शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

चांदोरी, सायखेड्याला पुराचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 01:39 IST

सायखेडा : दारणा, गंगापूर व कडवा धरणातून सुरू असलेला विसर्ग आणि गोदाकाठ परिसरातील संततधारेमुळे नदीकाठावर वसलेल्या सायखेडा व चांदोरी गावात सलग चौथ्या दिवशीही पूरस्थिती कायम होती.

लोकमत न्यूज नेटवर्कसायखेडा : दारणा, गंगापूर व कडवा धरणातून सुरू असलेला विसर्ग आणि गोदाकाठ परिसरातील संततधारेमुळे नदीकाठावर वसलेल्या सायखेडा व चांदोरी गावात सलग चौथ्या दिवशीही पूरस्थिती कायम होती. नदीकाठच्या गंगानगर, बाजारतळ या भागात पाणी घुसले असून, येथील रहिवाशांना रविवारी मध्यरात्री सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. पाण्याचा वाढता वेग पाहून प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. गोदावरी नदीत विसर्ग सुरू झाला की पहिला पुराचा धोका सायखेडा, चांदोरी, शिंगवे, करंजगाव या नदीकाठच्या गावांना बसतो. प्रत्येक पावसाळ्यात सायखेडा, चांदोरी गावांना पुराचा वेढा बसतो. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचे सर्वाधिक लक्ष या गावाकडे असते. चार दिवसांपासून निफाड तहसीलदार, सर्कल, पोलीस प्रशासन या ठिकाणी ठाण मांडून आहेत. नागरिकांना वेळोवेळी सूचना दिल्या जात आहे तर सायखेडा येथील धोकादायक पुलावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अनेक नागरिक पुलावर थांबून सेल्फीचा आनंद घेतात; मात्र परिस्थिती लक्षात घेता पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.अनेक दिवसांपासून गोदावरी नदीच्या पाण्याबरोबर पानवेली वाहून येत असून, त्यामुळे पाण्याचा दाब वाढल्याने पुलाखालून पाणी वाहण्यास अडथळा होत होता. त्यामुळे पुलाला धोका पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही; मात्र पानवेलीच्या विषयावर प्रशासनाने कानावर हात ठेवले होते. पाण्याचा वेग पाहून प्रशासनाने रात्री १२ वाजता पानवेली काढण्याचे काम सुरू करत पानवेली बाहेर काढण्यात आल्या आहेत.खंडेराज महाराज मंदिर पाण्याखाली४पुराच्या पाण्यामुळे चांदोरी येथील खंडेराव महाराज मंदिर पाण्याखाली गेले आहे. पुरामुळे पाणीपुरवठ्याची विहीर पाण्यात गेल्याने पिण्यासासाठी गोदाकाठ भागातील सर्व गावांना कूपनलिकेद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. आरोग्य विभागाने खबरदारी घ्यावी, अशी मागणी होत आहे. ४गोदाकाठ भागात सतत तीन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांनी घराबाहेर न पडता घरात थांबनेच पसंत केले आहे. सततच्या पावसामुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे. परिणामी आर्थिक गणिते कोलांडण्याची शक्यता आहे. चाऱ्याचा प्रश्न गंभीरसततच्या पावसाने शेतात पाणी साचल्याने शेतीची कामे ठप्प झाली आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, पाऊस पडत असल्याने शेतात असलेला चारा कापता येत नाही. त्यामुळे चार दिवसांपासून चाऱ्याचा प्रश्न शेतकऱ्यांसाठी अवघड झाला आहे, एकंदरीत अशी परिस्थिती आणखी काही दिवस राहिल्यास जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.