शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

चांदोरी, सायखेड्याला पुराचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 01:39 IST

सायखेडा : दारणा, गंगापूर व कडवा धरणातून सुरू असलेला विसर्ग आणि गोदाकाठ परिसरातील संततधारेमुळे नदीकाठावर वसलेल्या सायखेडा व चांदोरी गावात सलग चौथ्या दिवशीही पूरस्थिती कायम होती.

लोकमत न्यूज नेटवर्कसायखेडा : दारणा, गंगापूर व कडवा धरणातून सुरू असलेला विसर्ग आणि गोदाकाठ परिसरातील संततधारेमुळे नदीकाठावर वसलेल्या सायखेडा व चांदोरी गावात सलग चौथ्या दिवशीही पूरस्थिती कायम होती. नदीकाठच्या गंगानगर, बाजारतळ या भागात पाणी घुसले असून, येथील रहिवाशांना रविवारी मध्यरात्री सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. पाण्याचा वाढता वेग पाहून प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. गोदावरी नदीत विसर्ग सुरू झाला की पहिला पुराचा धोका सायखेडा, चांदोरी, शिंगवे, करंजगाव या नदीकाठच्या गावांना बसतो. प्रत्येक पावसाळ्यात सायखेडा, चांदोरी गावांना पुराचा वेढा बसतो. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचे सर्वाधिक लक्ष या गावाकडे असते. चार दिवसांपासून निफाड तहसीलदार, सर्कल, पोलीस प्रशासन या ठिकाणी ठाण मांडून आहेत. नागरिकांना वेळोवेळी सूचना दिल्या जात आहे तर सायखेडा येथील धोकादायक पुलावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अनेक नागरिक पुलावर थांबून सेल्फीचा आनंद घेतात; मात्र परिस्थिती लक्षात घेता पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.अनेक दिवसांपासून गोदावरी नदीच्या पाण्याबरोबर पानवेली वाहून येत असून, त्यामुळे पाण्याचा दाब वाढल्याने पुलाखालून पाणी वाहण्यास अडथळा होत होता. त्यामुळे पुलाला धोका पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही; मात्र पानवेलीच्या विषयावर प्रशासनाने कानावर हात ठेवले होते. पाण्याचा वेग पाहून प्रशासनाने रात्री १२ वाजता पानवेली काढण्याचे काम सुरू करत पानवेली बाहेर काढण्यात आल्या आहेत.खंडेराज महाराज मंदिर पाण्याखाली४पुराच्या पाण्यामुळे चांदोरी येथील खंडेराव महाराज मंदिर पाण्याखाली गेले आहे. पुरामुळे पाणीपुरवठ्याची विहीर पाण्यात गेल्याने पिण्यासासाठी गोदाकाठ भागातील सर्व गावांना कूपनलिकेद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. आरोग्य विभागाने खबरदारी घ्यावी, अशी मागणी होत आहे. ४गोदाकाठ भागात सतत तीन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांनी घराबाहेर न पडता घरात थांबनेच पसंत केले आहे. सततच्या पावसामुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे. परिणामी आर्थिक गणिते कोलांडण्याची शक्यता आहे. चाऱ्याचा प्रश्न गंभीरसततच्या पावसाने शेतात पाणी साचल्याने शेतीची कामे ठप्प झाली आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, पाऊस पडत असल्याने शेतात असलेला चारा कापता येत नाही. त्यामुळे चार दिवसांपासून चाऱ्याचा प्रश्न शेतकऱ्यांसाठी अवघड झाला आहे, एकंदरीत अशी परिस्थिती आणखी काही दिवस राहिल्यास जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.