शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
3
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
4
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
5
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
6
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
7
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
8
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
9
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
10
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
11
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
12
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
13
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
14
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
15
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
16
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
17
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
18
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
19
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
20
कोल्हापुरातील शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश

निवडणूक पक्षादेशावरून भाजपात ठिणगी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:14 IST

नाशिक- विषय समितींच्या निवडणुका राजकीयदृष्ट्या तितक्याशा महत्त्वाच्या मानल्या जात नसल्या तरी शिक्षण समितीच्या निवडणुकीत भाजपने मात्र गांभिर्याने घेत फाटाफुट ...

नाशिक- विषय समितींच्या निवडणुका राजकीयदृष्ट्या तितक्याशा महत्त्वाच्या मानल्या जात नसल्या तरी शिक्षण समितीच्या निवडणुकीत भाजपने मात्र गांभिर्याने घेत फाटाफुट टाळण्यासाठी पक्षादेश बजावले; परंतु व्हॉटस ॲपवर बजावलेल्या पक्षादेशाची प्रत्यक्षात प्रत देण्यावरून समितीचे सदस्य शिवाजी गांगुर्डे आणि गटनेता जगदीश पाटील यांच्यात वाद झाल्याचे समजते. त्यातून सभागृहात फक्त मतदार सदस्यांनाच अधिकार असल्याचे गांगुर्डे यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वदवून घेत पाटील यांना सभागृहातून बाहेर जाण्यास भाग पाडले.

महापालिकेच्या शिक्षण समिती सभापती- उपसभापती पदाची निवडणूक शुक्रवारी (दि.५) सकाळी ११ वाजता महिला व बाल कल्याण समितीच्या सभागृहात जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी हा प्रकार घडला. या समितीत भाजपाचे बहुमत असले तरी कोणत्याही प्रकारे धोका पत्करून घेण्यास भाजप तयार नसल्याने गटनेता जगदीश पाटील यांनी सर्वांना गुरुवारी (दि.४) व्हॉटस ॲपवर पक्षादेश पाठवले होते. त्यानंतर बैठक सुरू झाल्यानंतर पाटील यांनी त्याठिकाणी जाऊन सर्वांना प्रत्यक्ष प्रत देणे सुरू केले; मात्र व्हॉटस ॲपवर अगोदरच व्हीप पाठवल्याने आता प्रत्यक्ष प्रत देऊन सही कशाला, असा शिवाजी गांगुर्डे यांचा प्रश्न होता; मात्र पाटील ऐकत नसल्याने अखेरीस गांगुर्डे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सभागृहात कोण केाण उपस्थित राहू शकतो, असा प्रश्न केला. त्यावर पाटील यांनी आपण गटनेता असून, व्हीप देण्यासाठी आलेा असल्याचा खुलासा केला; मात्र छाननीपर्यंतच थांबता येईल, असे यावेळी सांगण्यात आल्याने छाननी संपताच पाटील सभागृहाबाहेर आले.

या विषयावरून आता भाजपात जोरदार चर्चा सुरू झाली असून, वादाची ठिणगी पडली आहे. जर एकदा पक्षादेश दिला तर पुन्हा पुन्हा देण्याची गरज काय, असे गांगुर्डे यांचे म्हणणे असून, पाटील यांनी मात्र सर्व निवडणुकीत दक्षता घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

केाट...

गटनेत्यांनी माझ्या व माझ्या मुलाच्या मोबाइलवर पक्षादेश पाठवला होता. मी बैठकीसही उपस्थित होतेा, असे असताना पुन्हा पत्र देऊन त्यावर स्वाक्षरी घेणे म्हणजे सदस्याच्या पक्षनिष्ठेवर शंका घेण्यासारखे आहे.

- शिवाजी गांगुर्डे, नगरसेवक भाजपा.

कोट...

काही निवडणुकीतून धडे मिळाले आहेत. यापूर्वी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराने माघार घेण्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे आता सर्वच निवडणुका गांभीर्याने घेतल्या जात आहेत. काही अडचण नसेल तर पक्षादेश नाकारण्याचे कारण नव्हते.

- जगदीश पाटील, गटनेता, भाजपा.