शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

अेाबीसी आरक्षणासाठी भाजपाची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:19 IST

नाशिक- ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्यास राज्यातील महाविकास आघाडी सरकारच जबाबदार असल्याचा आरोप करीत नाशिक शहर भाजपाच्या वतीने बुधवारी ...

नाशिक- ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्यास राज्यातील महाविकास आघाडी सरकारच जबाबदार असल्याचा आरोप करीत नाशिक शहर भाजपाच्या वतीने बुधवारी (दि.१५) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेारदार निदर्शने करण्यात आली. जाे पर्यंत ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा निकाली निघत नाही तो पर्यंत होऊ घातलेल्या पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेऊ नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा राजकीय पटलावर गाजत असून त्या अंतर्गत भाजपाने राज्यात आंदेालन करण्यात आले. नाशिकमध्येही निदर्शने करताना राज्यातील महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार बाळासाहेब सानप, आमदार राहुल ढिकले, शहराध्यक्ष गिरीश पालवे, जगन पाटील, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष चंद्रकांत थोरात यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्यात ओबीसी प्रवर्गासाठी २७ टक्के आरक्षण हेाते. त्याच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर राज्यातील फडणवीस सरकारने हे आरक्षण कायम राहावे यासाठी इंपिरिकल डाटा संकलित करण्यासाठी वेळ मागितली होती. मात्र ,ती संपण्याच्या बेतात असतानाच राज्यात सत्तांतर झाले आणि महाविकास आघाडीने दीड वर्षे हा विषय घेाळात ठेवला त्यामुळे फडणवीस सरकारने आरक्षण देण्यासाठी काढलेला अध्यादेश रद्द झाला. गेली दीड वर्षे न्यायालयाला इंपिरिकल डाटा देण्यासाठी केवळ मुदतवाढ घेण्यात आली. या घोळातच ओबीसी आरक्षण रद्द ठरले असा आरोप जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे आता जाहीर करण्यात आलेल्या जिल्हा परिषदांच्या पेाटनिवडणुका तसेच अन्य जिल्हा परिषदांच्या होऊ घातलेल्या निवडणुका जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न निकाली निघत नाही तोपर्यंत स्थगित ठेवाव्या, अशी मागणी करण्यात आली आहे. आंदोलनात सतीश रत्नपारखी, दिलीप देवांग, राजेंद्रे कोरडे, राजेंद्र महाले, मच्छींद्र सानप, ॲड. अलका जांभेकर, सुनील केदार, संतोष नेरे, अविनाश पाटील आदी उपस्थित होते.