शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

काढणीला आलेला कांदा जाळला

By admin | Updated: February 15, 2017 01:01 IST

नगरसूल : शासनाच्या धोरणाचा निषेध; शेतकऱ्यांमध्ये संताप

नगरसूल : कांद्याच्या भावात निरंतर घसरण सुरू असल्याने उत्पादन खर्चदेखील फिटत नसल्याने नगरसूल येथील शेतकऱ्याने आपल्याच शेतातील काढणीला आलेला कांदा जाळून शासनाच्या कांद्याबाबतच्या निष्क्रि य धोरणाचा निषेध केला आहे. नगरसूल येथील शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी नगरसूल-सायगाव रस्त्यावर कांदा लागवडीसाठी पाच एकर शेत ठोका पद्धतीने घेतले व चार महिन्यांपूर्वी कांद्याची लागवड केली. परंतु दरम्यानच्या नोटाबंदीचा फटका या कांद्याला बसल्याने पाच एकरापैकी दोन एकर शेतातील कांदा औषधे व मजुराच्या मजुरीअभावी केवळ २० टक्केच शिल्लक राहिला. उरलेल्या कांद्याला रोगाची लागण झाल्याने खराब झाला; मात्र उरलेल्या तीन एकर क्षेत्रातील कांदा नातेवाइकांकडून उसनवारी करून वाचविला.   सध्या बाजारभावामुळे कांदा बाजार समितीत विक्री करून उत्पादन खर्चदेखील वसूल होत नसल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने आपल्याच शेतात कांदा जाळून टाकला. यापूर्वी कृष्णा डोंगरे व त्याच्या दोन मित्रांनी पाणीटंचाईच्या काळात गावापासून १३० किमी अंतरावरील करंजखेड येथे ठोका पद्धतीने कांदा लागवड केली. तेव्हादेखील कांद्याला भाव नसल्याने त्यांनी उत्पादन झालेला १००० क्विंटल कांदा चाळीत साठवणूक केला. परंतु या दरम्यान भाववाढ झाली नाही. त्यामुळे त्यांनी साठवलेल्या कांद्यापैकी ९०० क्विंटल कांदा खराब झाला होता. त्यावेळेस त्यांना प्रत्येकी दोन लाख रुपये तोटा झाला होता व यंदाच्या कांदा हंगामात पिकविलेल्या कांद्यात त्यांना उत्पादन खर्चदेखील वसूल झाला नसल्याने त्यांचे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे कृष्णा डोंगरे यांनी सांगितले.  शेती हा डबघाईचा व्यवसाय झाला असून, शासनाचे कोणतेही ठोस धोरण नसल्याने शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत आहे. मोठे उद्योग, कारखानदार, विदेशी गुंतवणूकदार यांचे हित जोपासणारे सरकार अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची प्रतिमा तयार झाली आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. (वार्ताहर)