शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
2
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
3
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
4
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
5
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
6
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
7
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
8
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
9
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
10
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
11
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
12
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
14
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
15
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
16
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
17
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
18
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
19
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
20
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा

पारंपरिक आखाजी साजरी

By admin | Updated: May 9, 2016 23:32 IST

संस्कृती : आठ दिवस सुरू असतो महिलांचा उत्सव

 पेठ :दुधाने दूध तापे, दुधावर पिवळी साय़माय म्हणे लेकी, आखाजी येई जाय़ शंकर बसला घोड्यावर, गौराई चाले पाय पाय़़़़अक्षय्य तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जाणारा वर्षातील महत्त्वाचा सण़ या सणाला शहरी भागात केवळ स्थावर मालमत्ता, सोने, चांदी, दुचाकी व चारचाकी, घरे अथवा चांगल्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी अक्षय्य तृतीयाचा मुहूर्त पाहिला जात असताना पेठ-सुरगाणासारख्या आदिवासी तालुक्यात मात्र आखाजी हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करून आदिवासी संस्कृतीची जोपासना केली जात असल्याचे दिसून येते़महाराष्ट्र राज्य सणांच्या बाबतीत विविधरंगी राज्य समजले जाते़ जसा प्रदेश तसे सण-समारंभ साजरे करण्याची महाराष्ट्रात प्रथा आहे़ असाच माहेरवाशिणीचा महत्त्वाचा समजला जाणारा अक्षय्य तृतीयेचा सण आदिवासी भागात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येतो़साडेतीन मुहूर्तापैकी एक समजला जाणाऱ्या या सणाला आदिवासी भागात मात्र गौराईचा सण म्हणूनही साजरा करतात़ शहरी भागात खरेदी विक्रीसाठी शुभ मानली जाणारी अक्षय्य तृतीया आदिवासींची आखाजी असते़ आखाजीच्या आदल्या दिवशी घरातील कर्ते पुरुष रानात जाऊन घरातील सुना व मुलींसाठी कोडईच्या झाडाच्या लाकडापासून टिपऱ्या तयार करून आणतात, तर लहान मुले याच लाकडापासून भाले, तलवारी तयार करतात़ त्यांना विविध रंगांनी रंगवतात़सासरी गेलेल्या मुलींसाठी हा सण अतिशय महत्त्वाचा समजला जातो़ प्रत्येक सासूरवासीन आखाजीला हमखास माहेरी येत असते़ दुपारनंतर ऊन कमी झाल्यावर घरात ठेवलेली टोपली पूजा करून बाहेर काढली जाते़ उगवलेल्या रोपाच्या टोपल्या फुलांच्या माळांनी सजवल्या जातात़ गावातील सर्व गौराई मंदिराजवळ एकत्र करून पूजा केली जाते़ डोक्यावर टोपली घेऊन पारंपरिक वाद्य वाजवून वाजत-गाजत या गौरार्इंची मिरवणूक काढली जाते़ यावेळी महिलावर्ग गौराईच्या पारंपरिक ओव्या म्हणतात़ उगवलेल्या धान्याचे कोवळे तुरे आभूषणे म्हणून डोक्याला, कानात लावले जातात़सायंकाळी अतिशय भक्तिमय वातावरणात या गौरार्इंचे सार्वजनिक तलाव, नदी अशा ठिकाणी पाण्यात विसर्जन केले जाते़ या उत्सवात गावातील अबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी होत असतात़ महिला टिपऱ्या खेळतात तर लहान मुले लाकडी भाले व तलवारीचे खेळ खेळताना दिसतात़विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर टोपलीतील धान्याचे तुरे गावातील लोकांच्या कानाला व डोक्याला लावून त्यांच्याकडून दोन-चार रुपये गोळा केली जातात़ यावेळी महिला पारंपरिक गाणे सादर करतात़अशा पद्धतीने शहरी भागात अक्षय्य तृतीया केवळ शुभ दिवस म्हणून सोने-चांदीच्या खरेदीसाठी रांगा लावणाऱ्या धनधांडग्यापेक्षा खऱ्या अर्थाने या सणांचे पावित्र्य जपण्याचे व आदिवासी संस्कृती जतन करण्याचे काम आजही दऱ्याखोऱ्यात केले जात असल्याचे या उत्सवावरून दिसून येते़ (वार्ताहर)