटका छगन भुजबळ : तर भाजप सत्तेपासून दूर गेली असती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 01:29 IST

नाशिक : विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने मते खाल्ल्यामुळे आघाडीच्या काही जागांवर फटका बसला असून, वंचितने आघाडीबरोबर यावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले ते जर आघाडीसोबत राहिले असते तर भारतीय जनता पक्ष सत्तेपासून दूर गेला असता असा दावा राष्टÑवादीचे नेते आमदार छगन भुजबळ यांनी केला आहे.

नाशिक : विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने मते खाल्ल्यामुळे आघाडीच्या काही जागांवर फटका बसला असून, वंचितने आघाडीबरोबर यावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले ते जर आघाडीसोबत राहिले असते तर भारतीय जनता पक्ष सत्तेपासून दूर गेला असता असा दावा राष्टÑवादीचे नेते आमदार छगन भुजबळ यांनी केला आहे.कॉँग्रेस आघाडीच्या विजयी व पराभूत उमेदवारांचा शुक्रवारी राष्टÑवादी भवनात भुजबळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना भुजबळ म्हणाले, राज्यातील काही जागांवर वंचित बहुजन आघाडीमुळे कॉँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना फटका बसला आहे. पंकज भुजबळ यांचा नांदगाव मतदारसंघात त्यामुळे पराभव झाला असून, विजयासाठी जितकी मते हवी होती ती सारी मते वंचितच्या उमेदवाराने घेतल्यामुळे पंकज भुजबळ यांचा पराभव झाला. वंचितच्या उमेदवारांमुळे मतांचे विभाजन झाले ते होऊ नये यासाठी निवडणुकीपूर्वीच कॉँग्रेस आघाडीने वंचितबरोबर चर्चा सुरू केली होती. कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलत होते व बऱ्यापैकी जागाही देऊ केल्या होत्या; परंतु वंचितच्या वागण्या, बोलण्यात सातत्य नव्हते. ते प्रत्येक वेळी वेगळे काही तरी बोलत होते.आघाडीत सामील व्हायचे नव्हते असेच त्यांचे वर्तन होते; मात्र ते जर आघाडीत सामील झाले असते तर भाजप सत्तेपासून बरीच दूर गेली असती.शिवसेनेने भाजपसमोर फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला ठेवला असून, अशा प्रसंगी सेना व कॉँग्रेस आघाडी एकत्र येऊन राज्यात सत्ता स्थापन करू शकते काय या प्रश्नावर भुजबळ यांनी ‘राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही’ असे सूचक विधान केले. एक्झिट पोल व ज्योतिषीदेखील आता खरे सांगत नाही असा अनुभव असताना राजकारणातदेखील काहीही होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Politicsराजकारण