शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

चैतन्य पर्वास प्रारंभ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 00:33 IST

‘देवा घरा आला, भक्ती सन्माने पुजिला’ याची प्रचिती शुक्रवारी (दि.२५) घरोघरी बाप्पांच्या आगमनामुळे आली. विघ्नविनाशक सुखकर्ता गणरायाचे ढोल-ताशांच्या गजरात शहरभर जल्लोषात स्वागत होत असतानाच वरुणराजानेही हजेरी लावत अभिषेक केला. सार्वजनिक मंडळांसह घरोघरी बाप्पांची विधीवत प्राणप्रतिष्ठा होत पुढील ११ दिवसांसाठी एका चैतन्य पर्वास दिमाखात प्रारंभ झाला.

नाशिक : ‘देवा घरा आला, भक्ती सन्माने पुजिला’ याची प्रचिती शुक्रवारी (दि.२५) घरोघरी बाप्पांच्या आगमनामुळे आली. विघ्नविनाशक सुखकर्ता गणरायाचे ढोल-ताशांच्या गजरात शहरभर जल्लोषात स्वागत होत असतानाच वरुणराजानेही हजेरी लावत अभिषेक केला. सार्वजनिक मंडळांसह घरोघरी बाप्पांची विधीवत प्राणप्रतिष्ठा होत पुढील ११ दिवसांसाठी एका चैतन्य पर्वास दिमाखात प्रारंभ झाला. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला शुक्रवारी घरोघरी बाप्पांची विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी बाह्य मुहूर्तापासूनच गणेशभक्तांची लगबग सुरू झाली. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत बाप्पांच्या स्वागताची तयारी केली गेली होतीच. श्री गणेश पूजन मध्यान्हव्यापिनी असल्याने सूर्यादयापासून माध्यान्हापर्यंत म्हणजे दुपारी दीड वाजेपर्यंत बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करण्याचा मुहूर्त असला तरी सायंकाळपर्यंत पूजाविधी सुरू होता. शहरात ठिकठिकाणी थाटलेल्या गणेशमूर्तीच्या स्टॉल्समध्ये गणेशभक्तांची वर्दळ होती. सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी ढोलपथकांच्या माध्यमातून वाजत-गाजत, मिरवत बाप्पांचे जल्लोषात स्वागत केले, तर घरोघरी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजराने चैतन्य संचारले होते. बाप्पांच्या आगमनाचा आनंदोत्सव सुरू असतानाच अधूनमधून वरुणराजानेही हजेरी लावत बाप्पांवर अभिषेक घातला. शहरातील मानाचे गणपती असलेले रविवार कारंजावरील श्री सिद्धिविनायक गणपती, भद्रकालीतील साक्षी गणेश, गंगापूररोडवरील नवशा गणपती, अशोकस्तंभवरील ढोल्या गणपती, मेनरोडवरील गणपती या ठिकाणीही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.पूजा साहित्याचा बाजार फुललाश्रींच्या पूजेसाठी लागणाºया साहित्याचीही दुकाने शहरात चौकाचौकांत थाटलेली होती. प्रामुख्याने, बाप्पांसाठी लागणाºया पूजापत्री, कमळपुष्प, नारळ, बेल-दुर्वा, तुळशीपत्र, खारीक-सुपाºया आदी साहित्य खरेदीसाठी गणेशभक्तांची लगबग दिसून आली. फुलांनाही मोठी मागणी वाढल्याने भावही वधारले. एरवी दहा रुपयांमध्ये विक्री होणारा गुलाबफुलांचा गुच्छ ८० ते १०० रुपये डझनावरी विकला गेला, तर गणरायाचे आवडते फूल असलेल्या जास्वंदीलाही प्रचंड मागणी होती. नारळाचाही दर २५ ते ३० रुपये होता. गणेशपूजनासाठी पाच फळं लागत असल्याने फळांची बाजारपेठही खरेदीदारांच्या गर्दीने फुलली होती.गुरुजींचे नेटवर्क जामपंचांगकर्त्यांनी गणेशपूजनासाठी भद्रा वर्ज्य नसल्याचे स्पष्ट केले असले तरी अनेकांनी श्री गणेशपूजन माध्यान्हापर्यंत दुपारी १.३९ वाजेपर्यंतच करावे, असे म्हटल्याने मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी गुरुजींना मागणी वाढली होती. त्यामुळे गुरुजींचे नेटवर्क जाम राहिले. अनेकांनी ब्राह्म मुहूर्तावरच विधीवत प्राणप्रतिष्ठा केली. काही सार्वजनिक मंडळांकडून मात्र रात्री उशिरापर्यंत प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू होता. त्यानिमित्त धार्मिक विधी, श्लोक पठणाचेही कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.