शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
3
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
4
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
5
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
6
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
7
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
8
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
9
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
10
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
11
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...
12
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
13
'वॉर २'च्या प्रमोशनवेळी ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला, रागारागात चाहत्यांना दिली ताकीद
14
सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट! तुमच्या हातातली नोट खरी की खोटी, असे ओळखा!
15
DPL 2025 : "नायक नहीं खलनायक हूँ मैं..." या गोलंदाजानं हॅटट्रिक घेतली त्याच ओव्हरमध्ये मॅच घालवली
16
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
17
रशियन लोकांना तुर्की आवडत नाही? दोन वर्षांत तुर्कस्तानातील रशियन लोकसंख्या अर्ध्यावर!
18
हिमालयातलं पाणी बॉटलमधून विकतेय अभिनेत्री, एका बाटलीची किंमत वाचून झोप उडेल
19
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
20
नवऱ्याशी भांडल्यावर बायकोने दीड वर्षांच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, झाला मृत्यू

साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी भुजबळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:46 IST

नाशिक : अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी पालकमंत्री छगन भुजबळ यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त ...

नाशिक : अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी पालकमंत्री छगन भुजबळ यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त हेमंत टकले यांनी केली. तसेच स्वागत समितीशिवाय अन्य समित्यांची आणि अन्य पदाधिकाऱ्यांची नियुक्तीदेखील करण्यात आल्याचे टकले यांनी सांगितले.

नाशिक शहरात होणाऱ्या ९४ व्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून भुजबळ यांची तर उपाध्यक्ष म्हणून गोखले एज्युकेशन संस्थेचे सचिव डाॅ. मो. स. गोसावी, राज्याचे मंत्री दादा भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, प्राचार्य प्रशांत पाटील यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनासाठी तयार करण्यात आलेल्या सल्लागार समितीवर नाशिकचे महापौर, जिल्हाधिकारी, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे आणि मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू, महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. सल्लागार प्रतिनिधी म्हणून जिल्ह्यातील सर्व खासदार, सर्व आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य या सर्वांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याशिवाय वेगवेगळ्या ३९ समित्यांचे गठन केले जाणार असल्याचे टकले यांनी सांगितले.

या समित्यांसाठी नाशिकमधील विविध क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश करण्यात येणार आहे. त्यासाठी अजून नागरिकांनी पुढाकार घेतल्यास त्यांचादेखील अंतर्भाव करण्यात येणार आहे. त्याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने प्रतिनिधी म्हणून नितीन मुंडावरे यांची साहित्य संमेलनातील प्रशासकीय कामकाजासाठी विशेष नियुक्ती करण्यात आल्याचेदेखील टकले यांनी नमूद केले.

इन्फो

कार्यवाह जातेगावकर, कार्याध्यक्ष टकले

साहित्य संमेलनाच्या निमंत्रणापासून नाशिकला संमेलन घेऊन येण्यात सर्वाधिक मोलाचे योगदान असलेले लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांची संमेलनाच्या कार्यवाहपदी, तर विश्वस्त हेमंत टकले यांची कार्याध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. कार्याध्यक्षांना सल्लागार म्हणून सहकार्याध्यक्षपदावर ॲड. विलास लोणारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर सर्व समित्यांचे समन्वयक म्हणून विश्वास ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

इन्फो

स्वागत समिती सदस्यांसाठी शुल्क

संमेलनासाठी निधी गोळा करण्याच्या दृष्टीने जे नागरिक ५ हजार रुपये शुल्क भरतील त्यांना स्वागत समिती सदस्य म्हणून नियुक्ती दिली जाणार आहे. त्यात कोणताही नियम नसून जो नागरिक निर्धारित शुल्क देईल, त्याला स्वागत समिती सदस्य म्हणून नियुक्ती दिली जाईल. तसेच जिल्ह्यातील सर्व साहित्यिकांना मानद सदस्यत्व दिले जाणार आहे. त्यांना मात्र या सदस्यत्वासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचे जयप्रकाश जातेगावकर यांनी सांगितले.