शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

नद्यांना भिंत बांधणे हा भ्रष्टाचारच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:15 IST

नाशिकमध्ये शासकीय विश्राामगृह येथे गुरूवारी (दि.२९) झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी पुरापासून संरक्षणासाठी नद्यांना भिंत घालणे ...

नाशिकमध्ये शासकीय विश्राामगृह येथे गुरूवारी (दि.२९) झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी पुरापासून संरक्षणासाठी नद्यांना भिंत घालणे हा उपाय होऊ शकत नाही. कोसी नदीवर १९५२ पासून असे अनेक बांध बांधण्यात आले परंतु पूर थांबलेला नाही असे सांगून ते म्हणाले की, जगातील शंभर मोठ्या नद्या तरी मी बघितल्या आहेत. अशा अनेक ठिकाणी बांधलेल्या भिंती किंवा तत्सम बांधकामे पाडावी लागली आहेत. त्यामुळे आधी बांधणे आणि नंतर तोडणे असे दुहेरी खर्च झाले आहे.

मुळात नदीकाठी असलेले क्षेत्र हे ब्लू झोन, रेड झोन हे नदीपात्र संरक्षित राहावे यासाठी तयार केले जाते, तेथे भिंत कशी बांधणार असा प्रश्न त्यांनी केला. अहमदाबाद येथे गुजरात सरकारने साबरमतीला केलेले बांधकाम अयोग्य असून नदीबाबत लालच असणारेच असे करू शकतात, असेही ते म्हणाले. नद्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी रिवर आणि सिवर (नद्या आणि गटारी) वेगवेगळ्या ठेवल्या पाहिजेत असा सल्ला शेवटी त्यांनी दिला.

इन्फो..

१११ नद्यांचे राष्ट्रगान तयार करणार

नाशिकमध्ये गोदावरी नदीचे राष्ट्रगान तयार करण्यात आले असून त्याचे नुकतेच लोकार्पण झाले आहे. अशाच प्रकारे १११ नद्यांचे राष्ट्रगान तयार करण्यात येणार आहे, हे राष्ट्रगान शाळाशाळांमध्ये विद्यार्थ्यांनी म्हटल्यास नद्यांचे महत्व आणि अस्मिता जागृत होईल असेही राजेंद्रसिंह म्हणाले.

इन्फो...

नमामि गंगा ही कार्पोरेट डेमोक्रसी

केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येेत असलेल्या नमामि गंगा यावर टीका करताना राजेंद्रसिंह म्हणाले, पब्लिक डेमोक्रसी संपवून कार्पोरेट डेमोक्रसी अशी ही परियोजना आहे. केवळ घाट बांधल्याने नदी शुद्ध आणि संरक्षित होत नाही. नदीची जखम हृदयाला असेल तर तेथेच उपचार केले पाहिजे. भलत्या ठिकाणी उपचार करून नदी जीवंत राहू शकणार नाही असेही ते म्हणाले.