शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
5
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
6
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
7
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
8
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
9
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
10
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
11
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
12
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
14
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
15
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
16
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
17
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
18
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
19
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
20
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?

आदिवासी शेतकऱ्यांसाठी आंबा लागवड एक वरदान

By admin | Updated: December 26, 2016 01:40 IST

इस्रायल पद्धतीने घेणार उत्पादन : आदिवासी शेतीतज्ज्ञांचा पुढाकार

 रामदास शिंदे पेठगेल्या शेकडो वर्षांपासून पिढ्यान्पिढ्या पारंपरिक पिकांच्या विळख्यात सापडलेल्या आदिवासी शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक शेतीकडे वळवण्यासाठी आता स्थानिक शेतीतज्ज्ञांनी पुढाकार घेतला आहे. भात व नागली यासारख्या कमी उत्पादन देणाऱ्या पिकांना फाटा देत आता इस्रायलपद्धतीने आंबा लागवडीचे तंत्र विकसित करण्यात आदिवासी शेतकऱ्यांना यश आले आहे.पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर व इगतपुरीसारख्या तालुक्यात अजूनही पावसाचे प्रमाण बऱ्यापैकी असल्याने येथील शेतकरी भात व नागली ही पारंपरिक पिके घेत आहे. मात्र या पिकांवरील खर्च व उत्पादनाचा ताळमेळ बसत नसल्याने आदिवासी शेतकरी वर्षानुवर्षे आर्थिक खाईत लोटला जात असल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे. यावर उपाय म्हणून काही आदिवासी शेतकऱ्यांनी द्राक्ष व डाळींब सारखे पिके घेण्याचे धाडस केले; परंतु अधिक पाऊस व प्रतिकूल हवामान यामुळे शेतकऱ्यांनी बागा फुलण्याआधीच काढून टाकल्या.नजीकच्या गुजरात राज्यातील धरमपूर, कपराडा व बलसाड हा परिसर आंब्याच्या उत्पादनात अग्रेसर समजला जातो. कोकणनंतर सर्वाधिक आंब्याचे उत्पादन गुजरातच्या याच भागात घेतले जाते. पेठ तालुक्यातील गावंधपाडा येथील शेतकरी यशवंत गावंढे यांनी नेमकी हीच बाब ओळखून पेठ तालुक्यात आंब्याची तंत्रशुद्ध पद्धतीने लागवड केल्यास येथील शेतकरी विकसित होईल, यासाठी गावंढे यांनी पहिल्या शेतकरी बचतगटाची स्थापना केली. शासनाच्या कृषी विभाग, कृषितज्ज्ञ व कृषी संशोधक यांचा सल्ला व मार्गदर्शन घेऊन पेठ तालुक्यात इस्रायलपद्धतीने आंबा लागवड प्रयोग यशस्वी केला. अनेक कृषी संस्थांच्या प्रयत्नातून आदिवासी शेतकऱ्यांना अभ्यास दौरे घडवले. जैन उद्योगसमूह, आत्मा प्रकल्पसारख्या संस्थांनी पेठच्या शेतकऱ्यांना आंबा लागवडीचे तंत्र दिले. यामुळे तालुक्यात सद्य स्थितीत जवळपास शंभर एकरवर आंब्याची लागवड करण्यात आली असून, वर्षअखेर दोन हजार एकर क्षेत्रावर आंब्याची यशस्वी लागवड करून आगामी दोन वर्षांत शेतकऱ्यांना प्रतिएकर चार ते पाच लाख रु पये उत्पन्न मिळवून देण्याचा मानस यशवंत गावंढे यांनी व्यक्त केला आहे.याकामी कृषी आयुक्त कैलास मोते, आत्मा प्रकल्पाचे संचालक अशोक कांबळे, उपसंचालक आप्पा वानखेडकर, तालुका कृषी अधिकारी शिलानाथ पवार आदिंनी वेळोवेळी शेतकरी मेळावे घेऊन मार्गदर्शन केले. शेतकरी बचतगटाचे यशवंत गावंढे, रामदास वाघेरे, अशोक गवळी, पद्माकर गवळी, देवराम गवळी, पंडित भोये, एकनाथ भोये, नामदेव मोहांडकर, मोहन पवार आदि शेतकऱ्यांच्या पुढाकाराने पेठ तालुका एका नव्या कृषी क्र ांतीचा साक्षीदार होऊ पाहत आहे.