ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. १३ - भाजपा हे सरकार धर्मवादी असून मराठा आरक्षणाविषयी ते वेळकाढू पणा करीत असल्याची टीका भारीप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज नाशिकमध्ये केली. मराठा समाजाचे मोर्चे हे आरक्षणासाठी निघत असले तरी सत्ताधारी पक्षाचा अजेंडा मात्र वेगळाच आहे. पुढील तीन वर्षे ते सत्ता भोगताना मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी न्यायालयात विविध कारणे देऊन टाळाटाळ करतील असेही ते म्हणाले. नाशिक जिल्ह्यातील तळेगाव अत्याचार प्रकरण निंदनीय असून त्यावरून जातीय राजकारण करू नये, नाशिकमध्येच हे प्रकरण मिटवावे अन्यत्र त्याचे लोण पसरू देऊ नये असेही ते म्हणाले. पोलीसांनी समाजकंटकांवर कारवाई करावी तसेच स्थानिक नेत्यांनी देखील शहरात शांतता राखावी असे आवाहन त्यांनी केले.