शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

...थरथरत्या हातांवर खुलली मेंदी

By admin | Updated: February 1, 2016 22:37 IST

जगण्याची उमेद : राज्यातील दोनशेपेक्षा अधिक एचआयव्हीबाधित लग्नाच्या बेडीत

सतीश डोंगरे नाशिकऐन उमेदीच्या काळात नकळत गंभीर चूक झाली आणि एचआयव्हीचा विषाणू कायमस्वरूपी रक्तात भिनला. सुखी संसाराचे स्वप्न तर भंगलेच शिवाय रक्ताच्या नात्यानेही दूर सारले. आता उरले-सुरले आयुष्य एकाकी जगणे हा एकमेव पर्याय शिल्लक असलेल्या एचआयव्हीग्रस्तांच्या आयुष्यात यश फाउंडेशनने प्रापंचिक जीवनाचा मार्ग दाखविला. २००८ पासून राज्यभरातील दोनशेपेक्षा अधिक एचआयव्हीग्रस्तांना एकत्र आणून मरणाच्या भीतीने थरथरणाऱ्या हातावर मेंदी रंगविण्याचे काम केले. त्यातील २३ जोडपे सुखाने संसार करीत आहेत. एचआयव्हीची लागण झाल्याने समाजाबरोबरच कुटुंबीयांनीदेखील एकप्रकारे बहिष्कृत केल्याने या तरुण-तरुणींपुढे उर्वरित जीवन एकाकीपणे व्यतित करण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. अशात यश फाउंडेशनने २००८ साली ‘मंगल मैत्री’ मेळाव्याचे आयोजन केले. राज्यभरातील एचआयव्हीग्रस्त विधवा-विदूर व अविवाहित तरुण-तरुणींच्या भेटी घेऊन त्यांना या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. पहिल्या वर्षात हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. केवळ नाशिक, मुंबई, ठाणे या तीनच जिल्ह्यांतील विवाहेच्छुक तरुण-तरुणी मेळाव्यात सहभागी झाले. २००९ मध्ये यात भर पडली. ४०पेक्षा अधिक विवाहेच्छुकांनी मेळाव्यात हजेरी लावली. पुढे २०१० मध्ये मेळाव्याच्या माध्यमातून पहिले लग्न लावण्यात फाउंडेशनला यश आले. त्यानंतर प्रत्येक वर्षी फाउंडेशनच्या माध्यमातून एचआयव्हीग्रस्तांच्या अंगणात सनई-चौघड्यांचे सूर घुमू लागले. २०१४ मध्ये राज्यातील तब्बल २३ जिल्ह्यांमधील एचआयव्ही बाधितांनी मेळाव्यात सहभागी होत आपला जोडीदार निवडला. पुढे याचे स्वरूप वाढत गेले. २०१५-१६ मध्ये तर राज्यातील कानाकोपऱ्यातील एचआयव्हीग्रस्तांनी मेळाव्यास हजेरी लावत आपला जोडीदार निवडला. मेळाव्यात वधू-वरांनी एकमेकांना पसंत केल्यानंतर त्यांच्यातील नाते अधिक बळकट व्हावे यासाठी फाउंडेशनकडून प्रयत्न केले जातात. वधू आणि वरांकडूनही जन्म दाखला, एआरटी पुस्तकाची प्रत, एचआयव्ही निष्पन्न झाल्याचा पहिला रिपोर्ट, घटस्फोटीत असल्यास घटस्फोटाचे कागदपत्रे, साथीदाराचा मृत्यू दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्रे आदि कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच लग्न लावले जाते.