शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

पारंपरिक आखाजी साजरी

By admin | Updated: May 9, 2016 23:32 IST

संस्कृती : आठ दिवस सुरू असतो महिलांचा उत्सव

 पेठ :दुधाने दूध तापे, दुधावर पिवळी साय़माय म्हणे लेकी, आखाजी येई जाय़ शंकर बसला घोड्यावर, गौराई चाले पाय पाय़़़़अक्षय्य तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जाणारा वर्षातील महत्त्वाचा सण़ या सणाला शहरी भागात केवळ स्थावर मालमत्ता, सोने, चांदी, दुचाकी व चारचाकी, घरे अथवा चांगल्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी अक्षय्य तृतीयाचा मुहूर्त पाहिला जात असताना पेठ-सुरगाणासारख्या आदिवासी तालुक्यात मात्र आखाजी हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करून आदिवासी संस्कृतीची जोपासना केली जात असल्याचे दिसून येते़महाराष्ट्र राज्य सणांच्या बाबतीत विविधरंगी राज्य समजले जाते़ जसा प्रदेश तसे सण-समारंभ साजरे करण्याची महाराष्ट्रात प्रथा आहे़ असाच माहेरवाशिणीचा महत्त्वाचा समजला जाणारा अक्षय्य तृतीयेचा सण आदिवासी भागात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येतो़साडेतीन मुहूर्तापैकी एक समजला जाणाऱ्या या सणाला आदिवासी भागात मात्र गौराईचा सण म्हणूनही साजरा करतात़ शहरी भागात खरेदी विक्रीसाठी शुभ मानली जाणारी अक्षय्य तृतीया आदिवासींची आखाजी असते़ आखाजीच्या आदल्या दिवशी घरातील कर्ते पुरुष रानात जाऊन घरातील सुना व मुलींसाठी कोडईच्या झाडाच्या लाकडापासून टिपऱ्या तयार करून आणतात, तर लहान मुले याच लाकडापासून भाले, तलवारी तयार करतात़ त्यांना विविध रंगांनी रंगवतात़सासरी गेलेल्या मुलींसाठी हा सण अतिशय महत्त्वाचा समजला जातो़ प्रत्येक सासूरवासीन आखाजीला हमखास माहेरी येत असते़ दुपारनंतर ऊन कमी झाल्यावर घरात ठेवलेली टोपली पूजा करून बाहेर काढली जाते़ उगवलेल्या रोपाच्या टोपल्या फुलांच्या माळांनी सजवल्या जातात़ गावातील सर्व गौराई मंदिराजवळ एकत्र करून पूजा केली जाते़ डोक्यावर टोपली घेऊन पारंपरिक वाद्य वाजवून वाजत-गाजत या गौरार्इंची मिरवणूक काढली जाते़ यावेळी महिलावर्ग गौराईच्या पारंपरिक ओव्या म्हणतात़ उगवलेल्या धान्याचे कोवळे तुरे आभूषणे म्हणून डोक्याला, कानात लावले जातात़सायंकाळी अतिशय भक्तिमय वातावरणात या गौरार्इंचे सार्वजनिक तलाव, नदी अशा ठिकाणी पाण्यात विसर्जन केले जाते़ या उत्सवात गावातील अबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी होत असतात़ महिला टिपऱ्या खेळतात तर लहान मुले लाकडी भाले व तलवारीचे खेळ खेळताना दिसतात़विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर टोपलीतील धान्याचे तुरे गावातील लोकांच्या कानाला व डोक्याला लावून त्यांच्याकडून दोन-चार रुपये गोळा केली जातात़ यावेळी महिला पारंपरिक गाणे सादर करतात़अशा पद्धतीने शहरी भागात अक्षय्य तृतीया केवळ शुभ दिवस म्हणून सोने-चांदीच्या खरेदीसाठी रांगा लावणाऱ्या धनधांडग्यापेक्षा खऱ्या अर्थाने या सणांचे पावित्र्य जपण्याचे व आदिवासी संस्कृती जतन करण्याचे काम आजही दऱ्याखोऱ्यात केले जात असल्याचे या उत्सवावरून दिसून येते़ (वार्ताहर)