शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
5
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
6
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
7
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
8
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
9
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
10
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
11
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
12
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
13
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
14
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
15
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
16
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
17
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
18
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
19
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
20
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?

आदिवासी शेतकऱ्यांसाठी आंबा लागवड एक वरदान

By admin | Updated: December 26, 2016 01:40 IST

इस्रायल पद्धतीने घेणार उत्पादन : आदिवासी शेतीतज्ज्ञांचा पुढाकार

 रामदास शिंदे पेठगेल्या शेकडो वर्षांपासून पिढ्यान्पिढ्या पारंपरिक पिकांच्या विळख्यात सापडलेल्या आदिवासी शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक शेतीकडे वळवण्यासाठी आता स्थानिक शेतीतज्ज्ञांनी पुढाकार घेतला आहे. भात व नागली यासारख्या कमी उत्पादन देणाऱ्या पिकांना फाटा देत आता इस्रायलपद्धतीने आंबा लागवडीचे तंत्र विकसित करण्यात आदिवासी शेतकऱ्यांना यश आले आहे.पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर व इगतपुरीसारख्या तालुक्यात अजूनही पावसाचे प्रमाण बऱ्यापैकी असल्याने येथील शेतकरी भात व नागली ही पारंपरिक पिके घेत आहे. मात्र या पिकांवरील खर्च व उत्पादनाचा ताळमेळ बसत नसल्याने आदिवासी शेतकरी वर्षानुवर्षे आर्थिक खाईत लोटला जात असल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे. यावर उपाय म्हणून काही आदिवासी शेतकऱ्यांनी द्राक्ष व डाळींब सारखे पिके घेण्याचे धाडस केले; परंतु अधिक पाऊस व प्रतिकूल हवामान यामुळे शेतकऱ्यांनी बागा फुलण्याआधीच काढून टाकल्या.नजीकच्या गुजरात राज्यातील धरमपूर, कपराडा व बलसाड हा परिसर आंब्याच्या उत्पादनात अग्रेसर समजला जातो. कोकणनंतर सर्वाधिक आंब्याचे उत्पादन गुजरातच्या याच भागात घेतले जाते. पेठ तालुक्यातील गावंधपाडा येथील शेतकरी यशवंत गावंढे यांनी नेमकी हीच बाब ओळखून पेठ तालुक्यात आंब्याची तंत्रशुद्ध पद्धतीने लागवड केल्यास येथील शेतकरी विकसित होईल, यासाठी गावंढे यांनी पहिल्या शेतकरी बचतगटाची स्थापना केली. शासनाच्या कृषी विभाग, कृषितज्ज्ञ व कृषी संशोधक यांचा सल्ला व मार्गदर्शन घेऊन पेठ तालुक्यात इस्रायलपद्धतीने आंबा लागवड प्रयोग यशस्वी केला. अनेक कृषी संस्थांच्या प्रयत्नातून आदिवासी शेतकऱ्यांना अभ्यास दौरे घडवले. जैन उद्योगसमूह, आत्मा प्रकल्पसारख्या संस्थांनी पेठच्या शेतकऱ्यांना आंबा लागवडीचे तंत्र दिले. यामुळे तालुक्यात सद्य स्थितीत जवळपास शंभर एकरवर आंब्याची लागवड करण्यात आली असून, वर्षअखेर दोन हजार एकर क्षेत्रावर आंब्याची यशस्वी लागवड करून आगामी दोन वर्षांत शेतकऱ्यांना प्रतिएकर चार ते पाच लाख रु पये उत्पन्न मिळवून देण्याचा मानस यशवंत गावंढे यांनी व्यक्त केला आहे.याकामी कृषी आयुक्त कैलास मोते, आत्मा प्रकल्पाचे संचालक अशोक कांबळे, उपसंचालक आप्पा वानखेडकर, तालुका कृषी अधिकारी शिलानाथ पवार आदिंनी वेळोवेळी शेतकरी मेळावे घेऊन मार्गदर्शन केले. शेतकरी बचतगटाचे यशवंत गावंढे, रामदास वाघेरे, अशोक गवळी, पद्माकर गवळी, देवराम गवळी, पंडित भोये, एकनाथ भोये, नामदेव मोहांडकर, मोहन पवार आदि शेतकऱ्यांच्या पुढाकाराने पेठ तालुका एका नव्या कृषी क्र ांतीचा साक्षीदार होऊ पाहत आहे.