शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
5
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
6
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
7
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
8
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
9
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
10
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
11
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
12
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
13
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
14
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
15
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
16
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
17
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
18
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
19
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
20
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी

ग्रामीण भागातील बससेवा अधिक सक्षम करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:11 IST

नाशिक महापालिकेची शहर बससेवा सुरू झाल्याने राज्य परिवहन महामंडळाला आता ग्रामीण भागातील प्रवासी सेवा अधिक सक्षम करता ...

नाशिक महापालिकेची शहर बससेवा सुरू झाल्याने राज्य परिवहन महामंडळाला आता ग्रामीण भागातील प्रवासी सेवा अधिक सक्षम करता येणार आहे. महामंडळाने नेहमीच दर्जेदार प्रवासी सेवा पुरविण्याला प्राधान्य दिले आहे. शहरातील प्रवासी वाहतुकीचा ताण कमी झाल्याने आता ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी अधिक चांगली प्रवासी सेवा देता येऊ शकणार आहे.

नाशिक महापालिकेने प्रवासी वाहतूक सुरू केली ही आनंदाचीच बाब आहे. बस कुणाची यापेक्षा शेवटी प्रवाशांना सुविधा मिळणे महत्त्वाचे असून, त्यादृष्टीनेच महामंडळाने आजवर प्रवासी वाहतूक केली आहे. आजवर शहर आणि ग्रामीण भागात परिवहन महामंडळाच्या बसेसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक करण्यात आली आहे. आता शहरातील भार कमी झाल्यामुळे आम्हाला ग्रामीण भागात अधिक लक्ष केंद्रित करता येणार आहे.

ग्रामीण भागातील भागात आम्हाला अधिक सुविधा द्यायच्या आहेत. नाशिक महानगरातील प्रवासी वाहतुकीवरील यंत्रणा आता आम्ही ग्रामीण भागासाठी वापरणार आहोत. परंतु, सध्या काेेरोनाचा निर्बंध असल्यामुळे याबाबत काही मर्यादादेखील आलेल्या आहेत. परंतु, जसजसे निर्बंध कमी होतील त्याप्रमाणे नाशिकमधून ग्रामीण भागासाठी अधिक चांगली आणि दर्जेदार प्रवासी सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.

महापालिकेने सुरू केलेल्या बससेवेला आमच्या शुभेच्छाच आहेत. त्यांनी आधुनिकतेची कास धरून बसेस रस्त्यावर आणलेल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि मोबाईलचा वापर सर्वसामान्य नागरिक करीत असल्याने या तंत्रज्ञानाचा प्रवाशांना लाभच होणार आहे. राज्य परिवहन महामंडळाची जबाबदारी असल्याने ग्रामीण भागावर अधिक लक्ष केंद्रित करून जास्तीत जास्त बसेसच्या माध्यमातून अधिकाधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहोत.