शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
3
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
4
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
5
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
6
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
7
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
8
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
9
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
10
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
11
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
12
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
13
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
14
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
15
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
16
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
17
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
18
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
19
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
20
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी

रावळगाव गटात इच्छुकांची भाऊगर्दी

By admin | Updated: January 20, 2017 00:17 IST

अस्तित्वाची लढत : रावळगाव गण अनुसूचित जमाती, तर वडेल नागरिकांचा मागास प्रवर्ग

शफीक शेख मालेगावतालुक्यातील रावळगाव जिल्हा परिषद गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाल्याने या गटात यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत चुरशीचा सामना होणार आहे. आजी-माजी मंत्र्यांच्या निकटवर्तीयांमध्ये सरळ-सरळ लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या गटावर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांना कंबर कसावी लागणार आहे.माजी मंत्री प्रशांत हिरे यांच्या कर्मवीर हिरे सेनेचे या गटावर वर्चस्व होते. जिल्हा परिषद निवडणुकीत रावळगाव गटातून हिरे गटाच्या अलका आखाडे यांनी प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण सभापतिपदही भूषविले होते. हिरेंच्या सत्तेला सुरुंग लावण्यास शिवसेनेच्या पक्षनेतृत्वाला नंतर यश आले. गेल्या पंधरा वर्षांपासून शिवसेनेने या गटावर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस, रिपाइं आदिंच्या पक्षनेतृत्वाला गटातील सत्ता खेचून आणण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.शिवसेनेचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सुरेश पवार यांनी आपल्या गटात ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या मदतीने केलेली विकासकामे ही त्यांची जमेची बाजू आहे. परंतु आपल्या हातातून गेलेला रावळगाव गटाचा गड पुन्हा मिळविण्यासाठी भाजपावासी झालेल्या हिरे गटाला कसरत करावी लागणार आहे. गेल्यावेळी शिवसेनेचे सुरेश पवार यांनी जनराज्यचे समाधान अहिरे आणि राष्ट्रवादी- कॉँग्रेस युतीचे उमेदवार दत्तू वडक्ते यांचा पराभव केला होता. रावळगाव गटाचे जिल्हा परिषदेचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहे.रावळगाव गणातूनच विजयी झालेले शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य शरद कासार यांना पंचायत समिती उपसभापतिपदाची संधी मिळाली होती. गेल्यावेळी शिवसेनेच्या मानसी धिवरे यांना पंचायत समिती सदस्यपदाची संधी मिळाली होती. वडेल गणातून सेनेच्याच छायाबाई माळी विजयी झाल्या होत्या. त्यांनी जनराज्यच्या अलका आखाडे आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या शीतल आखाडे यांचा पराभव केला होता. यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत रावळगाव गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे पक्षनेतृत्वाचा उमेदवारी बहाल करताना कस लागणार आहे. पक्षाला नाराज व बंडखोरीची लागण होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे.