शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपकडून थेट मुख्यमंत्र्यांवरच गुन्हा दाखल करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:18 IST

नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करीत हिंदू समाजाच्या भावना ...

नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करीत हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. तसेच नारायण राणे यांच्याविरोधात मंगळवारी प्रक्षोभक विधाने करून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना चिथावणी देणाऱ्या युवासेना नेते वरुण देसाई यांनाही मुख्यमंत्र्यांनी शासकीय निवासस्थानी आश्रय दिल्याने देसाई यांच्यासह मुख्यमंत्र्यांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपचे कार्यकर्ते ऋषिकेश आहेर यांनी नाशिक सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रार अर्जाद्वारे केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील वादग्रस्त प्रकरणात मंगळवारी नाशिकसह संपूर्ण राज्यभरात भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांत राडा झाल्यानंतर शिवसेनेने बुधवारी (दि. २५) पुन्हा भाजपला डिवचत नारायण राणे यांच्यावर बोचरी टीका करणाऱ्या सामनातील अग्रलेखांचे फलक शहरात झळकवले. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या आवारात धरणे आंदोलन करीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल वादग्रस्त लिखाण करणाऱ्या संपादकावर तसेच फलक लावणाऱ्या शिवसैनिकांवर कारवाई करण्याची मागणी केली. यासाठी भाजपच्या आमदार देवयानी फरांदे, शहराध्यक्ष गिरीश पालवे, माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह नगरसेवक व इतर पदाधिकारी पोलिस आयुक्तालयात येऊन धरणे आंदोलन केले. दरम्यान, सामनातील अक्षेपार्ह लेखाविषयी संपादक रश्मी ठाकरे यांच्यासह लेखाची फलकबाजी करणारे अजय बोरस्ते यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी भाजपचे कार्यकर्ते शिवाजी निवृत्ती बरके यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

इन्फो-

भाजप - शिवसेना वाद विकोपाला जाण्याचे संकेत

नाशिकमध्ये मंगळवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर दिवसभर रंगलेल्या अटकनाट्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या आवारात धरणे आंदोलन करीत सामानातील नारायण राणे यांच्यावर टीकात्मक लेखाविषयी संपादक रश्मी ठाकरे यांच्यावर तसेच योगी आदित्यनाथ यांच्याविषयी कथित वादग्रस्त वक्तव्याच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात आमने-सामने आलेल्या भाजप- शिवसेनेमधील वाद आणखीनच विकोपाला जाण्याचे संकेत आहे.