शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

चैतन्य पर्वास प्रारंभ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 00:33 IST

‘देवा घरा आला, भक्ती सन्माने पुजिला’ याची प्रचिती शुक्रवारी (दि.२५) घरोघरी बाप्पांच्या आगमनामुळे आली. विघ्नविनाशक सुखकर्ता गणरायाचे ढोल-ताशांच्या गजरात शहरभर जल्लोषात स्वागत होत असतानाच वरुणराजानेही हजेरी लावत अभिषेक केला. सार्वजनिक मंडळांसह घरोघरी बाप्पांची विधीवत प्राणप्रतिष्ठा होत पुढील ११ दिवसांसाठी एका चैतन्य पर्वास दिमाखात प्रारंभ झाला.

नाशिक : ‘देवा घरा आला, भक्ती सन्माने पुजिला’ याची प्रचिती शुक्रवारी (दि.२५) घरोघरी बाप्पांच्या आगमनामुळे आली. विघ्नविनाशक सुखकर्ता गणरायाचे ढोल-ताशांच्या गजरात शहरभर जल्लोषात स्वागत होत असतानाच वरुणराजानेही हजेरी लावत अभिषेक केला. सार्वजनिक मंडळांसह घरोघरी बाप्पांची विधीवत प्राणप्रतिष्ठा होत पुढील ११ दिवसांसाठी एका चैतन्य पर्वास दिमाखात प्रारंभ झाला. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला शुक्रवारी घरोघरी बाप्पांची विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी बाह्य मुहूर्तापासूनच गणेशभक्तांची लगबग सुरू झाली. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत बाप्पांच्या स्वागताची तयारी केली गेली होतीच. श्री गणेश पूजन मध्यान्हव्यापिनी असल्याने सूर्यादयापासून माध्यान्हापर्यंत म्हणजे दुपारी दीड वाजेपर्यंत बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करण्याचा मुहूर्त असला तरी सायंकाळपर्यंत पूजाविधी सुरू होता. शहरात ठिकठिकाणी थाटलेल्या गणेशमूर्तीच्या स्टॉल्समध्ये गणेशभक्तांची वर्दळ होती. सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी ढोलपथकांच्या माध्यमातून वाजत-गाजत, मिरवत बाप्पांचे जल्लोषात स्वागत केले, तर घरोघरी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजराने चैतन्य संचारले होते. बाप्पांच्या आगमनाचा आनंदोत्सव सुरू असतानाच अधूनमधून वरुणराजानेही हजेरी लावत बाप्पांवर अभिषेक घातला. शहरातील मानाचे गणपती असलेले रविवार कारंजावरील श्री सिद्धिविनायक गणपती, भद्रकालीतील साक्षी गणेश, गंगापूररोडवरील नवशा गणपती, अशोकस्तंभवरील ढोल्या गणपती, मेनरोडवरील गणपती या ठिकाणीही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.पूजा साहित्याचा बाजार फुललाश्रींच्या पूजेसाठी लागणाºया साहित्याचीही दुकाने शहरात चौकाचौकांत थाटलेली होती. प्रामुख्याने, बाप्पांसाठी लागणाºया पूजापत्री, कमळपुष्प, नारळ, बेल-दुर्वा, तुळशीपत्र, खारीक-सुपाºया आदी साहित्य खरेदीसाठी गणेशभक्तांची लगबग दिसून आली. फुलांनाही मोठी मागणी वाढल्याने भावही वधारले. एरवी दहा रुपयांमध्ये विक्री होणारा गुलाबफुलांचा गुच्छ ८० ते १०० रुपये डझनावरी विकला गेला, तर गणरायाचे आवडते फूल असलेल्या जास्वंदीलाही प्रचंड मागणी होती. नारळाचाही दर २५ ते ३० रुपये होता. गणेशपूजनासाठी पाच फळं लागत असल्याने फळांची बाजारपेठही खरेदीदारांच्या गर्दीने फुलली होती.गुरुजींचे नेटवर्क जामपंचांगकर्त्यांनी गणेशपूजनासाठी भद्रा वर्ज्य नसल्याचे स्पष्ट केले असले तरी अनेकांनी श्री गणेशपूजन माध्यान्हापर्यंत दुपारी १.३९ वाजेपर्यंतच करावे, असे म्हटल्याने मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी गुरुजींना मागणी वाढली होती. त्यामुळे गुरुजींचे नेटवर्क जाम राहिले. अनेकांनी ब्राह्म मुहूर्तावरच विधीवत प्राणप्रतिष्ठा केली. काही सार्वजनिक मंडळांकडून मात्र रात्री उशिरापर्यंत प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू होता. त्यानिमित्त धार्मिक विधी, श्लोक पठणाचेही कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.