शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक आखाजी साजरी

By admin | Updated: May 9, 2016 23:32 IST

संस्कृती : आठ दिवस सुरू असतो महिलांचा उत्सव

 पेठ :दुधाने दूध तापे, दुधावर पिवळी साय़माय म्हणे लेकी, आखाजी येई जाय़ शंकर बसला घोड्यावर, गौराई चाले पाय पाय़़़़अक्षय्य तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जाणारा वर्षातील महत्त्वाचा सण़ या सणाला शहरी भागात केवळ स्थावर मालमत्ता, सोने, चांदी, दुचाकी व चारचाकी, घरे अथवा चांगल्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी अक्षय्य तृतीयाचा मुहूर्त पाहिला जात असताना पेठ-सुरगाणासारख्या आदिवासी तालुक्यात मात्र आखाजी हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करून आदिवासी संस्कृतीची जोपासना केली जात असल्याचे दिसून येते़महाराष्ट्र राज्य सणांच्या बाबतीत विविधरंगी राज्य समजले जाते़ जसा प्रदेश तसे सण-समारंभ साजरे करण्याची महाराष्ट्रात प्रथा आहे़ असाच माहेरवाशिणीचा महत्त्वाचा समजला जाणारा अक्षय्य तृतीयेचा सण आदिवासी भागात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येतो़साडेतीन मुहूर्तापैकी एक समजला जाणाऱ्या या सणाला आदिवासी भागात मात्र गौराईचा सण म्हणूनही साजरा करतात़ शहरी भागात खरेदी विक्रीसाठी शुभ मानली जाणारी अक्षय्य तृतीया आदिवासींची आखाजी असते़ आखाजीच्या आदल्या दिवशी घरातील कर्ते पुरुष रानात जाऊन घरातील सुना व मुलींसाठी कोडईच्या झाडाच्या लाकडापासून टिपऱ्या तयार करून आणतात, तर लहान मुले याच लाकडापासून भाले, तलवारी तयार करतात़ त्यांना विविध रंगांनी रंगवतात़सासरी गेलेल्या मुलींसाठी हा सण अतिशय महत्त्वाचा समजला जातो़ प्रत्येक सासूरवासीन आखाजीला हमखास माहेरी येत असते़ दुपारनंतर ऊन कमी झाल्यावर घरात ठेवलेली टोपली पूजा करून बाहेर काढली जाते़ उगवलेल्या रोपाच्या टोपल्या फुलांच्या माळांनी सजवल्या जातात़ गावातील सर्व गौराई मंदिराजवळ एकत्र करून पूजा केली जाते़ डोक्यावर टोपली घेऊन पारंपरिक वाद्य वाजवून वाजत-गाजत या गौरार्इंची मिरवणूक काढली जाते़ यावेळी महिलावर्ग गौराईच्या पारंपरिक ओव्या म्हणतात़ उगवलेल्या धान्याचे कोवळे तुरे आभूषणे म्हणून डोक्याला, कानात लावले जातात़सायंकाळी अतिशय भक्तिमय वातावरणात या गौरार्इंचे सार्वजनिक तलाव, नदी अशा ठिकाणी पाण्यात विसर्जन केले जाते़ या उत्सवात गावातील अबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी होत असतात़ महिला टिपऱ्या खेळतात तर लहान मुले लाकडी भाले व तलवारीचे खेळ खेळताना दिसतात़विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर टोपलीतील धान्याचे तुरे गावातील लोकांच्या कानाला व डोक्याला लावून त्यांच्याकडून दोन-चार रुपये गोळा केली जातात़ यावेळी महिला पारंपरिक गाणे सादर करतात़अशा पद्धतीने शहरी भागात अक्षय्य तृतीया केवळ शुभ दिवस म्हणून सोने-चांदीच्या खरेदीसाठी रांगा लावणाऱ्या धनधांडग्यापेक्षा खऱ्या अर्थाने या सणांचे पावित्र्य जपण्याचे व आदिवासी संस्कृती जतन करण्याचे काम आजही दऱ्याखोऱ्यात केले जात असल्याचे या उत्सवावरून दिसून येते़ (वार्ताहर)