शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

चांदोरी, सायखेड्याला पुराचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 01:39 IST

सायखेडा : दारणा, गंगापूर व कडवा धरणातून सुरू असलेला विसर्ग आणि गोदाकाठ परिसरातील संततधारेमुळे नदीकाठावर वसलेल्या सायखेडा व चांदोरी गावात सलग चौथ्या दिवशीही पूरस्थिती कायम होती.

लोकमत न्यूज नेटवर्कसायखेडा : दारणा, गंगापूर व कडवा धरणातून सुरू असलेला विसर्ग आणि गोदाकाठ परिसरातील संततधारेमुळे नदीकाठावर वसलेल्या सायखेडा व चांदोरी गावात सलग चौथ्या दिवशीही पूरस्थिती कायम होती. नदीकाठच्या गंगानगर, बाजारतळ या भागात पाणी घुसले असून, येथील रहिवाशांना रविवारी मध्यरात्री सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. पाण्याचा वाढता वेग पाहून प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. गोदावरी नदीत विसर्ग सुरू झाला की पहिला पुराचा धोका सायखेडा, चांदोरी, शिंगवे, करंजगाव या नदीकाठच्या गावांना बसतो. प्रत्येक पावसाळ्यात सायखेडा, चांदोरी गावांना पुराचा वेढा बसतो. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचे सर्वाधिक लक्ष या गावाकडे असते. चार दिवसांपासून निफाड तहसीलदार, सर्कल, पोलीस प्रशासन या ठिकाणी ठाण मांडून आहेत. नागरिकांना वेळोवेळी सूचना दिल्या जात आहे तर सायखेडा येथील धोकादायक पुलावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अनेक नागरिक पुलावर थांबून सेल्फीचा आनंद घेतात; मात्र परिस्थिती लक्षात घेता पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.अनेक दिवसांपासून गोदावरी नदीच्या पाण्याबरोबर पानवेली वाहून येत असून, त्यामुळे पाण्याचा दाब वाढल्याने पुलाखालून पाणी वाहण्यास अडथळा होत होता. त्यामुळे पुलाला धोका पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही; मात्र पानवेलीच्या विषयावर प्रशासनाने कानावर हात ठेवले होते. पाण्याचा वेग पाहून प्रशासनाने रात्री १२ वाजता पानवेली काढण्याचे काम सुरू करत पानवेली बाहेर काढण्यात आल्या आहेत.खंडेराज महाराज मंदिर पाण्याखाली४पुराच्या पाण्यामुळे चांदोरी येथील खंडेराव महाराज मंदिर पाण्याखाली गेले आहे. पुरामुळे पाणीपुरवठ्याची विहीर पाण्यात गेल्याने पिण्यासासाठी गोदाकाठ भागातील सर्व गावांना कूपनलिकेद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. आरोग्य विभागाने खबरदारी घ्यावी, अशी मागणी होत आहे. ४गोदाकाठ भागात सतत तीन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांनी घराबाहेर न पडता घरात थांबनेच पसंत केले आहे. सततच्या पावसामुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे. परिणामी आर्थिक गणिते कोलांडण्याची शक्यता आहे. चाऱ्याचा प्रश्न गंभीरसततच्या पावसाने शेतात पाणी साचल्याने शेतीची कामे ठप्प झाली आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, पाऊस पडत असल्याने शेतात असलेला चारा कापता येत नाही. त्यामुळे चार दिवसांपासून चाऱ्याचा प्रश्न शेतकऱ्यांसाठी अवघड झाला आहे, एकंदरीत अशी परिस्थिती आणखी काही दिवस राहिल्यास जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.