शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

‘वंचित’मुळे आघाडीच्या काही जागांना फटका छगन भुजबळ : तर भाजप सत्तेपासून दूर गेली असती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 01:29 IST

नाशिक : विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने मते खाल्ल्यामुळे आघाडीच्या काही जागांवर फटका बसला असून, वंचितने आघाडीबरोबर यावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले ते जर आघाडीसोबत राहिले असते तर भारतीय जनता पक्ष सत्तेपासून दूर गेला असता असा दावा राष्टÑवादीचे नेते आमदार छगन भुजबळ यांनी केला आहे.

नाशिक : विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने मते खाल्ल्यामुळे आघाडीच्या काही जागांवर फटका बसला असून, वंचितने आघाडीबरोबर यावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले ते जर आघाडीसोबत राहिले असते तर भारतीय जनता पक्ष सत्तेपासून दूर गेला असता असा दावा राष्टÑवादीचे नेते आमदार छगन भुजबळ यांनी केला आहे.कॉँग्रेस आघाडीच्या विजयी व पराभूत उमेदवारांचा शुक्रवारी राष्टÑवादी भवनात भुजबळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना भुजबळ म्हणाले, राज्यातील काही जागांवर वंचित बहुजन आघाडीमुळे कॉँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना फटका बसला आहे. पंकज भुजबळ यांचा नांदगाव मतदारसंघात त्यामुळे पराभव झाला असून, विजयासाठी जितकी मते हवी होती ती सारी मते वंचितच्या उमेदवाराने घेतल्यामुळे पंकज भुजबळ यांचा पराभव झाला. वंचितच्या उमेदवारांमुळे मतांचे विभाजन झाले ते होऊ नये यासाठी निवडणुकीपूर्वीच कॉँग्रेस आघाडीने वंचितबरोबर चर्चा सुरू केली होती. कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलत होते व बऱ्यापैकी जागाही देऊ केल्या होत्या; परंतु वंचितच्या वागण्या, बोलण्यात सातत्य नव्हते. ते प्रत्येक वेळी वेगळे काही तरी बोलत होते.आघाडीत सामील व्हायचे नव्हते असेच त्यांचे वर्तन होते; मात्र ते जर आघाडीत सामील झाले असते तर भाजप सत्तेपासून बरीच दूर गेली असती.शिवसेनेने भाजपसमोर फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला ठेवला असून, अशा प्रसंगी सेना व कॉँग्रेस आघाडी एकत्र येऊन राज्यात सत्ता स्थापन करू शकते काय या प्रश्नावर भुजबळ यांनी ‘राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही’ असे सूचक विधान केले. एक्झिट पोल व ज्योतिषीदेखील आता खरे सांगत नाही असा अनुभव असताना राजकारणातदेखील काहीही होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Politicsराजकारण