शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

भालेकर विद्यालयाची दुरवस्था

By admin | Updated: September 13, 2014 21:57 IST

भालेकर विद्यालयाची दुरवस्था

 

नाशिक : जुने नाशिकसह परिसरातील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी, या हेतूने १९६८ साली स्थापन झालेल्या बी. डी. भालेकर विद्यालयाची अवस्था दयनीय झाली असून, शाळा क्रमांक २८ प्रमाणे या शाळेचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी परिसरातील पालकांनी केली आहे. जुने नाशिक परिसरातील गरीब घरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी तत्कालीन नगरपालिकेच्या माध्यमातून या शाळेची १९६८ साली स्थापना करण्यात आली. तेव्हापासून या शाळेत हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले. त्याकाळी शहरात जास्त विद्यालये नसल्याने आणि इंग्रजी माध्यमाचे पेव फुटले नसल्याने भालेकर विद्यालयात विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रवेश घेत होते. नाशिक महापालिका अस्तित्वात आल्यानंतर शिक्षण धोरणात बदल करण्यात आले. गणपतराव काठे हे शिक्षण मंडळावर असताना त्यांनी महापालिका शाळांना सातवीपर्यंत मान्यता देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची विभागणी झाली. २००० सालानंतर परिसरात निर्माण झालेल्या शाळा, इंग्रजी माध्यमांचे फुटलेले पेव आणि खासगी शाळांना मिळालेली मान्यता यामुळे येथील विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने घटत २०१२-१३ या वर्षात सहावी ते दहावी या पाच इयत्तांसाठी ५८ विद्यार्थी शिल्लक राहिले. ५८ विद्यार्थ्यांसाठी अनुदान देणाऱ्या राज्य शासनाने विद्यार्थीसंख्येवर पटपडताळणी-दरम्यानच हरकत घेतली होती. अनुदान बंद होऊ नये यासाठी महापालिकेने येथील वर्ग आणि शिक्षक इतर शाळांमध्ये हलविण्याचा निर्णय घेतला होता. त्याला विरोध झाल्यानंतर ही शाळा पुन्हा सुरू झाली. आता या विद्यालयात सुमारे ५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु या शाळेची अवस्था इतकी दयनीय झाली आहे की विद्यार्थीसंख्या वाढणार कशी हा प्रश्न येथे येणाऱ्या पालकांना पडल्याशिवाय राहात नाही. शाळेचा उडालेला रंग, वर्गांची झालेली अवस्था, परिसरात झालेली अस्वच्छता, तुटलेली बाकडे आणि गळणारे छत अशी अवस्था पाहिल्यानंतर कोणता पालक या शाळेत आपल्या पाल्याला शिकवायला पाठवेल, हा प्रश्नच आहे. वर्गांमधील साचलेली धूळ पाहिली तर शाळेत कधी साफसफाई होते की नाही असा प्रश्न पडतो. त्यामुळे या जागेची सुधारणा करून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बसवावे, अशी मागणी होत आहे. शाळेच्या परिसरात साचलेला कचरा पाहिला, तर शाळेची दैनंदिन स्वच्छता होते की नाही हा प्रश्न पडतो. या जागेची चांगली सुधारणा करून त्या ठिकाणी वर्ग सुरू झाल्यास पालकांचेही विचार बदलतील आणि त्या शाळेत विद्यार्थी येतील, असे बोलले जात आहे. नूतनीकरण नसले तरी किमान रंगरंगोटी तरी करावी, अशी अपेक्षा बाळगली जात आहे. (प्रतिनिधी)